शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

वनसचिवांना तुरुंगात टाकण्याची नोटीस

By admin | Updated: September 9, 2015 01:09 IST

वारणसी आणि कन्याकुमारी यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्र. ७ चा नागपूरजवळील मनसर आणि खवासा या दरम्यानचा भाग रुंद करण्याच्या कामासाठी बोगरा

मुंबई : वारणसी आणि कन्याकुमारी यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्र. ७ चा नागपूरजवळील मनसर आणि खवासा या दरम्यानचा भाग रुंद करण्याच्या कामासाठी बोगरा व पवनी वनक्षेत्रांतील झाडे तोडण्याचा आदेश झुगारून मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल केल्याबद्दल महाराष्ट्राचे वन सचिव व मुख्य वनसंरक्षकांना तुरुंगात टाकून त्यांच्या मालमत्ता जप्त का करू नयेत, अशी नोटिस राष्ट्रीय हरित लवादाने काढली आहे.झाडे न तोडण्याचा आदेश ५ आॅगस्ट रोजी देऊनही २६ आॅगस्टपासून त्या ऊागात महामार्गाच्या दुतर्फा असलेली झाडे तोडण्यात आल्याचे पुरावे सादर केले गेल्यानंतर न्यायाधिकरणाने वन सचिव, मुख्य वनसंरक्षख आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या राज्यातील महाव्यवस्थापकांना न्यायालयीन अवमानना कारवाईची (कन्टेम्प्ट) नोटीस काढली आहे. त्यात या अधिकाऱ्यांकडे, तुम्हाला तुरुंगात पाठवून मालमत्ता का जप्त करू नये, याचा खुलासा १४ सप्टेंबरपर्यंत मागविण्यात आला आहे.तसेच संदर्भित भागातील महामार्गालगतची झाडे यापुढे तोडली जाणार नाहीत याची खात्री करण्यास नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना व नागपूर परिमंडळाच्या पोलीस महानिरीक्षकांना सांगण्यात आले असून त्याचे पालन न झाल्यास तुम्हाला व्यक्तिश: जबाबदार धरण्यात येईल, असेही न्यायाधिकरणाने त्यांना बजावले आहे.महामार्गाची दुरुस्ती आणि विस्तारीकरण यासाठी ज्या भागातील जंगल तोडण्यात येत आहे तो भाग पेंच, कान्हा आणि नागझिरा या तीन व्राघ्र अभयारण्यांची सलगता कायम राखण्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. महाराष्ट्र सरकारने यंदाच्या डिसेंबरमध्ये हे काम सुरु करण्यास परवानगी दिली तर केंद्र सरकारने ४९.२४६ हेक्टरचे क्षेत्र वनक्षेत्रातून वगळण्याची अनुमती दिली.श्रृष्टी पर्यावरण मंडळ, कॉन्झर्व्हेशन अ‍ॅक्शन ट्रस्ट व अमरावती येथील नेचर कॉन्झर्व्हेशन अ‍ॅक्शन सोसायटी यांनी या विरोधात केलेल्या याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिरणात प्रलंबित आहेत. त्यातच झाडे तोडण्यास मनाई करणारा आदेश ५ आॅगस्ट रोजी दिला गेला होता. तरीही झाडे तोडली जात असल्याने श्रृष्टी पर्यावरण मंडळाने अ‍ॅड. ऋत्विक दत्त यांच्यामार्फत न्यायाधिकरणात ‘कन्टेम्प्ट’साठी अर्ज केला. त्यावर न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्या. स्वतंत्र कुमार व सदस्य एम. एस. नाम्बियार, डॉ. डी. के. अग्रवाल व प्रा. ए.आर. युसूफ यांच्या न्यायपीठाने वरील आदेश दिले. या कामासाठी सुमारे ३० हजार झाडांची कत्तल केली जाणार असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे म्हणणे असे की, हा भाग व्याघ्र प्रकल्पात मोडत असल्याने, सर्वोच्च न्यायालायने डिसेंबर २००६ मध्ये गोवा फौंडेशनच्या प्रकरणात दिलेल्या आदेशानुसार, राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची संमती घेतल्याशिवाय तेथे कोणतेही वनेतर काम करणे निषिद्ध आहे. अशी संमती न घेताच काम सुरु केले आहे.