शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सोळा साखर कारखान्यांना नोटिसा

By admin | Updated: January 16, 2015 23:40 IST

साखर सहसंचालकांची कारवाई : ‘एफआरपी’नुसार १४ दिवसात दर देण्याची सूचना

सांगली : जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना उसाचा दर दिला नाही. याप्रकरणी जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांना कोल्हापूर येथील साखर सहसंचालक योगिराज सुर्वे यांनी कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. तसेच ऊस उत्पादकांना गळितासाठी ऊस नेल्यापासून चौदा दिवसात पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे.शुगर केन कंट्रोल १९६६ कायद्यानुसार चौदा दिवसांच्या आत शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे दर दिला पाहिजे. परंतु, जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने ‘एफआरपी’नुसार दर दिला नाही. साखरेचे दर कमी झाल्यामुळे ‘एफआरपी’प्रमाणे दर देता येत नसल्याचे सांगितले आहे. तसेच साखर कारखानदारांनी एकत्रित बैठक घेऊन प्रति टन १९०० रूपयेप्रमाणे दर जाहीर केला. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेही जमा केले आहेत. काही कारखान्यांनी तर प्रति टन चौदाशे ते पंधराशे रूपयेप्रमाणे दर शेतकऱ्यांना दिला आहे. या दराप्रमाणेही कारखानदारांनी शेतकऱ्यांना वेळेत बिले दिली नाहीत. यासह अनेक तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य शेतकरी संघटनांनी साखर आयुक्त आणि साखर सहसंचालकांकडे केल्या होत्या. याची गंभीर दखल घेऊन कोल्हापूर साखर सहसंचालक योगिराज सुर्वे यांनी शुक्रवारी सांगली जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांना, ‘एफआरपी’प्रमाणे दर न दिल्याबद्दल नोटीस बजाविली आहे. कायद्यानुसार ‘एफआरपी’प्रमाणे दर देणे बंधनकारक असतानाही तुम्ही शेतकऱ्यांना दर का दिला नाही? या सर्व प्रश्नांवर कारखानदारांकडून त्यांनी खुलासा मागविला आहे. आठ दिवसात त्यांनी उत्तर दिल्यानंतर त्यांच्यावर साखर आयुक्तांकडून पुढील कारवाई होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी, साखर उद्योग अडचणीत असल्यामुळे शासनाने मदत केली पाहिजे, तरच ‘एफआरपी’प्रमाणे दर देणे शक्य असल्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील कारखान्यांची उताऱ्यानुसार एफआरपीसाखर कारखानाएफआरपी दरहुतात्मा (वाळवा)२६३९.२६विश्वास (चिखली)२५७६.०१सर्वोदय (कारंदवाडी)२५३७.६८राजारामबापू (साखराळे)२४७०.३६राजारामबापू (वाटेगाव)२४२१.०१क्रांती (कुंडल)२४१०.२३सोनहिरा (वांगी)२४०७.८९उदगिरी शुगर (बामणी)२३२२.४९साखर कारखानाएफआरपी दरमोहनराव शिंदे (म्हैसाळ)२३०६.४४महांकाली (क़महांकाळ)२२००केन अ‍ॅग्रो (कडेगाव)२१२६.२८माणगंगा (आटपाडी)२०७८.७९वसंतदादा (सांगली)२०६९.७५यशवंत शुगर (नागेवाडी)२००२.९३डफळे (जत)१९११.३९सदगुरु श्री श्री शुगर१७७२शासनाने कारखान्यांवर कारवाई करावीच‘एफआरपी’नुसार दर न देण्यास आम्ही काही शेतकऱ्यांचे शत्रू नाही. आम्हीही शेतकऱ्यांचीच पोरं असून शेतकऱ्यांना शेतीचा उत्पादन खर्च परवडत नाही, त्यांना योग्य दर मिळाला पाहिजे, अशीच आमची भूमिका आहे. परंतु, केंद्र आणि राज्य शासन साखर कारखानदारांची अडवणूक करीत असून शेतकऱ्यांना चांगला दर मिळू नये, अशीच त्यांची भूमिका आहे. यामुळे राज्य शासनाने आणि साखर सहसंचालकांनी जरूर कारखान्यांना नोटिसा बजावून कारवाई करावीच. त्यांच्या नोटिसांना योग्य उत्तर देऊ, असे मत क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड यांनी व्यक्त केले.