शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

सत्तेशी नाही, माझी बांधिलकी शेतक-याशी, जनतेशी - उद्धव ठाकरे

By admin | Updated: July 12, 2017 14:42 IST

मी सत्तेशी बांधिल नाही. माझी बांधिलकी शेतकरी, जनतेशी आहे असे उद्धव ठाकरे यांनी धरणगाव येथील सभेत बोलताना सांगितले.

 ऑनलाइन लोकमत 

जळगाव, दि. 12 - मी सत्तेशी बांधिल नाही. माझी बांधिलकी शेतकरी, जनतेशी आहे असे उद्धव ठाकरे यांनी धरणगाव येथील सभेत बोलताना सांगितले. शिवसेना ज्या सरकारमध्ये सहभागी आहे त्या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली ही चांगली बाब आहे पण प्रत्यक्षात कर्जमाफीची अंमलबजावणी सुरु झाली की नाही हे पाहण माझी जबाबदारी आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवसेनेने सरकारला शेतक-यांपुढे झुकायला लावलं असे उद्धव ठाकरे म्हणाले. 
 
उद्धव ठाकरे आज खान्देशच्या दौ-यावर आहेत. सर्वप्रथम पाळधी येथे त्यांनी शेतक-यांशी संवाद साधला. राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली मात्र अद्याप शेतक-यांना लाभ मिळालेला नाही. जोपर्यंत लाभ मिळत नाही व शेतक-यांचा सातबारा कोरा होत नाही, तोपर्यंत आपला लढा सुरुच राहणार असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बुधवारी जळगाव पाळधी येथे शेतक-यांशी संवाद साधताना सांगितले. 
 
कर्जमुक्तीची यादी विधानसभेत मागणार -   उद्धव ठाकरे
कर्जमुक्तीची मर्यादा २०१६ नव्हे तर २०१७ करण्यात यावी, तसेच कर्जमुक्तीची यादी विधानसभेत मागण्यात येईल, ही यादी घरोघरी जावून तपासण्यात येईल, असे प्रतिपादन   उद्धव ठाकरे यांनी  शेतकरी संवाद सभेत केले. 
 
ठाकरे यांच्यासोबत परिवहन मंत्री दिवाकर रावते, रामदास कदम व सहकार राज्यमंत्री गुलाबराव टील उपस्थित होते. जळगाव विमानतळावर उध्दव ठाकरे यांचे स्वागत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी केले. यावेळी ठाकरे यांनी सुरेशदादा यांच्या तब्येतीची विचारणा केली. त्यानंतर ते पाळधीकडे रवाना झाले. पाळधीत त्यांनी गुलाबराव पाटील यांच्या कार्याचे कौतुक करीत एक चांगला शिवसैनिक दिल्याबद्दल पाळधीकरांचे आभार मानले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.  अवघे तीन मिनिटे त्यांनी संवाद साधला व ते धरणगाव येथे होणा-या सभेसाठी रवाना झाले. 
 
आणखी वाचा 
...तर मोदींच्या अंगात हिटलरचा संचार झाला तरी चालेल - उद्धव ठाकरे
नारायण राणे आणि उद्धव ठाकरे तब्बल 12 वर्षानंतर एकाच मंचावर
उद्धव ठाकरे म्हणजे सत्तेतील विनोदी नट
 
दरम्यान अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरुन उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून नरेंद्र मोदींवर सडेतोड टीका केली.अतिरेकी व पाकडय़ांना कडक संदेश द्यायचा असेल तर पुढच्या आठ दिवसांत ३७० कलम हटवून कश्मीर हिंदुस्थानचाच अविभाज्य भाग असल्याचे जगाला दाखवून द्या. वीरश्रीयुक्त भाषणे व धमक्यांनी जनतेचे कान विटले आहेत. देशाला ‘ऍक्शन’ हवी आहे व त्यासाठी पंतप्रधानांच्या अंगात हिटलरचा संचार झाला तरी चालेल असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.