शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

नोटबंदी : जेवण करा, पैसे जमेल तेव्हा द्या

By admin | Updated: November 15, 2016 20:10 IST

चलनातील जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलानातून बाद करण्याच्या निर्णय जाहीर झाल्यानंतर सामान्य माणसांपासून ते पैशावाल्यांचीही तारांबळ उडली आहे.

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 15 -  चलनातील जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलानातून बाद करण्याच्या निर्णय जाहीर झाल्यानंतर सामान्य माणसांपासून ते पैशावाल्यांचीही तारांबळ उडली आहे. सुट्या पैशांचा अभावातून नवीन आलेली दोन हजार रुपयांची नोटही कोणी घेईना, अशातच खाण्या-पिण्याची अबाळ होणे ही प्रत्येकांची सामूहिक समस्या झाली होती. परंतु, मुंबई आग्रा हायवेवरील दहावा मैल परिसरातील हॉटेल रिलॅक्स कॉर्नरच्या मालकांनी या सामूहिक समस्यांनी ग्रासलेल्या नागरिकांप्रती सहानुभूती दाखवत ‘हजार, पाचशेच्या नोटांची चिंता सोडा, जेवण करा आणि पैसे तुम्हाला जमेल तेव्हा द्या’ असे फलक लावले आहे. 
मुंबई-आग्रा महामार्गावर हॉटेल रिलॅक्स शाकाहारी फॅमिली गार्डन रेस्टॉरंटमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी बँक खात्यावर रक्कम जमा करण्याचा, डेबीट, क्रेडीट कार्डने बील देण्याचा पर्याय उपलबद्ध असतानाही हॉटेलच्या संचालकांनी प्रवासातील नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या हेतूने हा निर्णय घेतला आहे. प्रवासात असणाºया नागरिकांनी सुटे पैसे नाहीत म्हणून कोणताही विचार न करता येथे पोटभर जेवन करा आणि पुन्हा या मार्गावरून परताना पैसे द्या, असे आवाहन हॉटेलच्या संचालकांनी केले आहे. हॉटेलचा हा निर्णय कौतुकास्पद असून सोशल मीडियावर त्याची चर्चा झाली नाही तर नवलच! केवळ जून्या नोटेमुळे कोणी उपाशी राहू नये, हा साधा विचार या हॉटेलने केला आहे. त्यामुळे अनेकांची किमान जेवणाची समस्या तरी दूर झाली. गेल्या मंगळवारी मध्यरात्रीपासून या नोटा चलनातून बाद झाल्याने व्यवसायिकांनी या नोटा स्वीकारण्यास नकार दिला होता. पण नंतर राज्यसरकारने आदेश दिल्यानंतर काही ठिकाणी नोटा स्विकारल्या जात असल्या तरी सर्वसामान्य प्रवास्यांची समस्या दूर करण्यासाठी अशाप्रकारे समाजातील विविध घटकांनी पुढे येण्याची गरज व्यक्त होत आहे. 
 
ज्यांच्याकडे ५०० आणि १००० रु पयांच्या नोटा आहेत त्यांनी जेवणाची चिंता करू नये. निसंकोच मनाने जेवण करून घ्यावे अणि पुढच्या वेळी बिलाचे पैसे द्यावे. ज्यांच्याकडे मोठ्या रकमेच्या नोटा आहेत. त्यांचा प्रश्न आम्ही सोडविण्याचा प्रयत्न करतो. परंतु, ज्यांच्याकडे जुन्या नोटा आहेत. ते प्रवासी संकोच करतात. म्हणून आम्ही असे फलक लावून आवाहन केले आहे. व्यवहार महत्वाचा असला तरी शेवटी माणूसच माणचाच्या कामी येणार नाही तर मग कोण येणार
-  भीमाबाई जोंधळे,संचालक, हॉटेल रिलॅक्स कॉर्नर, दहावा मैल.