शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
4
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
5
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
6
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
7
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
8
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
9
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
10
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
11
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
12
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
13
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
14
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
15
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
16
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
17
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
18
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
19
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
20
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी

देशाला स्मार्ट सिटी नव्हे, स्मार्ट व्हिलेजची गरज!

By admin | Updated: February 3, 2015 17:29 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली़ देशाला स्मार्ट सिटी नव्हे, तर स्मार्ट व्हिलेजची गरज असल्याचे मत हजारे यांनी व्यक्त केले़

पारनेर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व भारत स्वाभिमान चळवळीचे नेते गोविंदाचार्य यांनी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली़ देशाला स्मार्ट सिटी नव्हे, तर स्मार्ट व्हिलेजची गरज असल्याचे मत हजारे यांनी व्यक्त केले़गोविंदाचार्य यांनी यादवबाबा मंदिर, नापासांची शाळा, मीडिया सेंटर, पद्मावती परिसर आणि पाणलोट क्षेत्र विकासाविषयी माहिती घेतल्यानंतर दुपारी हजारे यांच्याशी सविस्तर चर्चा केली़ लोकपालची अंमलबजावणी, भूमी अधिग्रहण विधेयक मागे घ्यावे व काळ्या पैशासंबंधी कार्यवाही या तीन मुद्द्यांवर हजारे यांनी नुकताच मोदी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व आहे.बैठकीत लोकपाल, भूमी अधिग्रहण, काळा पैसा आणि ग्रामविकास यासंबंधी चर्चा झाली. ग्रामविकासाच्या मुद्द्यावर गोविंदाचार्य यांनी हजारे यांच्याशी सहमती दर्शवत गांधीजींच्या विचारानेच खरा विकास होऊ शकतो आणि त्यासाठी फुगणारी शहरे व नैसर्गिक साधनसंपत्तीचे शोषण थांबविणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले़ केंद्र सरकारने ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रित करून स्मार्ट व्हिलेजची योजना राबवायला हवी, अशी सूचना त्यांनी मांडली़ सुमारे ९ महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही केंद्र सरकारचे धोरण सामान्य माणसाच्या हिताचे दिसत नाही, अशी टीका करीत त्यासाठी समविचारी लोकांशी विचारविनिमय करून देशभरात नव्याने संघटन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. गोविंदाचार्य यांच्यासोबत मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र बिस्ट उपस्थित होते. बैठकीनंतर दोघांनी युरोपमधून आलेल्या ४० महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी मोदी सरकार, भारतासमोरील आव्हाने, भ्रष्टाचारविरोधी चळवळ, तरुणांना प्रेरणा इत्यादी मुद्द्यांवर अण्णांशी चर्चा केली. (प्रतिनिधी)