शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

सत्तेशी नाही, माझी बांधिलकी शेतक-याशी, जनतेशी - उद्धव ठाकरे

By admin | Updated: July 12, 2017 14:42 IST

मी सत्तेशी बांधिल नाही. माझी बांधिलकी शेतकरी, जनतेशी आहे असे उद्धव ठाकरे यांनी धरणगाव येथील सभेत बोलताना सांगितले.

 ऑनलाइन लोकमत 

जळगाव, दि. 12 - मी सत्तेशी बांधिल नाही. माझी बांधिलकी शेतकरी, जनतेशी आहे असे उद्धव ठाकरे यांनी धरणगाव येथील सभेत बोलताना सांगितले. शिवसेना ज्या सरकारमध्ये सहभागी आहे त्या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली ही चांगली बाब आहे पण प्रत्यक्षात कर्जमाफीची अंमलबजावणी सुरु झाली की नाही हे पाहण माझी जबाबदारी आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवसेनेने सरकारला शेतक-यांपुढे झुकायला लावलं असे उद्धव ठाकरे म्हणाले. 
 
उद्धव ठाकरे आज खान्देशच्या दौ-यावर आहेत. सर्वप्रथम पाळधी येथे त्यांनी शेतक-यांशी संवाद साधला. राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली मात्र अद्याप शेतक-यांना लाभ मिळालेला नाही. जोपर्यंत लाभ मिळत नाही व शेतक-यांचा सातबारा कोरा होत नाही, तोपर्यंत आपला लढा सुरुच राहणार असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बुधवारी जळगाव पाळधी येथे शेतक-यांशी संवाद साधताना सांगितले. 
 
कर्जमुक्तीची यादी विधानसभेत मागणार -   उद्धव ठाकरे
कर्जमुक्तीची मर्यादा २०१६ नव्हे तर २०१७ करण्यात यावी, तसेच कर्जमुक्तीची यादी विधानसभेत मागण्यात येईल, ही यादी घरोघरी जावून तपासण्यात येईल, असे प्रतिपादन   उद्धव ठाकरे यांनी  शेतकरी संवाद सभेत केले. 
 
ठाकरे यांच्यासोबत परिवहन मंत्री दिवाकर रावते, रामदास कदम व सहकार राज्यमंत्री गुलाबराव टील उपस्थित होते. जळगाव विमानतळावर उध्दव ठाकरे यांचे स्वागत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी केले. यावेळी ठाकरे यांनी सुरेशदादा यांच्या तब्येतीची विचारणा केली. त्यानंतर ते पाळधीकडे रवाना झाले. पाळधीत त्यांनी गुलाबराव पाटील यांच्या कार्याचे कौतुक करीत एक चांगला शिवसैनिक दिल्याबद्दल पाळधीकरांचे आभार मानले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.  अवघे तीन मिनिटे त्यांनी संवाद साधला व ते धरणगाव येथे होणा-या सभेसाठी रवाना झाले. 
 
आणखी वाचा 
...तर मोदींच्या अंगात हिटलरचा संचार झाला तरी चालेल - उद्धव ठाकरे
नारायण राणे आणि उद्धव ठाकरे तब्बल 12 वर्षानंतर एकाच मंचावर
उद्धव ठाकरे म्हणजे सत्तेतील विनोदी नट
 
दरम्यान अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरुन उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून नरेंद्र मोदींवर सडेतोड टीका केली.अतिरेकी व पाकडय़ांना कडक संदेश द्यायचा असेल तर पुढच्या आठ दिवसांत ३७० कलम हटवून कश्मीर हिंदुस्थानचाच अविभाज्य भाग असल्याचे जगाला दाखवून द्या. वीरश्रीयुक्त भाषणे व धमक्यांनी जनतेचे कान विटले आहेत. देशाला ‘ऍक्शन’ हवी आहे व त्यासाठी पंतप्रधानांच्या अंगात हिटलरचा संचार झाला तरी चालेल असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.