शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

डेंग्यूग्रस्त १२ जिल्ह्यांना नोटिसा

By admin | Updated: November 5, 2014 04:17 IST

राज्यात डेंग्यूने थैमान घातल्यानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने डेंग्यूच्या उच्चाटनासाठी काम न करणा-या अधिका-याना फैलावर धरले आहे

पुणे : राज्यात डेंग्यूने थैमान घातल्यानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने डेंग्यूच्या उच्चाटनासाठी काम न करणा-या अधिका-याना फैलावर धरले आहे. उद्रेक झालेल्या १२ जिल्ह्यांतील जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना आरोग्य विभागाने तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.राज्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याने हिवताप विभागाच्या सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन डेंग्यूच्या स्थितीचा आढावा घेतला. यामध्ये १२ जिल्ह्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना डासांचा नायनाट करण्यासाठी आणि डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले होते. कामात कुचराई केल्याचे दिसून आल्याने डॉ. जगताप यांनी तातडीने चंद्रपूर, पुणे, बीड, सोलापूर, औरंगाबाद, अहमदनगर, भंडारा, गोंदिया, ठाणे, सातारा, अमरावती, रायगड या १२ जिह्यांतील जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. काही जिल्ह्यांमध्ये योग्य काम होत नसल्याचे दिसून आले. डेंग्यू वाढण्यामागचे हे एक कारण असल्याने त्यांना तातडीने कारणे दाखवा नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. या नोटिशींवर त्यांचा समाधानकारक खुलासा न आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. जगताप यांनी सांगितले.राज्यात गेल्या ३ महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून अनेकांना जीवही गमवावे लागले आहेत. एप्रिल ते सप्टेंबर या ६ महिन्यात राज्यात डेंग्यूचे तब्बल ३ हजार ५६५ रुग्ण आढळले आहेत. यापैकी २४ जणांचा मृत्यू झाला आहे.