शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

एलबीटी घोटाळासंबंधी ५० कर्मचाऱ्यांना नोटीस

By admin | Updated: December 21, 2015 02:08 IST

महापालिका एलबीटी विभागातील घोटाळ्याप्रकरणी सामान्य प्रशासन विभागाने आयुक्तांच्या आदेशान्वये ५० कर्मचाऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत

उल्हासनगर : महापालिका एलबीटी विभागातील घोटाळ्याप्रकरणी सामान्य प्रशासन विभागाने आयुक्तांच्या आदेशान्वये ५० कर्मचाऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत. या प्रकाराने खळबळ उडाली असून, ३ महिन्यापूर्वीच १६ कर्मचाऱ्यांना निलंबित करत आयुक्तांनी विभागीय चौकशी सुरू केली आहे. शासन निर्णयानुसार पालिकेतील जकात बंद करून एलबीटी सुरू करण्यात आली. जकातीपासून दरमहा १६ कोटी तर एलबीटीपासून ८ कोटींचे उत्पन्न पालिकेला मिळाले आहे. कर्मचारी, व्यापारी व स्थानिक नेत्यांच्या संगनमताने एलबीटी उत्पन्न कमी झाल्याची टीका होऊन त्यात नगरसेवक गुंतल्याची चर्चा महासभेत झाली. विभागाचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी कर्मचाऱ्यांच्या चौकशीची मागणी आयुक्तांकडे लावून धरली होती. त्यानुसार, चौकशी सुरू झाली आहे.पालिका आयुक्तांच्या आदेशान्वये सामान्य प्रशासन विभागाने शनिवारी ५० कर्मचाऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत. एलबीटीचे उत्पन्न कमी का, याचे स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांना द्यावे लागणार असून चौकशीअंती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली आहे. एलबीटी कर प्रणालीपूर्वी जकातीपासून पालिकेला दरमहा १६ कोटींचे उत्पन्न मिळत होते. त्यानुसार, एलबीटीपासून किमान १८ कोटींचे दरमहा उत्पन्न अपेक्षित होते. ९० टक्के व्यापाऱ्यांचे विवरणपत्र नाही एलबीटी विभागातील ९० टक्के व्यापाऱ्यांनी वर्षानुवर्षांचे वार्षिक विवरणपत्र सादर केले नसल्याची माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे. विभागाने १२ हजारांपेक्षा जास्त व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवून ५ हजार रुपये दंड ठोठावला. तसेच ७० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांवर वसुली कमी करणे, व्यवहारात अनियमितता, वारंवार तक्रारी असा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यापैकी ५० कर्मचाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाने नोटिसा पाठवून कारणे मागितली आहेत.