शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘बिल्ड इन मुंबई’!

By admin | Updated: February 16, 2016 03:38 IST

बईत मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी आहे. परवडणारी घरे जर बांधली गेली, तर सर्वसामान्यांना या शहरात राहणे सोईचे होईल, त्यामुळे अर्थव्यवस्थेला प्रचंड गती मिळेल, त्यासाठी आता ‘बिल्ड इन मुंबई’ची घोषणा करत,

मुंबई : मुंबईत मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी आहे. परवडणारी घरे जर बांधली गेली, तर सर्वसामान्यांना या शहरात राहणे सोईचे होईल, त्यामुळे अर्थव्यवस्थेला प्रचंड गती मिळेल, त्यासाठी आता ‘बिल्ड इन मुंबई’ची घोषणा करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पालिकेच्या निवडणुकीचे रणशिंगच फुंकले. ‘मेक इन मुंबई’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महापालिकेने बांधकामांचे परवाने ३६५ दिवसावरून १९० दिवसांवर आणले आहेत. आता ते ६० दिवसांवर आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. एसआरए, म्हाडा, क्रेडाई अशा प्रत्येकांनी परवडणारी घरे बांधण्यात पुढाकार घेतला पाहिजे. नवी मुंबईतल्या बिल्डरांचेही शिष्टमंडळ आपल्याला भेटले असून, तेही मोठ्या प्रमाणावर घरे बांधून देण्यास तयार आहेत. घरे तयार झाली, तर त्याचा फायदा आम मुंबईकर माणसाला म्हणजेच, मराठी माणसाला होईल, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी मराठी मतांची काळजी केवळ शिवसेनेला नाही, तर भाजपाला आहे, हेही स्पष्ट केले.मुंबई : मुंबईचा विकास झालाच पाहिजे. सिडकोत आणखी एक मुंबई उभी राहिली, तरीही या शहराचे महत्त्व कमी होणार नाही. या मुंबईचा विकास झालाच पाहिजे, पण मोकळा श्वास घेण्यासाठी थोडी तरी मोकळी जागा द्या, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंख्यमंत्र्यांच्या ‘बिल्ड इन मुंबई’ ला योजनेला खो दिला.मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने ‘मेक इन इंडिया’चा हा डोलारा उभा केला आहे, तो सगळा पेलवणं कठीण काम होते. मात्र, हे असे काम करण्यासाठी जिद्द असावी लागते, जी मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत आणि हा पहिलाच कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रात होत असल्याचेही ठाकरे म्हणाले.माझ्या स्वप्नांचा सामंजस्य करार‘मुख्यमंत्र्यांनी अनेक सामंजस्य करार केले आहेत. मात्र, मीदेखील त्यांच्याशी एक सामंजस्य करार केला आहे. मी दिवसा, झोपेत स्वप्न पहातो. महाराष्ट्राच्या, मुंबईच्या विकासाची आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी सामंजस्य करार केला आहे. आता माझी स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले,’ त्यावर फडणवीस यांनीही हसून दाद दिली.थोडी मोकळी जागा सोडा - उद्धव ठाकरेमुंबईला मदत करण्यासाठी सगळे तयार आहेत. ट्रान्स हार्बर लिंक अस्तित्वात येण्याचा मार्ग खुला झाला आहे. ८ हजार कोटींचा हा प्रकल्प १८ हजार कोटींवर गेला आहे, पण यासाठी ४० वर्षांच्या बोलीवर अवघ्या १ ते २ टक्के दराने ‘जायका’ कर्ज देण्यास तयार आहे. त्यांना स्वच्छ प्रस्ताव हवे आहेत. या आधी काय झाले, त्यात आपणाला जायचे नाही, पण आता यापुढे पारदर्शक प्रस्ताव तयार केले जातील आणि त्यातून गुंतवणूकदारांना विश्वास दिला जाईल. - देवेंद्र फडणवीस‘मेक इन मुंबई’ वरील परिसंवादाचा समारोप ठाकरेंच्या हस्ते झाला. मुंबईची लोकसंख्या कशी वाढते हा काळजीचा विषय आहे. मूळच्या मुंबईकरांचा सन्मान ठेवून ही मुंबई वाढायला हवी. खरी मुंबई गिरणी कामगारांची होती. नंतर त्यांची काय अवस्था झाली हे देशाने पाहिले. आता तुम्ही वस्त्रोद्योग धोरण आणणार आहात. महाराष्ट्राचा विकास झाला, तर देशाचा विकास होईल, पण त्यासाठी मुंबईचा विकास झाला पाहिजे. - उद्धव ठाकरे