शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
5
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
6
जगन्नाथ रथयात्रा: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
7
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
8
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
9
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
10
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
11
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
12
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
15
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
16
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
17
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
18
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
19
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
20
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!

हेही ‘सात्विक’ नाही !

By admin | Updated: December 5, 2014 00:45 IST

आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये गिळंकृत केल्याच्या आरोपावरून अंबाझरी पोलिसांनी सात्विक ग्रुप आॅफ इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले.

सात्त्विक इन्व्हेस्टमेंटच्या संचालकावर गुन्हे दाखल नागपूर : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये गिळंकृत केल्याच्या आरोपावरून अंबाझरी पोलिसांनी सात्विक ग्रुप आॅफ इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. अमोल ढाके, प्रीती ढाके, महेंद्र कोहाड, अतुल दीक्षित, संदीप महाजन आणि मोहन जोशी अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, हे सर्वच्या सर्वच नागपुरातून पळून गेलेले आहेत.अमोल ढाके याने डिसेंबर २००५ मध्ये अमरावती रोडवर पुराणिक ले-आऊट (भरतनगर) मध्ये सात्विक ग्रुप आॅफ इन्व्हेस्टमेंट कंपनीची स्थापना केली. आकर्षक व्याज देणाऱ्या अनेक योजनांचे मृगजळ दाखवून ठेवीदारांना अल्पावधीत मोठ्या परताव्याचे ढाके आमिष दाखवत होता. तिमाही, सहामाही आणि बारामाही योजनांसोबतच ४२ महिन्यांत दुप्पट रक्कम देण्याचेही तो आमिष दाखवत होता. त्याच्या या गोरखधंद्यात प्रीती ढाके, महेंद्र कोहाड, अतुल दीक्षित, संदीप महाजन आणि मोहन जोशी यांचाही सहभाग होता. ते सुद्धा ठेवीदारांना रक्कम गुंतविण्यासाठी प्रवृत्त करीत होते. या सर्वांनी मिळून शेकडो ठेवीदारांकडून वेगवेगळ्या मुदतीच्या कोट्यवधींच्या ठेवी गोळा केल्या. गेल्या वर्षभरात अनेक ठेवीदारांची मुदत पूर्ण झाली. त्यामुळे ठेवीदार आपली रक्कम घेण्यासाठी सात्त्विकच्या कार्यालयात जाऊ लागले. या ठेवीदारांना अमोल ढाके आणि त्याचे साथीदार वेगवेगळी कारणे सांगून परत पाठवीत होते. पोलिसांकडे तक्रारकर्त्यांची गर्दीढाके आणि साथीदारांनी काशीकर तसेच अन्य १६ तक्रारदारांची फसवणूक केल्याचा जो गुन्हा दाखल झाला, त्यात फसवणुकीची रक्कम ३३ लाख, १४ हजार रुपये आहे. प्रत्यक्षात हा आकडा अनेकपट अधिक आहे. कारण ढाके आणि कंपनीवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती कर्णोपकर्णी मिळाल्याने तक्रारकर्त्यांची अंबाझरी ठाण्यात गर्दी वाढली आहे. ३० ते ४० जण आपलीही फसवणूक झाल्याचे आज पोलिसांना सांगत होते. या सर्वांना रितसर तक्रार करण्याची सूचना पोलिसांनी केली आहे. नऊ वर्षात १०० कोटी? अमोल ढाके याने डिसेंबर २००५ मध्ये सात्विक कंपनी सुरू केली. एप्रिल २०१४ पर्यंत अर्थात नऊ वर्षात त्याने १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम गोळा केली. ठेवीदारांची रक्कम परत करण्याची मुदत पूर्ण होताच त्याने भरतनगरातील गाशा गुंडाळला आणि पसार झाला. अलीकडे तो ठेवीदारांसोबत फोनवरही बोलत नव्हता. गुन्हा दाखल केल्यानंतर आता पोलीस त्याचा ठावठिकाणा शोधत आहेत. येत्या २४ तासात पीडित ठेवीदारांची संख्या तसेच ढाके आणि कंपनीने हडपलेल्या रकमेचा आकडाही वाढणार आहे. त्यामुळे हा तपास गुन्हेशाखेकडे सोपविला जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगताहेत.