शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

सोळा साखर कारखान्यांना नोटिसा

By admin | Updated: January 16, 2015 23:40 IST

साखर सहसंचालकांची कारवाई : ‘एफआरपी’नुसार १४ दिवसात दर देण्याची सूचना

सांगली : जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना उसाचा दर दिला नाही. याप्रकरणी जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांना कोल्हापूर येथील साखर सहसंचालक योगिराज सुर्वे यांनी कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. तसेच ऊस उत्पादकांना गळितासाठी ऊस नेल्यापासून चौदा दिवसात पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे.शुगर केन कंट्रोल १९६६ कायद्यानुसार चौदा दिवसांच्या आत शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे दर दिला पाहिजे. परंतु, जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने ‘एफआरपी’नुसार दर दिला नाही. साखरेचे दर कमी झाल्यामुळे ‘एफआरपी’प्रमाणे दर देता येत नसल्याचे सांगितले आहे. तसेच साखर कारखानदारांनी एकत्रित बैठक घेऊन प्रति टन १९०० रूपयेप्रमाणे दर जाहीर केला. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेही जमा केले आहेत. काही कारखान्यांनी तर प्रति टन चौदाशे ते पंधराशे रूपयेप्रमाणे दर शेतकऱ्यांना दिला आहे. या दराप्रमाणेही कारखानदारांनी शेतकऱ्यांना वेळेत बिले दिली नाहीत. यासह अनेक तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य शेतकरी संघटनांनी साखर आयुक्त आणि साखर सहसंचालकांकडे केल्या होत्या. याची गंभीर दखल घेऊन कोल्हापूर साखर सहसंचालक योगिराज सुर्वे यांनी शुक्रवारी सांगली जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांना, ‘एफआरपी’प्रमाणे दर न दिल्याबद्दल नोटीस बजाविली आहे. कायद्यानुसार ‘एफआरपी’प्रमाणे दर देणे बंधनकारक असतानाही तुम्ही शेतकऱ्यांना दर का दिला नाही? या सर्व प्रश्नांवर कारखानदारांकडून त्यांनी खुलासा मागविला आहे. आठ दिवसात त्यांनी उत्तर दिल्यानंतर त्यांच्यावर साखर आयुक्तांकडून पुढील कारवाई होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी, साखर उद्योग अडचणीत असल्यामुळे शासनाने मदत केली पाहिजे, तरच ‘एफआरपी’प्रमाणे दर देणे शक्य असल्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील कारखान्यांची उताऱ्यानुसार एफआरपीसाखर कारखानाएफआरपी दरहुतात्मा (वाळवा)२६३९.२६विश्वास (चिखली)२५७६.०१सर्वोदय (कारंदवाडी)२५३७.६८राजारामबापू (साखराळे)२४७०.३६राजारामबापू (वाटेगाव)२४२१.०१क्रांती (कुंडल)२४१०.२३सोनहिरा (वांगी)२४०७.८९उदगिरी शुगर (बामणी)२३२२.४९साखर कारखानाएफआरपी दरमोहनराव शिंदे (म्हैसाळ)२३०६.४४महांकाली (क़महांकाळ)२२००केन अ‍ॅग्रो (कडेगाव)२१२६.२८माणगंगा (आटपाडी)२०७८.७९वसंतदादा (सांगली)२०६९.७५यशवंत शुगर (नागेवाडी)२००२.९३डफळे (जत)१९११.३९सदगुरु श्री श्री शुगर१७७२शासनाने कारखान्यांवर कारवाई करावीच‘एफआरपी’नुसार दर न देण्यास आम्ही काही शेतकऱ्यांचे शत्रू नाही. आम्हीही शेतकऱ्यांचीच पोरं असून शेतकऱ्यांना शेतीचा उत्पादन खर्च परवडत नाही, त्यांना योग्य दर मिळाला पाहिजे, अशीच आमची भूमिका आहे. परंतु, केंद्र आणि राज्य शासन साखर कारखानदारांची अडवणूक करीत असून शेतकऱ्यांना चांगला दर मिळू नये, अशीच त्यांची भूमिका आहे. यामुळे राज्य शासनाने आणि साखर सहसंचालकांनी जरूर कारखान्यांना नोटिसा बजावून कारवाई करावीच. त्यांच्या नोटिसांना योग्य उत्तर देऊ, असे मत क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड यांनी व्यक्त केले.