शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

एकाही वाघाची शिकार नाही !

By admin | Updated: March 17, 2016 00:46 IST

वनविभागातर्फे सर्वच वन्यजिवांच्या संरक्षणाची काळजी घेतली जात आहे. वाघांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने विशेष व्याघ्र संरक्षण पथक स्थापन केले आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांत

वनविभागातर्फे सर्वच वन्यजिवांच्या संरक्षणाची काळजी घेतली जात आहे. वाघांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने विशेष व्याघ्र संरक्षण पथक स्थापन केले आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांत राज्यात एकाही वाघाची शिकार झालेली नाही, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. नवेगाव- नागझिरा अभयारण्यातील प्राण्यांच्या संरक्षणाबाबतचा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पतंगराव कदम, मकरंद जाधव, विजय वडेट्टीवार यांनी विचारला होता. यावर उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, ‘वनविभागाने वन्यजीव संरक्षणासाठी योजलेले उपायांची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. केंद्र सरकारने ताडोबा अंधारी, पेंच व मेळघाट या व्याघ्र प्रकल्पांना ‘उत्तम’ वरून ‘अतिउत्तम’ अशी श्रेणी दिली आहे. नवेगाव- नागझिराचे मूल्यांकन अद्याप झालेले नाही. येत्या काळात या व्याघ्र प्रकल्पाचेही मूल्यांकन केले जाईल. प्राण्यांच्या सुरक्षेसाठी ५६ संरक्षण कुट्या तयार करण्यात आल्या आहेत. ५६४ कॅमेरा टॅप व ६४ ठिकाणी जीपीएस लावले आहेत. वाघांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी राखीव क्षेत्रांत १३१ कृत्रिम पाणवठे व दोन खोदतळे करण्यात आले आहेत.’ (प्रतिनिधी)२५ वर्षे असेच प्रश्न विचारा !अजित पवार, पतंगराव कदम, विजय वडेट्टीवार यासारख्या महत्त्वाच्या नेत्यांनी वाघ संरक्षणाबाबत संवेदनशीलता दाखवत अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. मी विठ्ठल चरणी प्रार्थना करतो की, पुढील २५ वर्षे त्यांनी असेच लोकहिताचे प्रश्न विचारावे व मला अशीच उत्तरे देण्याची संधी मिळो, असा टोला वनमंत्री मुनगंटीवार यांनी लगावला.