शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

आरोग्य विभागाकडून केवळ नोटिसांचा फार्स

By admin | Updated: July 15, 2016 21:24 IST

बीड जिल्हा रूग्णालयात साडेतीन महिन्यांपूर्वी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दुर्लक्षामुळे व डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पाच पैकी चार रूग्णांची दृष्टी आधू झाली होती.

- व्यंकटेश वैष्णव 

बीड, दि. १५ -  बीड जिल्हा रूग्णालयात साडेतीन महिन्यांपूर्वी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दुर्लक्षामुळे व  डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पाच पैकी चार रूग्णांची  दृष्टी आधू झाली होती. या प्रकरणात उशिराने जागे झालेल्या राज्य आरोग्य विभागाने केवळ डॉक्टरांना कारणे द्या नोटीस शुक्रवारी दिल्या आहेत. केवळ नोटिसांचा फार्स केल्याने कायमचे अंधत्व आलेल्या त्या रूग्णांची शासनाकडून अवहेलनाच होत आहे.नेत्रशस्त्रक्रिया शिबिरादरम्यान डॉक्टरांनी केलेल्या हलगर्जीपणावर चौकशी समितीनेही शिक्कामोर्तब केले होते. आॅपरेशन केलेल्या रूग्णांचे डोळे परत येणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी पाचही रूग्णांना मुंबई येथील जेजे हॉस्पिटलला हालविले. उद्भवलेली परिस्थिती गंभीर आहे. यामध्ये राज्याच्या आरोग्य विभागाची आब्रू चव्हाट्यावर येईल. म्हणून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तेव्हा झाला होता. याबाबत ह्यलोकमतह्ण ने हे प्रकरण उजेडात आणले होते. मात्र या प्रकरणात दोषी असलेल्या डॉक्टरांवर कारवाई झाली नव्हती.याप्रकरणी विश्वासनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनांमध्ये नांदेड येथील आ. अमर राजूरकर यांनी तारांकीत प्रश्न दाखल करताच  साडेतीन महिन्यात कुठलीच कारवाई न केलेले राज्य आरोग्य विभाग जागे झाले. शुक्रवारी बीड येथील नेत्र विभागातील डॉ. आर. आर. निरगुडे यांना याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, वरिष्ठांकडून सदरील विषयाबाबत माहिती मागविली आहे.कायमचे अंधत्व आलेल्यांचे काय?जिल्हा रूग्णालय प्रशासन व संबंधित डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अंधत्व आलेल्यांमध्ये धडधाकट महिला- पुरुषांचा समावेश आहे. त्यांच्यावर कुटुंबाची जबाबादारी आहे. त्यांना अद्याप शासनाने मदतीच्या रुपात फुटकी कवडीही दिली नाही. दृष्टी मागायला आले अन् आहे ती दृष्टी गमावून बसले, असा दुर्दैवी प्रसंग ओढावल्याने त्यांचे भवितव्य अंध:कारमय झाले आहे. त्यांची दृष्टी परत आणून देणार का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांनी उपस्थित केला आहे.यांना आले आहे कायमचे अंधत्व२१ एप्रिल २०१६ रोजी बीडच्या जिल्हा रूग्णालयात डोळ्याच्या शस्त्रक्रीये दरम्यान  सुभद्रा भोसले (रा. माजलगाव), मालनबाई जगदाडे (रा. केज), भागूबाई विघ्ने (रा. माजलगाव), विठ्ठल कोल्हे (रा. डोंगरकिन्ही), भानूदास विघ्ने (रा. माजलगाव) असे दृष्टी अधू झालेल्या रूग्णांची नावे आहेत.