शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

पंजाबी साहित्य संमेलनाला नोटबंदीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2016 06:36 IST

येत्या १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान येथे होत असलेल्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनाला नोटाबंदी तसेच आचारसंहितेचा फटका बसत आहे.

पुणे : येत्या १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान येथे होत असलेल्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनाला नोटाबंदी तसेच आचारसंहितेचा फटका बसत आहे. आचारसंहितेमुळे पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात येणारा दोन कोटींचा निधी नांदेडच्या गुरू गोविंदसिंग अध्यासनाकडे वर्ग करावा, अशा आशयाचे पत्र केंद्र सरकारला पाठविल्याची माहिती ‘सरहद’चे संस्थापक संजय नहार यांनी दिली.संमेलनासाठी केंद्र सरकारने दोन कोटी रुपये, पंजाब सरकारसह राज्य सरकार व महापालिकेकडून अनुक्रमे २५ लाख रुपये देण्यात येणार होते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागू झाली आहे. त्याचा फटका संमेलनाला बसला आहे. संमेलनाचे अडीच कोटींचे बजेट १ कोटी २० लाखांवर आले आहे. त्यामुळे ४० ते ५० लाख रुपयांची तूट भासत आहे, मात्र पंजाबी बांधवांनीच पुढाकार घेऊन रक्कम उभी केली आहे. त्यामुळे कदाचित संमेलनासाठी केंद्र, राज्य आणि महापालिकेकडून निधीची गरज भासणार नाही. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयाकडून संबंधित पत्र पाठविल्याचे नहार यांनी सांगितले.अमृतसरमधील गुरुनानक विद्यापीठातील नामदेव अध्यासनाला २५ लाख रुपये द्यावेत, अशी विनंती पंजाब सरकारला केल्याची माहितीही नहार यांनी दिली. (प्रतिनिधी)

टपाल खात्यामध्ये संमेलनाच्या पत्रिका टाकायच्या होत्या. मात्र जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी मोठी रांग होती. कुरियरवाले ५००च्या नोटा स्वीकारण्यास तयार नव्हते. पंजाबपासून पुण्यापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली आहे, मात्र ट्रान्सपोर्टसह डिझेलसाठी पैशांच्या अडचणी आल्या. हे संमेलन तूर्तास रद्द करावे, अशी सूचनाही पंजाब व महाराष्ट्र सरकारने केली होती. मात्र अडचणींवर मात करीत आम्ही संमेलन यशस्वी करु, असे ‘सरहद’चे संस्थापक संजय नहार यांनी सांगितले.