शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत 3 जुलै रोजी पुन्हा "नॉट इन माय नेम"

By admin | Updated: July 1, 2017 12:20 IST

28 जून रोजी झुंडशाही विरोधात देशभरातील विविध शहरांमध्ये निदर्शने केल्यानंतर आता तीन जुलै रोजी मुंबईमध्ये पुन्हा नॉट इन माय नेम ही निदर्शने करण्यात येणार आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.1- 28 जून रोजी झुंडशाही विरोधात देशभरातील विविध शहरांमध्ये निदर्शने केल्यानंतर आता तीन जुलै रोजी मुंबईमध्ये पुन्हा "नॉट इन माय नेम" ही निदर्शने करण्यात येणार आहेत.  सोमवार 3 जुलै रोजी दुपारी चारनंतर दादर येथील वीर कोतवाल उद्यानापासून चैत्यभूमीपर्यंत हा झुंडशाहीविरोधात निषेध व्यक्त केला जाणार आहे. 
नवी दिल्लीमधून हरियाणामध्ये जाणाऱ्या जुनैद खानची जमावातर्फे हत्या करण्यात आल्यानंतर याबद्दल समाजातील विविध घटकांमधून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. दिल्लीमधील चित्रपट निर्माते राहुल रॉय आणि त्यांची पत्नी सबा दिवान यांनी याबाबत दिल्लीमधील जंतरमंतर येथे निदर्शने करण्याचा संकल्प फेसबूकवर व्यक्त केला होता. त्याला देशभरातून आणि देशाबाहेरही मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे 28 जून रोजी नवी दिल्लीसह देशातील बंगळुरु, मुंबई, कोलकाता तसेच अनेक मोठ्या शहरांमध्ये ही निदर्शने करण्यात आली. मुंबईमध्ये वांद्रे येथील कार्टर रोड येथे सुमारे 1000 नागरिकांनी एकत्र येऊन नॉट इन माय नेम लिहिलेले फलक उंचावून निषेध व्यक्त केला होता. आता सोमवारी पुन्हा दादर येथे ही निदर्शने करण्यात येणार आहेत.
नॉट इन माय नेम निदर्शनांमध्ये मी का सामील झालो ? - हरिश सदानी, मेन अगेन्स्ट वूमेन अब्यूज
2015 साली दादरीमध्ये अखलाखला त्याच्या घरामध्ये बीफ असल्याचा संशय घेऊन जमावाने ठार मारले. त्यानंतरही बीफ असल्याचा संशय घेऊन जमावाने कायदा हातात घेऊन हत्या करण्याच्या काही घटना घडल्या. आता जुनैदची हत्या झाल्यानंतर सबा दिवानने फेसबुकवर याबाबत संताप व्यक्त करत झुंडशाहीचा निषेध करण्याचे ठरवले. नॉट इन माय नेम या नावाने सुरु झालेले हे आंदोलन देशात आणि देशाबाहेर पसरले. सोशल मीडियावर उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर मुंबईतील कार्टर रोड येथे आम्ही जमण्याचे ठरवले. समाजातील विविध स्तरातील लोक यामध्ये सामील झाले होते. जर सामान्य लोक स्वतःहून या निदर्शनांमध्ये सामील होतात तर आपण का मागे राहावे अशीच भावना यामध्ये सहभाग घेताना आमची होती. चित्रपट निर्माते, पत्रकार, कलाकार, महाविद्यालयीन तरुण असे विविध क्षेत्रातील लोक तेथे आले होते. कल्की कोचलिन, शबाना आझमी, रजत कपूर, आनंद पटवर्धन यांनीही यावेळेस उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधला. सर्वांनी नॉट इन माय नेमचे फलक हातात घेऊन रिंगण केले, तसेच गाण्यांद्वारेही आपला निषेध व्यक्त केला. यावेळेस कोणतीही घोषणाबाजी करण्यात आली नाही.  कदाचित याचाच परिणाम म्हणून किंवा देशभरातून उमटणाऱ्या निषेधामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परवा गोरक्षणाखाली होणाऱ्या हत्यांबाबत बोलावे लागले. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर बोलताना जुनैदचा भाऊ हाश्मीने व्यक्त केलेले मत बरेच काही सांगून जाते. पंतप्रधानांनी हे वक्तव्य करण्यास फारच उशीर झाला आहे, त्यांच्या मनात आले तर हे प्रकार एका दिवसात थांबतील असे त्याने मत व्यक्त केले आहे.