शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मृत व्यक्तीला अतिक्रमण थांबविण्याची दिली नोटीस

By admin | Updated: October 31, 2016 02:40 IST

दहा वर्षापुर्वी मृत्यू झालेल्या नेरूळ गावामधील बाळकृष्ण शंकर पाटील यांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोटीस पाठविली आहे.

नवी मुंबई : दहा वर्षापुर्वी मृत्यू झालेल्या नेरूळ गावामधील बाळकृष्ण शंकर पाटील यांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोटीस पाठविली आहे. २४ तासामध्ये अनधिकृत बांधकाम स्वत: निष्कासित करा, अन्यथा महापालिका बांधकाम पाडेल व खर्च तुमच्याकडून वसूल करेल असा इशाराही देण्यात आला आहे. मृत व्यक्तीला दिलेल्या नोटीसमुळे पालिका प्रशासनाविषयी तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. नेरूळ गावामध्ये राहणाऱ्या संजय पाटील यांनी त्यांचे मोडकळीस आलेले घर पाडून नवीन बांधकाम केले आहे. महापालिकेच्या नेरूळ विभाग अधिकाऱ्यांनी २७ आॅक्टोंबरला त्यांच्या घरावर अनधिकृत बांधकामाची नोटीस चिटकविली आहे. ही नोटीस पाहून महापालिका प्रशासनाविषयी ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सिडको व राज्य शासनाने २०१२ पर्यंतची घरे नियमीत करण्याचे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिले आहे. पण प्रत्यक्षात गरजेपोटी बांधलेली घरे नियमीत करण्याऐवजी त्यांच्यावर हातोडा टाकण्यास सुरुवात झाली आहे. मूळ गावठाणांमध्ये अतिक्रमण विभागाकडून नोटीस देण्यास सुरवात झाली आहे. नेरूळच्या विभाग अधिकारी संध्या अंबादे यांनी बाळकृष्ण शंकर पाटील यांच्या नावाने नोटीस काढली आहे. महापालिकेची बांधकाम परवानगी न घेता बांधकाम करण्यात येत आहे. नोटीस मिळताक्षणी अनधिकृत बांधकाम थांबविण्यात यावे व २४ तासामध्ये पुर्ण बांधकाम हटविण्यात यावे. पालिकेच्या नोटीसकडे दुर्लक्ष केल्यास अतिक्रमण विभागाकडून इमारतीचे बांधकाम पाडण्यात येईल व पूर्ण खर्च वसूल केला जाईल असे स्पष्ट केले आहे. याशिवाय कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. बाळकृष्ण पाटील यांचे दहा वर्षापूर्वी निधन झाले आहे. महापालिकेने पाठविलेल्या नोटीसची तंतोतंत अंमलबजावणी करावी. चोवीस तासामध्ये पाटील यांनी स्वत: बांधकाम पाडले नाही तर पालिकेने इमारत पाडून खर्च मृत व्यक्तीकडून वसूल करावा अशी उपरोधीक टीका केली जात आहे. पालिका प्रशासन डोळे झाकून काम करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)>प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोषदिवाळीमध्येच महापालिकेनेमुळे गावठाणांमध्ये नोटीस पाठविल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तिव्र असंतोष निर्माण झाला आहे. सण, उत्सव आला की जाणीवपुर्वक प्रकल्पग्रस्तांना डिवचले जात आहे. वडीलोपर्जीत घर मोडकळीस आल्यानंतर ते कोसळेपर्यंत वाट पहायची काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. >मृत चालकाची केली होती बदलीपालिकेने आॅगस्टमध्ये तानाजी गायकवाड या मृत कर्मचाऱ्याची बदली केली होती. पत्र मिळताच तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजार व्हा अन्यथा कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर आता अतिक्रमणाची नोटीस देवून मृत व्यक्तीच्या परिवरातील सदस्यांच्या भावना दुखविल्या आहेत.