शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘इन्कम टॅक्स’च्या ९ हजारजणांना नोटिसा

By admin | Updated: September 8, 2015 00:23 IST

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ : कोल्हापूर विभागातून नवी एक लाख आयकर खाती करण्याचे उद्दिष्ट; करदात्यांत खळबळ

संदीप खवळे - कोल्हापूर आयकर कार्यालयातंर्गत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे चार जिल्हे येतात. या जिल्ह्यांतील विविध व्यवहार केलेल्या पण आयकर विवरणपत्र न भरलेल्या नऊ हजारजणांना आयकर विभागाने पत्रे पाठविली आहेत. या पत्रांना उत्तर न दिल्यास कायदेशीर नोटिसही बजावण्यात येणार आहे. आयकरास (इन्कम टॅक्स) उत्पन्न पात्र असूनही आयकर विवरणपत्र न भरणाऱ्यांची माहिती संकलित करण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने यावर्षी देशभरातून एक कोटी नवीन आयकर खाती तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कोल्हापूर विभागासाठी हे उद्दिष्ट सुमारे एक लाखाच्या आसपास आहे. आयकर विवरणपत्र भरण्यासाठी ७ सप्टेंबर ही अंतिम मुदत होती. या पार्श्वभूमीवर आयकर कार्यालयाशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता ही माहिती मिळाली. सोमवारी विवरणपत्र न भरणाऱ्यांना आयकरपात्र उत्पन्नावर दर महिना एक टक्के व्याज आकारले जाणार आहे. ३१ मार्च २०१६ पर्यंत विवरणपत्र न भरल्यास पाच हजार रूपयांचा दंड होणार आहे. यावर्षी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने देशभरातून एक कोटी नवीन आयकर खाती उघडण्याचे उद्दिष्ट आयकर विभागाला दिले आहे. यासाठी जमीन हस्तांतरण व्यवहार, पाच लाखांवरील वाहन खरेदी, विविध कंत्राटामधून मिळालेले कमिशन, बँकेतील ठेवी, कमोडिटी बाजारातील गुंतवणूक, मोठया हॉटेलना देण्यात आलेली बिले, बचत खात्यावरील दोन लाखांपेक्षा जास्त व्यवहार, क्रेडिट कार्डवरील दोन लाखांपेक्षा जास्त व्यवहार, यासह सुमारे शंभर प्रकारच्या व्यवहारांशी संबंधित व्यवहारकर्त्यांना आयकर विभागाने रडारवर आणले आहे, अशी माहिती आयकर विभाग प्रधान आयुक्त, कोल्हापूर (रेंज -१) के. आर. मेघवाल यांनी दिली. मेघवाल म्हणाले, आयकरास पात्र असणाऱ्या व्यवहारांची माहिती विविध संस्थाच्या माध्यमातून संकलित करण्यास आयकर विभागाने सुरू केले आहे. आतापर्यंत आयकरास पात्र असलेल्या पण आयकर विवरणपत्र न भरलेल्या नऊ हजार व्यवहारकर्त्यांना पत्रे पाठविली आहेत. या पत्रांना उत्तरे न देणाऱ्यांना कायदेशीर नोटिसा काढल्या जाणार आहेत. आयकर विवरणपत्र भरण्यासाठी लवकर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून शिबिरे घेण्यात येणार आहेत. सहकारी संस्थानाही विवरणपत्रे पाठवणे बंधनकारक असून विवरणपत्रे भरण्यासाठी नऊ हजार पतसंस्थांना आतापर्यंत विवरणपत्र भरण्यासंबंधीची पत्रे पाठविली आहेत. आयकरास पात्र उत्पन्न असलेल्यांनी पुढाकार घेऊन विवरणपत्र भरावे. याशिवाय आयकरास पात्र नसलेल्या पण खात्यावर सतत उलाढाल करणाऱ्यांनीही आयकर विवरणपत्रे भरावित. ई - फायलिंगचा टक्का वाढला आयकर विवरणपत्रे आॅनलाईन भरण्याची सोय असल्यामुळे गेल्या काही वर्षात लिखित विवरणपत्र भरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मंगळवारी सांयकाळी पाचपर्यंत कोल्हापूर आयकर विभागातील रेंज-१ मध्ये ३५१३ लिखित आयकर विवरणपत्रे भरण्यात आली. मागील वर्षी हाच आकडा ६१८२ इतका होता. आयकरासाठी वैयक्तिक करदात्याबरोबरच कंपनी, संस्थाही आयकराच्या कक्षेत आहेत. सन २०१५ - १६ कररचना २०१५ च्या अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार अडीच लाखांपर्यंतच उत्पन्न हे करमुक्त आहे. अडीच ते पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर दहा टक्के कर आकारला जातो. पाच ते दहा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के दराने करआकारणी होते. दहा लाखांवर ३० टक्के कर आकारला जातो.