सुरेश लोखंडे - ठाणो
देशातील 17 राज्ये व सर्व केंद्रशासित प्रदेशांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठाणो जिल्ह्याचे विभाजन होऊन 1 ऑगस्टपासून पालघर जिल्हा अस्तित्वात येणार आहे. या नव्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणावरून वाद सुरू असला तरी पालघर येथे नव्याने बांधलेल्या सेल्स टॅक्स कार्यालयाच्या तीन मजली इमारतीत नव्या जिल्ह्याच्या जिल्हाधिका:यांचे दालन व कार्यालय थाटले जाणार आहे. या कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.
आदिवासींचा सर्वागीण विकास करणो शक्य व्हावे, या उद्देशाने पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात येत आहे. अधिसूचना जारी होताच जिल्हाधिका:यांची तत्काळ नेमणूक करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासह स्थापन करण्यात येणा:या नव्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका:यांचीदेखील नेमणूक करून त्यांचे कार्यालयही या इमारतीमध्येच सुरू करण्याचे प्रय} केले जात आहेत.
सहा महिने कालावधीसाठी हे कार्यालय ठेवण्यात येणार आहे. यानंतर, या कार्यालयाचे स्थलांतर दुग्धविकास महामंडळाच्या जागेत करण्यात येणार आहे. येथील सुमारे चार शेड्समध्ये जिल्हाधिका:यांच्या कार्यालयीन दालनासह अन्यही अधिका:यांची दालने व कार्यालये सुरू केली जाणार आहेत. सुमारे 25 हजार स्क्वेअर फुटांच्या या शेड्समध्ये प्राधान्याने पोलीस अधीक्षक (एसपी) व पालघर उपविभागीय अधिकारी (एसडीओ) यांचे कार्यालय व दालन सुरू करण्याचे नियोजन आहे, असे ठाणो जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिका:याने स्पष्ट केले.
यानंतर, जिल्हाधिका:यांच्या नियंत्रणातील उर्वरित कार्यालयांसाठी सूर्या प्रकल्पाच्या कॉलनीतील अधिका:यांच्या बंगल्यांचा वापर केला जाणार आहेत. यातील 1क्1 निवासस्थानांपैकी सुमारे 51 निवासस्थाने जिल्हाधिका:यांच्या विविध कार्यालयांसाठी वापरण्यात येणार आहेत. सुमारे सहा महिन्यांच्या कालावधीत या कार्यालयांची कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. यानंतरच, सेल्स टॅक्स इमारतीमधील जिल्हाधिकारी व अधिका:यांची कार्यालये हलवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
4एक कोटी 1क् लाख 54 हजार 131 लोकसंख्येच्या ठाणो जिल्ह्याचे विभाजन होऊन नव्या पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात येत आहे.
4या नव्या जिल्ह्यात तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, पालघर आणि वसई या आठ तालुक्यांचा समावेश आहे.
4या तालुक्यांमधील सुमारे 14 लाख 35 हजार 178 लोकसंख्येच्या जिल्ह्याचा कारभार नव्या पालघर जिल्हा प्रशासनाकडून पाहिला जाणार आहे.
4उर्वरित ठाणो, भिवंडी, शहापूर, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि मुरबाड हे सात तालुके ठाणो जिल्ह्यात राहणार आहेत. यामध्ये 96 लाख 18 हजार 953 लोकसंख्या शिल्लक राहणार आहे.