शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

एकाही वाघाची शिकार नाही !

By admin | Updated: March 17, 2016 00:46 IST

वनविभागातर्फे सर्वच वन्यजिवांच्या संरक्षणाची काळजी घेतली जात आहे. वाघांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने विशेष व्याघ्र संरक्षण पथक स्थापन केले आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांत

वनविभागातर्फे सर्वच वन्यजिवांच्या संरक्षणाची काळजी घेतली जात आहे. वाघांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने विशेष व्याघ्र संरक्षण पथक स्थापन केले आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांत राज्यात एकाही वाघाची शिकार झालेली नाही, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. नवेगाव- नागझिरा अभयारण्यातील प्राण्यांच्या संरक्षणाबाबतचा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पतंगराव कदम, मकरंद जाधव, विजय वडेट्टीवार यांनी विचारला होता. यावर उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, ‘वनविभागाने वन्यजीव संरक्षणासाठी योजलेले उपायांची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. केंद्र सरकारने ताडोबा अंधारी, पेंच व मेळघाट या व्याघ्र प्रकल्पांना ‘उत्तम’ वरून ‘अतिउत्तम’ अशी श्रेणी दिली आहे. नवेगाव- नागझिराचे मूल्यांकन अद्याप झालेले नाही. येत्या काळात या व्याघ्र प्रकल्पाचेही मूल्यांकन केले जाईल. प्राण्यांच्या सुरक्षेसाठी ५६ संरक्षण कुट्या तयार करण्यात आल्या आहेत. ५६४ कॅमेरा टॅप व ६४ ठिकाणी जीपीएस लावले आहेत. वाघांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी राखीव क्षेत्रांत १३१ कृत्रिम पाणवठे व दोन खोदतळे करण्यात आले आहेत.’ (प्रतिनिधी)२५ वर्षे असेच प्रश्न विचारा !अजित पवार, पतंगराव कदम, विजय वडेट्टीवार यासारख्या महत्त्वाच्या नेत्यांनी वाघ संरक्षणाबाबत संवेदनशीलता दाखवत अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. मी विठ्ठल चरणी प्रार्थना करतो की, पुढील २५ वर्षे त्यांनी असेच लोकहिताचे प्रश्न विचारावे व मला अशीच उत्तरे देण्याची संधी मिळो, असा टोला वनमंत्री मुनगंटीवार यांनी लगावला.