शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

डोंबिवली एमआयडीसीला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2016 03:58 IST

प्रदूषणामुळे शहरातील रासायनिक कारखाने बंद असतानाही सोमवारी रसायनमिश्रित पाण्याने रामचंद्र नाल्याचा रंग लालभडक झाला.

डोंबिवली : प्रदूषणामुळे शहरातील रासायनिक कारखाने बंद असतानाही सोमवारी रसायनमिश्रित पाण्याने रामचंद्र नाल्याचा रंग लालभडक झाला. त्यातून पसरणाऱ्या वायुंमुळे अनेक नागरिकांना त्रास झाला. या घटनेची गंभीर दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी तातडीने पाहणी केली. यावेळी कंपन्यांच्या फुटलेल्या सांडपाण्याच्या वाहिन्या, त्यांचे तुडुंब भरून वाहणारे चेंबर असे चित्र दिसून आले. या प्रदूषणाकडे एमआयडीसीने दुर्लक्ष केल्याने मंडळाने एमआयडीसीला नोटीस बजावली आहे. ठराविक काळात दुरुस्ती व देखभाल करून पायाभूत सोयी-सुुविधा पुरावा, अशी सूचना या नोटिशीत केली आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील व उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुले यांनी मंगळवारी रामचंद्र नाल्याची पाहणी केली. या नाल्यात कुठून व कोणत्या कारखान्यातून पाणी सोडले जाते, याचा शोध घेतला. सोनारपाडा येथील कापड उद्योग कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याच्या वाहिन्या फुटल्या आहेत. त्याचे पाणी थेट नाल्यात मिसळत आहे. त्याचबरोबर वाहिनाला जोडलेले चेंबर टेम्पो नाका येथे तुडुंब भरून वाहत असल्याची परिस्थिती अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी एमआयडीसीला जाब विचारला. दुर्गुले यांनी सांगितले की, राष्ट्रीय हरित लवादाकडे असलेल्या ‘वनशक्ती’च्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, मंडळाने २ जुलैला डोंबिवलीतील ८६ रासायनिक कारखाने बंद ठेवले आहेत. त्यामुळे या कारखान्यातून सांडपाणी नाल्यात सोडले जात नाही. कापड उद्योग प्रक्रिया कारखाने सुरू आहेत. त्यातून तयार होणारे सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी फुटली आहे. त्यामुळे हे पाणी नाल्यात मिसळून नाल्याच्या पाण्याचा रंग लाल झाला होता. सांडपाणी प्रक्रिया केंद्र व सांडपाणी वाहून नेणारी वाहिनीची दुरुस्ती, देखभाल व एमआयडीसी परिसरातील कारखानदारांना पायाभूत सोयी-सुविधा पुरवण्याची जबाबदारी एमआयडीसीची आहे. एमआयडीसीने प्रक्रिया केलेले सांडपाणी वाहून नेऊन थेट खाडीत दूरवर सोडण्यासाठी उपाययोजना करणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेला ४५० कोटींचा खर्च येणार आहे. परंतु, त्यासाठी राष्ट्रीय सागरी संस्थेकडे परवानगी घ्यावी लागते. हा प्रकल्प खर्चिक असल्याने तो पूर्णत्वास येऊ शकत नाही. त्यासाठी निधी कुठून आणणार, असे कारण एमआयडीसीने राष्ट्रीय हरित लवादाकडे दिले होते. परंतु, लवादाने एमआयडीसीचे कारण ग्राह्य धरलेले नाही. काही झाले तरी एमआयडीसीला हे काम करावेच लागेल, असे लवादाने स्पष्ट केले होते. >सुनावणी २३ ला कारखानदारांनी बंद कारखान्याच्या नोटिशीला लवादाने स्थगिती द्यावी, यासाठी केलेल्या याचिकेवर लवादासमोर २३ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. तर ‘वनशक्ती’च्या याचिकेवर १ आॅक्टोबरला सुनावणी अपेक्षित आहेत.