शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
3
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
6
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
7
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
8
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
9
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
10
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
11
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
12
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
13
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
14
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
15
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
16
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
17
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
18
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
19
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
20
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद

उत्सवाला नव्हे, स्पर्धेला विरोध

By admin | Updated: August 13, 2014 03:27 IST

बाल हक्क संरक्षण आयोगाने बालगोविंदावर बंदी घालून पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले

स्नेहा मोरे, मुंबईबाल हक्क संरक्षण आयोगाने बालगोविंदावर बंदी घालून पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले. मात्र तरीही दहीहंडी समन्वय समितीने ‘बालहट्ट’ कायम ठेवल्यामुळे उच्च न्यायालयात धाव घेऊन दहीहंडी उत्सवावर निर्बंध घालण्याबाबत याचिका दाखल केल्याचे याचिकाकर्ती स्वाती पाटील यांनी सांगितले. आता या निर्देशांच्या अंमलबजावणीसाठी पोलीस आणि राज्य शासन कशा पद्धतीने पाऊल उचलते, याकडे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.दहीहंडी उत्सवाचे झालेले बाजारीकरण थांबावे, एकमेकांवर करण्यात येणारी कुरघोडी थांबावी, उत्सवादरम्यान होणारे अपघात टळावे, त्यावर निर्बंध घालण्यात यावे, अशी आमची मागणी होती. त्यामुळे केवळ दहीहंडी उत्सवातील स्पर्धेला विरोध होता, या उत्सवाला नव्हे, अशी भूमिका दहीहंडी उत्सवाबाबत याचिका दाखल केलेल्या स्वाती पाटील यांनी स्पष्ट केली. गेल्या वर्षीही चेंबूर येथे उत्कर्ष महिला समिती आणि लोकसेवा सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून थरांवर निर्बंध येण्यासाठी आम्ही पथनाट्य आणि पत्रकांच्या माध्यमातून जनजागृती केली होती. या वर्षीसुद्धा ही मोहीम सुरू आहे, मात्र सराव शिबिरांदरम्यानही होणाऱ्या अपघातांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता यावर कायमचे निर्बंध यावे यासाठी हा प्रयत्न केला. त्यामुळे आता उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय स्वागतार्हच आहे. (प्रतिनिधी)