शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

म्हाडाकडून आता मिळणार मोठे घर

By admin | Updated: June 21, 2016 03:35 IST

म्हाडा प्राधिकरणाच्या ‘प्रधानमंत्री आवास योजने’ अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळाचा तिढा सरतेशेवटी राज्य सरकारने सोडवला आहे.

मुंबई : म्हाडा प्राधिकरणाच्या ‘प्रधानमंत्री आवास योजने’ अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळाचा तिढा सरतेशेवटी राज्य सरकारने सोडवला आहे. उच्च उत्पन्न गट वगळल्यास अल्प, अत्यल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील घरांचे क्षेत्रफळ वाढणार आहे. यासंदर्भातील अध्यादेशच राज्य सरकारने काढला आहे. आता वाढत्या क्षेत्रफळानुसार घरांच्या किंमतींमध्येही वाढ होणार आहे. असे असले तरी आता मोठ्या आकाराचे घर मिळणार असल्याने नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे. या निर्णयामुळे भविष्यात बांधण्यात येणारी अत्यल्प गटातील घरे ३२३ चौरस फूट, अल्प गटातील घरे ६४६ चौरस फूट तर मध्यम उत्पन्न गटातील घरे ८६१ चौरस फुटांची असतील. उच्च उत्पन्न गटातील घरांचे क्षेत्रफळ मात्र तेवढेच राहणार आहे. म्हाडा प्राधिकरणातर्फे ३१ मे रोजी घरांची सोडत काढण्यात येणार होती. मात्र सोडतीसाठी घरांची संख्या पुरेशी नसल्याने सोडती लांबणीवर पडली. दरम्यान, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी म्हाडा मुख्यालयात पत्रकार परिषद घेत ९७० घरांची सोडत काढण्यात येईल, अशी माहिती दिली. प्रत्यक्षात सोडत कधी काढण्यात येईल? याबाबत म्हाडाकडून अद्यापही गुप्तता पाळण्यात येत असतानाच ‘प्रधानमंत्री आवास योजने’ अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळाचा तिढा सरतेशेवटी राज्य सरकारने सोडवल्याने नागरिकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. वाट पाहणाऱ्या नागरिकांना मात्र आता आणखी वाट पाहवी लागणार आहे. कारण आर्थिक उत्पन्न गटाचे निकष नव्याने जाहीर झाले आहेत. परिणामी नव्याने जाहीर झालेले निकष यंदाच्या सोडतीसाठी लागू होणार की नाही, याबाबतचा ठोस निर्णय मात्र अद्यापही झालेला नाही. त्यामुळे ९७० घरांच्या सोडतीबाबतचा संभ्रम कायम आहे. (प्रतिनिधी)