शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

आता राखीव निकाल लावण्याचे आव्हान!, हजारो विद्यार्थी अजूनही निकालाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 05:20 IST

चार महिन्यांपासून निकाल न लावल्यामुळे सातत्याने टीकेचे धनी बनलेल्या मुंबई विद्यापीठाने सर्वच ४७७ निकाल जाहीर करून सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी अद्याप ९ हजार ७३० विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केलेले नाहीत.

मुंबई : चार महिन्यांपासून निकाल न लावल्यामुळे सातत्याने टीकेचे धनी बनलेल्या मुंबई विद्यापीठाने सर्वच ४७७ निकाल जाहीर करून सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी अद्याप ९ हजार ७३० विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केलेले नाहीत. विविध परीक्षेतील हे विद्यार्थी असून, त्यांच्याबरोबरच पुनर्मूल्यांकनासाठी आलेल्या अर्जांचा आकडा हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे आता हे निकाल लावण्याचे आव्हान आहे.विद्यापीठाचे निकाल जाहीर झाले असले तरी अजूनही हजारो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपलेली नाही. त्यातच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २५ सप्टेंबर शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या मुदतीपूर्वी विद्यापीठ दोन्ही निकाल कसे लावणार आहे, याकडे विद्यार्थ्यांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, अजून काही दिवस मुंबई विद्यापीठाचा सर्व कारभार हा प्रभारी खांद्यावरच राहणार असल्याचे चिन्ह आहे. त्यामुळे सध्या फक्त उत्तरपत्रिका तपासणी आणि निकाल यावर विद्यापीठाने पुन्हा एकदा लक्ष केंद्रित केल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.विद्यापीठाने राखून ठेवलेल्या निकालांमध्ये काही विद्यार्थ्यांना हजर असून गैरहजर दाखवले होते, त्यांचा प्रश्न अजून सुटलेला नाही. तर उत्तरपत्रिकांच्या सरमिसळीचा प्रश्नही विद्यापीठाला पूर्णपणे सोडवण्यात यश आलेले नाही.>लवकरच निकाल जाहीर करणारमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी सांगितले की, राखीव निकाल जाहीर करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन प्रयत्नशील आहे. लवकरच निकाल जाहीर करण्यात येतील. राखीव सर्व निकाल पदव्युत्तर प्रवेशाची मुदत संपण्यापूर्वी जाहीर व्हावेत, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.