शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
3
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
4
ट्रेन सुटली तरीही वेस्ट जत नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
5
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
6
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...
7
जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...
8
भारतीय कुटुंबांची 'बचत' सवय मोडली? ५० वर्षांतील सर्वात कमी बचत दर, गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले असं असेल तर..
9
बिहारमधील नेत्यासाठी जगदीप धनखड यांचा राजीनामा, काँग्रेस नेत्याचा नवा दावा
10
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
11
"पंडित नेहरुंनी मांडीवर बसवलं, गुलाबाचं फूल दिलं", सचिन पिळगावकरांचा हा किस्सा माहितीये का?
12
Rajasthan Accident: देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; पाच ठार, चार जण जखमी!
13
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
14
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
15
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
16
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
17
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
18
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
19
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
20
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!

सत्तेशी नाही, माझी बांधिलकी शेतक-याशी, जनतेशी - उद्धव ठाकरे

By admin | Updated: July 12, 2017 14:42 IST

मी सत्तेशी बांधिल नाही. माझी बांधिलकी शेतकरी, जनतेशी आहे असे उद्धव ठाकरे यांनी धरणगाव येथील सभेत बोलताना सांगितले.

 ऑनलाइन लोकमत 

जळगाव, दि. 12 - मी सत्तेशी बांधिल नाही. माझी बांधिलकी शेतकरी, जनतेशी आहे असे उद्धव ठाकरे यांनी धरणगाव येथील सभेत बोलताना सांगितले. शिवसेना ज्या सरकारमध्ये सहभागी आहे त्या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली ही चांगली बाब आहे पण प्रत्यक्षात कर्जमाफीची अंमलबजावणी सुरु झाली की नाही हे पाहण माझी जबाबदारी आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवसेनेने सरकारला शेतक-यांपुढे झुकायला लावलं असे उद्धव ठाकरे म्हणाले. 
 
उद्धव ठाकरे आज खान्देशच्या दौ-यावर आहेत. सर्वप्रथम पाळधी येथे त्यांनी शेतक-यांशी संवाद साधला. राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली मात्र अद्याप शेतक-यांना लाभ मिळालेला नाही. जोपर्यंत लाभ मिळत नाही व शेतक-यांचा सातबारा कोरा होत नाही, तोपर्यंत आपला लढा सुरुच राहणार असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बुधवारी जळगाव पाळधी येथे शेतक-यांशी संवाद साधताना सांगितले. 
 
कर्जमुक्तीची यादी विधानसभेत मागणार -   उद्धव ठाकरे
कर्जमुक्तीची मर्यादा २०१६ नव्हे तर २०१७ करण्यात यावी, तसेच कर्जमुक्तीची यादी विधानसभेत मागण्यात येईल, ही यादी घरोघरी जावून तपासण्यात येईल, असे प्रतिपादन   उद्धव ठाकरे यांनी  शेतकरी संवाद सभेत केले. 
 
ठाकरे यांच्यासोबत परिवहन मंत्री दिवाकर रावते, रामदास कदम व सहकार राज्यमंत्री गुलाबराव टील उपस्थित होते. जळगाव विमानतळावर उध्दव ठाकरे यांचे स्वागत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी केले. यावेळी ठाकरे यांनी सुरेशदादा यांच्या तब्येतीची विचारणा केली. त्यानंतर ते पाळधीकडे रवाना झाले. पाळधीत त्यांनी गुलाबराव पाटील यांच्या कार्याचे कौतुक करीत एक चांगला शिवसैनिक दिल्याबद्दल पाळधीकरांचे आभार मानले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.  अवघे तीन मिनिटे त्यांनी संवाद साधला व ते धरणगाव येथे होणा-या सभेसाठी रवाना झाले. 
 
आणखी वाचा 
...तर मोदींच्या अंगात हिटलरचा संचार झाला तरी चालेल - उद्धव ठाकरे
नारायण राणे आणि उद्धव ठाकरे तब्बल 12 वर्षानंतर एकाच मंचावर
उद्धव ठाकरे म्हणजे सत्तेतील विनोदी नट
 
दरम्यान अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरुन उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून नरेंद्र मोदींवर सडेतोड टीका केली.अतिरेकी व पाकडय़ांना कडक संदेश द्यायचा असेल तर पुढच्या आठ दिवसांत ३७० कलम हटवून कश्मीर हिंदुस्थानचाच अविभाज्य भाग असल्याचे जगाला दाखवून द्या. वीरश्रीयुक्त भाषणे व धमक्यांनी जनतेचे कान विटले आहेत. देशाला ‘ऍक्शन’ हवी आहे व त्यासाठी पंतप्रधानांच्या अंगात हिटलरचा संचार झाला तरी चालेल असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.