शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

योगायोग नव्हे, प्रशासनाचा ‘योग’

By admin | Updated: February 9, 2015 01:01 IST

गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घ्यावी असा एक प्रकार नागपूर जिल्ह्यातील ससेगावात घडला आहे. या गावातील ९० टक्के लोकांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. हा योगायोग नाही

अख्ख्या गावाचा ‘बर्थ डे’ एकाच दिवशी ! : ७० घरांच्या ससेगावची अशीही ओळखमंगेश व्यवहारे - नागपूरगिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घ्यावी असा एक प्रकार नागपूर जिल्ह्यातील ससेगावात घडला आहे. या गावातील ९० टक्के लोकांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. हा योगायोग नाही तर प्रशासनाने घडवून आणलेला हा योग आहे. शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर वसलेले विमुक्त भटक्या जमातीतील गोपाळ समाजाचे हे गाव. येथे ७० घरांच्या लोकवस्तीत जवळपास २५० लोक राहतात. शिक्षणाचा फारसा लवलेश नाही. पूर्वी हे लोक शहरात जाऊन शारीरिक कसरती दाखवून उदरनिर्वाह करायचे. परंतु आता हा व्यवसाय चालत नसल्याने, हे लोक आता मजुरी करून पोट भरतात. जवळपास ५० वर्षांपासून हे लोक या गावात राहतात. येथील सर्व नागरिक दारिद्र्यरेषेखालील आहेत़ त्यामुळे समाज, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानेही या गावाकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र जन्मतारखेमुळे सध्या हे गाव चांगलेच चर्चेत आले आहे. प्रशासनाने या गावकऱ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आधार कार्डवर ९० टक्के लोकांचा जन्म एकाच दिवशी झाल्याचे दिसते. गावातील प्रत्येकाचा जन्म १ जानेवारीला झाला असून, वर्ष मात्र वेगवेगळे आहे. या गावातील बाबाराव वाघाडे यांच्या घरी सहा लोकांचे कुटुंब आहे. बाबाराव घरातील ज्येष्ठ असून, त्यांना मुलगा, सून आणि दोन नातू आहेत. आधार कार्डवर या सर्वांची जन्मतारीख ही १ जानेवारी आहे. बाबारावसारखेच रूपचंद वाघाडे, गंगुबाई सोनवणे, किसन जाधव, अशोक सोनवणे यांच्याही कुटुंबातील सदस्यांची जन्मतारीख १ जानेवारीच आहे. आधार कार्ड बनवून देणाऱ्यांनी जन्मतारखेत केलेला घोळ उघड झाल्याने, या गावकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार की नाही, अशी भीती निर्माण झाली आहे. असा झाला घोळसरकारने नागरिकत्वाचा दाखला म्हणून प्रत्येकाचे आधार कार्ड बनवून दिले. या गावातही आधार कार्डचे शिबिर लागले होते. गावातील अनेकांकडे जन्मतारखेचा दाखला उपलब्ध नाही. मात्र त्यांना आपले वय किती हे माहीत आहे. हे शिबिर १ जानेवारीला लागले होते. त्यामुळे संगणक आॅपरेटरने आधार कार्डचा फॉर्म भरताना प्रत्येकाची जन्मतारीख १ जानेवारी टाकून त्यांनी सांगितलेल्या वयानुसार वर्ष टाकून दिले आणि १ जानेवारीचे अधिकृत आधार कार्ड त्यांना उपलब्ध करून दिले. या गावातील मुलांचे जन्मतारखेचे दाखले उपलब्ध आहेत परंतु हे दाखले दाखवूनही त्यांच्या जन्मतारखा काही बदलल्या नाहीत़काय म्हणता, आश्चर्यच आहे!यासंदर्भात स्थानिक आमदार सुधीर पारवे यांना विचारणा केली असता, त्यांनी सुरुवातीला आश्चर्य व्यक्त केले. यासंदर्भात तलाठ्याकडून माहिती घेऊन हा प्रकार नेमका कसा घडला याची विचारणा केली. योग्य पद्धतीने आधार कार्ड देण्यासाठी पुन्हा शिबिर आयोजित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. कंपनीने गांभीर्याने काम केले नाही सरकारने आधार कार्डची योजना राबविताना नागरिकांना आवश्यक असलेल्या सर्व दस्तऐवजांचे एक मल्टिपल डॉक्युमेंट आधार कार्ड राहील असे सांगितले होते. हे आधार कार्ड नागरिकांचे ओळखपत्र, नागरिकत्वाचा दाखला राहणार होते. देशभरातील १२० कोटी जनतेला आधार कार्ड उपलब्ध करून देण्याचे काम सरकारने खाजगी कंपन्यांना दिले होते. या कंपन्यांनी आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी एवढे महत्त्वाचे डॉक्युमेंट बनविताना गांभिर्याने काम केले नसल्याचे दिसते. आज भटक्या समाजाजवळ कागदपत्र नसल्याने त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही. सरकारने आधार कार्ड देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अशा कारभारामुळे तोही फोल ठरताना दिसतो आहे. अ‍ॅड. पराग उके, सामाजिक कार्यकर्ते