शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

मृत व्यक्तीला अतिक्रमण थांबविण्याची दिली नोटीस

By admin | Updated: October 31, 2016 02:40 IST

दहा वर्षापुर्वी मृत्यू झालेल्या नेरूळ गावामधील बाळकृष्ण शंकर पाटील यांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोटीस पाठविली आहे.

नवी मुंबई : दहा वर्षापुर्वी मृत्यू झालेल्या नेरूळ गावामधील बाळकृष्ण शंकर पाटील यांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोटीस पाठविली आहे. २४ तासामध्ये अनधिकृत बांधकाम स्वत: निष्कासित करा, अन्यथा महापालिका बांधकाम पाडेल व खर्च तुमच्याकडून वसूल करेल असा इशाराही देण्यात आला आहे. मृत व्यक्तीला दिलेल्या नोटीसमुळे पालिका प्रशासनाविषयी तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. नेरूळ गावामध्ये राहणाऱ्या संजय पाटील यांनी त्यांचे मोडकळीस आलेले घर पाडून नवीन बांधकाम केले आहे. महापालिकेच्या नेरूळ विभाग अधिकाऱ्यांनी २७ आॅक्टोंबरला त्यांच्या घरावर अनधिकृत बांधकामाची नोटीस चिटकविली आहे. ही नोटीस पाहून महापालिका प्रशासनाविषयी ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सिडको व राज्य शासनाने २०१२ पर्यंतची घरे नियमीत करण्याचे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिले आहे. पण प्रत्यक्षात गरजेपोटी बांधलेली घरे नियमीत करण्याऐवजी त्यांच्यावर हातोडा टाकण्यास सुरुवात झाली आहे. मूळ गावठाणांमध्ये अतिक्रमण विभागाकडून नोटीस देण्यास सुरवात झाली आहे. नेरूळच्या विभाग अधिकारी संध्या अंबादे यांनी बाळकृष्ण शंकर पाटील यांच्या नावाने नोटीस काढली आहे. महापालिकेची बांधकाम परवानगी न घेता बांधकाम करण्यात येत आहे. नोटीस मिळताक्षणी अनधिकृत बांधकाम थांबविण्यात यावे व २४ तासामध्ये पुर्ण बांधकाम हटविण्यात यावे. पालिकेच्या नोटीसकडे दुर्लक्ष केल्यास अतिक्रमण विभागाकडून इमारतीचे बांधकाम पाडण्यात येईल व पूर्ण खर्च वसूल केला जाईल असे स्पष्ट केले आहे. याशिवाय कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. बाळकृष्ण पाटील यांचे दहा वर्षापूर्वी निधन झाले आहे. महापालिकेने पाठविलेल्या नोटीसची तंतोतंत अंमलबजावणी करावी. चोवीस तासामध्ये पाटील यांनी स्वत: बांधकाम पाडले नाही तर पालिकेने इमारत पाडून खर्च मृत व्यक्तीकडून वसूल करावा अशी उपरोधीक टीका केली जात आहे. पालिका प्रशासन डोळे झाकून काम करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)>प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोषदिवाळीमध्येच महापालिकेनेमुळे गावठाणांमध्ये नोटीस पाठविल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तिव्र असंतोष निर्माण झाला आहे. सण, उत्सव आला की जाणीवपुर्वक प्रकल्पग्रस्तांना डिवचले जात आहे. वडीलोपर्जीत घर मोडकळीस आल्यानंतर ते कोसळेपर्यंत वाट पहायची काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. >मृत चालकाची केली होती बदलीपालिकेने आॅगस्टमध्ये तानाजी गायकवाड या मृत कर्मचाऱ्याची बदली केली होती. पत्र मिळताच तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजार व्हा अन्यथा कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर आता अतिक्रमणाची नोटीस देवून मृत व्यक्तीच्या परिवरातील सदस्यांच्या भावना दुखविल्या आहेत.