शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा नवा चॅम्पियन! MI 'आउट'; PBKS ला फायनलमध्ये नेत श्रेयस अय्यरनं रचला इतिहास
2
बीड: पालखी महामार्गावर टेम्पो व रिक्षाचा भीषण अपघात, पती-पत्नीसह एकूण चार जण ठार
3
महाराष्ट्रात कोरोना रिटर्न! आज दिवसभरात आढळले ६५ नवीन रुग्ण; मुंबईत २२ कोविड रुग्ण
4
रायगड किल्ल्यावर उत्खननात आढळले 'यंत्रराज' सौम्ययंत्र खगोलशास्त्रीय उपकरण
5
IPL मध्ये सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम! एबी डिव्हिलियर्सच्या विक्रम मोडीत काढत रचला नवा इतिहास
6
हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
7
IPL 2025 Qualifier 2 : हार्दिक पांड्यानं Josh Inglis ची विकेट घेतली अन् अंपायर आला चर्चेत, कारण...
8
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
9
PBKS vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन
10
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
11
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
12
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
13
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
14
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
15
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
16
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
17
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
18
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
19
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
20
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  

आता ‘बिल्ड इन मुंबई’!

By admin | Updated: February 16, 2016 03:38 IST

बईत मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी आहे. परवडणारी घरे जर बांधली गेली, तर सर्वसामान्यांना या शहरात राहणे सोईचे होईल, त्यामुळे अर्थव्यवस्थेला प्रचंड गती मिळेल, त्यासाठी आता ‘बिल्ड इन मुंबई’ची घोषणा करत,

मुंबई : मुंबईत मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी आहे. परवडणारी घरे जर बांधली गेली, तर सर्वसामान्यांना या शहरात राहणे सोईचे होईल, त्यामुळे अर्थव्यवस्थेला प्रचंड गती मिळेल, त्यासाठी आता ‘बिल्ड इन मुंबई’ची घोषणा करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पालिकेच्या निवडणुकीचे रणशिंगच फुंकले. ‘मेक इन मुंबई’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महापालिकेने बांधकामांचे परवाने ३६५ दिवसावरून १९० दिवसांवर आणले आहेत. आता ते ६० दिवसांवर आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. एसआरए, म्हाडा, क्रेडाई अशा प्रत्येकांनी परवडणारी घरे बांधण्यात पुढाकार घेतला पाहिजे. नवी मुंबईतल्या बिल्डरांचेही शिष्टमंडळ आपल्याला भेटले असून, तेही मोठ्या प्रमाणावर घरे बांधून देण्यास तयार आहेत. घरे तयार झाली, तर त्याचा फायदा आम मुंबईकर माणसाला म्हणजेच, मराठी माणसाला होईल, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी मराठी मतांची काळजी केवळ शिवसेनेला नाही, तर भाजपाला आहे, हेही स्पष्ट केले.मुंबई : मुंबईचा विकास झालाच पाहिजे. सिडकोत आणखी एक मुंबई उभी राहिली, तरीही या शहराचे महत्त्व कमी होणार नाही. या मुंबईचा विकास झालाच पाहिजे, पण मोकळा श्वास घेण्यासाठी थोडी तरी मोकळी जागा द्या, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंख्यमंत्र्यांच्या ‘बिल्ड इन मुंबई’ ला योजनेला खो दिला.मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने ‘मेक इन इंडिया’चा हा डोलारा उभा केला आहे, तो सगळा पेलवणं कठीण काम होते. मात्र, हे असे काम करण्यासाठी जिद्द असावी लागते, जी मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत आणि हा पहिलाच कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रात होत असल्याचेही ठाकरे म्हणाले.माझ्या स्वप्नांचा सामंजस्य करार‘मुख्यमंत्र्यांनी अनेक सामंजस्य करार केले आहेत. मात्र, मीदेखील त्यांच्याशी एक सामंजस्य करार केला आहे. मी दिवसा, झोपेत स्वप्न पहातो. महाराष्ट्राच्या, मुंबईच्या विकासाची आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी सामंजस्य करार केला आहे. आता माझी स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले,’ त्यावर फडणवीस यांनीही हसून दाद दिली.थोडी मोकळी जागा सोडा - उद्धव ठाकरेमुंबईला मदत करण्यासाठी सगळे तयार आहेत. ट्रान्स हार्बर लिंक अस्तित्वात येण्याचा मार्ग खुला झाला आहे. ८ हजार कोटींचा हा प्रकल्प १८ हजार कोटींवर गेला आहे, पण यासाठी ४० वर्षांच्या बोलीवर अवघ्या १ ते २ टक्के दराने ‘जायका’ कर्ज देण्यास तयार आहे. त्यांना स्वच्छ प्रस्ताव हवे आहेत. या आधी काय झाले, त्यात आपणाला जायचे नाही, पण आता यापुढे पारदर्शक प्रस्ताव तयार केले जातील आणि त्यातून गुंतवणूकदारांना विश्वास दिला जाईल. - देवेंद्र फडणवीस‘मेक इन मुंबई’ वरील परिसंवादाचा समारोप ठाकरेंच्या हस्ते झाला. मुंबईची लोकसंख्या कशी वाढते हा काळजीचा विषय आहे. मूळच्या मुंबईकरांचा सन्मान ठेवून ही मुंबई वाढायला हवी. खरी मुंबई गिरणी कामगारांची होती. नंतर त्यांची काय अवस्था झाली हे देशाने पाहिले. आता तुम्ही वस्त्रोद्योग धोरण आणणार आहात. महाराष्ट्राचा विकास झाला, तर देशाचा विकास होईल, पण त्यासाठी मुंबईचा विकास झाला पाहिजे. - उद्धव ठाकरे