शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
3
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
4
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
5
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
6
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
7
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
8
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
9
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
10
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
11
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
12
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
13
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
14
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
15
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
16
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
17
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
18
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
19
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
20
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका

मृत व्यक्तीला अतिक्रमण थांबविण्याची दिली नोटीस

By admin | Updated: October 31, 2016 02:40 IST

दहा वर्षापुर्वी मृत्यू झालेल्या नेरूळ गावामधील बाळकृष्ण शंकर पाटील यांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोटीस पाठविली आहे.

नवी मुंबई : दहा वर्षापुर्वी मृत्यू झालेल्या नेरूळ गावामधील बाळकृष्ण शंकर पाटील यांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोटीस पाठविली आहे. २४ तासामध्ये अनधिकृत बांधकाम स्वत: निष्कासित करा, अन्यथा महापालिका बांधकाम पाडेल व खर्च तुमच्याकडून वसूल करेल असा इशाराही देण्यात आला आहे. मृत व्यक्तीला दिलेल्या नोटीसमुळे पालिका प्रशासनाविषयी तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. नेरूळ गावामध्ये राहणाऱ्या संजय पाटील यांनी त्यांचे मोडकळीस आलेले घर पाडून नवीन बांधकाम केले आहे. महापालिकेच्या नेरूळ विभाग अधिकाऱ्यांनी २७ आॅक्टोंबरला त्यांच्या घरावर अनधिकृत बांधकामाची नोटीस चिटकविली आहे. ही नोटीस पाहून महापालिका प्रशासनाविषयी ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सिडको व राज्य शासनाने २०१२ पर्यंतची घरे नियमीत करण्याचे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिले आहे. पण प्रत्यक्षात गरजेपोटी बांधलेली घरे नियमीत करण्याऐवजी त्यांच्यावर हातोडा टाकण्यास सुरुवात झाली आहे. मूळ गावठाणांमध्ये अतिक्रमण विभागाकडून नोटीस देण्यास सुरवात झाली आहे. नेरूळच्या विभाग अधिकारी संध्या अंबादे यांनी बाळकृष्ण शंकर पाटील यांच्या नावाने नोटीस काढली आहे. महापालिकेची बांधकाम परवानगी न घेता बांधकाम करण्यात येत आहे. नोटीस मिळताक्षणी अनधिकृत बांधकाम थांबविण्यात यावे व २४ तासामध्ये पुर्ण बांधकाम हटविण्यात यावे. पालिकेच्या नोटीसकडे दुर्लक्ष केल्यास अतिक्रमण विभागाकडून इमारतीचे बांधकाम पाडण्यात येईल व पूर्ण खर्च वसूल केला जाईल असे स्पष्ट केले आहे. याशिवाय कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. बाळकृष्ण पाटील यांचे दहा वर्षापूर्वी निधन झाले आहे. महापालिकेने पाठविलेल्या नोटीसची तंतोतंत अंमलबजावणी करावी. चोवीस तासामध्ये पाटील यांनी स्वत: बांधकाम पाडले नाही तर पालिकेने इमारत पाडून खर्च मृत व्यक्तीकडून वसूल करावा अशी उपरोधीक टीका केली जात आहे. पालिका प्रशासन डोळे झाकून काम करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)>प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोषदिवाळीमध्येच महापालिकेनेमुळे गावठाणांमध्ये नोटीस पाठविल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तिव्र असंतोष निर्माण झाला आहे. सण, उत्सव आला की जाणीवपुर्वक प्रकल्पग्रस्तांना डिवचले जात आहे. वडीलोपर्जीत घर मोडकळीस आल्यानंतर ते कोसळेपर्यंत वाट पहायची काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. >मृत चालकाची केली होती बदलीपालिकेने आॅगस्टमध्ये तानाजी गायकवाड या मृत कर्मचाऱ्याची बदली केली होती. पत्र मिळताच तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजार व्हा अन्यथा कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर आता अतिक्रमणाची नोटीस देवून मृत व्यक्तीच्या परिवरातील सदस्यांच्या भावना दुखविल्या आहेत.