शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आता घरबसल्या चारित्र्य पडताळणीचे प्रमाणपत्र

By admin | Updated: May 13, 2016 03:57 IST

सरकारी व खासगीतील नोकरी,परदेशात जाण्यासाठी आवश्यक बनलेले चारित्र्य पडताळणीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मुंबईकरांना पोलिसांच्या विशेष शाखेत (एसबी-१) मध्ये घालावे लागणारे हेलपाटे

मुंबई : सरकारी व खासगीतील नोकरी,परदेशात जाण्यासाठी आवश्यक बनलेले चारित्र्य पडताळणीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मुंबईकरांना पोलिसांच्या विशेष शाखेत (एसबी-१) मध्ये घालावे लागणारे हेलपाटे आता कायमस्वरुपी बंद होणार आहेत. आता ते ‘आॅनलाईन’ घरबसल्या मिळविता येणार आहेत,तेही नोंदणी केल्यानंतर अवघ्या आठ ते दहा दिवसात. मुंबई पोलिसांनी गुरुवारी एका तरुणाचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र ‘डिजिटल’स्वरुपात वितरित केले.चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी www.pcs. mahaonline.gov.in व www.aaplesarkar.mahaonline.gov.in   या संकेत स्थळावरुन एसबी-१च्या ग (जी) शाखेतर्गंत अर्ज करुन त्यासाठीचे शुल्क आॅनलाईन भरावे लागले. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्याकडून अहवाल आल्यानंतर त्यांनी नमूद केलेल्या ईमेल आयडीवर प्रमाणपत्राची डिजीटल प्रत पाठविली जाईल. आठ ते दहा दिवसांत ही कार्यवाही केली जाईल, यासाठी यापूर्वीच्या पद्धतीनुसार ६० ते ९० दिवसांचा कालावधी लागत होता, असे या शाखेचे प्रभारी अप्पर आयुक्त आर.डी.शिंदे यांनी सांगितले. आतापर्यत चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मुंबई किंवा महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज करुन त्यांची प्रत विशेष शाखेच्या कार्यालयात सादर करावे लागत होते. त्यांच्याकडून मिळालेल्या तारखेला पुन्हा कार्यालयात येऊन अर्ज व आवश्यक कागदपत्राची पूर्तता करावी लागत होती. ही प्रक्रिया झाल्यानंतर प्रमाणपत्र मिळण्यासाठी किमान महिन्याभराची प्रतिक्षा करावी लागत होती. मात्र नव्या प्रणालीनुसार आता नोंदणी केल्यानंतर अर्जदाराला कार्यालयात जावे लागणार नाही. केवळ ते रहात असलेल्या स्थानिक पोलीस ठाण्यात चौकशीसाठी जावे लागेल, त्याचप्रमाणे संबंधित ठाण्यातील पोलीस घराची शाहनिशा करण्यासाठी येतील. (प्रतिनिधी)> आॅनलाइन प्रमाणपत्र असे मिळणार अर्जदाराला पहिल्यादा वेबसाईटवर मोबाईल क्रमांक ,पासवर्ड वापरुन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे, फोटो व स्वाक्षरी अपलोड करुन आॅनलाईन फार्म भरावा लागेल.मोबाईलवर आलेल्या तारखेला संबंधित पोलीस ठाण्यात उपस्थित रहावे लागेल, त्यांच्याकडून २/३ दिवसामध्ये पडताळणीचा अहवाल आॅनलाईन अपलोड केल्यावर ग शाखेच्या लॉगइनवर दिसेल. शाखेकडून पडताळणी करुन अर्जदाराचे प्रमाणपत्र डिजीटल सहीद्वारे तयार करुन त्याबाबत अर्जदाराला कळविला जाईल. त्यानंतर मेलवरुन त्याने डाऊनलोड करुन त्याची प्रत काढून घ्यावी लागेल. वर्षाला ८० हजार अर्जचारित्र्य पडताळणीसाठी दरवर्षी शहर व उपनगरातून सरासरी ८० हजार अर्ज विशेष शाखेत केले जातात. त्यासाठी नाममात्र शुल्क घेतले जाते. मात्र कार्यालयात ये-जा करण्याबद्दल किमान ४०० ते ५०० रुपये खर्च येतो, त्याशिवाय २,३ महिने प्रतिक्षा करावी लागत असे. आता आॅनलाईन प्रणालीमुळे नागरिकांचा हा त्रास कमी होणार असल्याचे उपायुक्त अशोक दुधे यांनी सांगितले.