शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

उसाचे बिलच दिले नाही!

By admin | Updated: June 13, 2016 01:34 IST

शेतकऱ्याला खासगी साखर कारखान्यानेही गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीतील पारवडी येथे समोर आला

बारामती : दुष्काळाने जेरीस आलेल्या शेतकऱ्याला खासगी साखर कारखान्यानेही गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीतील पारवडी येथे समोर आला आहे. जानेवारी महिन्यात ऊस तोडून नेऊनदेखील अद्याप येथील शेतकऱ्यांना उसाचे बिलच मिळाले नाही. कारखान्याकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता, कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याशी संपर्क होत नसल्याने पारवडीतील जवळपास ५० शेतकरी हतबल झाले आहेत. साखर आयुक्तांनी तातडीने या खासगी साखर कारखान्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील रत्नपुरी करकंब येथील विजय शुगर या खासगी साखर कारखान्याने ही फसवणूक केल्याचे शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. जानेवारी २०१६ मध्ये पारवडी येथे कारखान्याच्या ऊसतोडीच्या टोळ्या आल्या होत्या. दुष्काळी परिस्थितीमुळे उसाला पाणी कमी पडत होते, त्यात परिसरातील साखर कारखान्यांकडून वेळेत उसाला तोड बसत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांनी या कारखान्याला ऊस दिला. जवळपास ५० शेतकऱ्यांचा ३ हजार ५०० टन ऊस तोडून नेला; परंतु अद्याप या उसाचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. फसवणूक झालेले बहुतेक शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. उसाच्या येणाऱ्या उत्पन्नावरच या शेतकऱ्यांचा घरखर्च चालतो. मात्र, ७ महिने पैसे मिळाले नाहीत. याबाबत शेतकऱ्यांनी कारखान्याच्या चिटबॉयच्या मोबाईलवर संपर्क साधला असता, ‘माझाच पगार कारखान्याने दिला नाही. त्यामुळे मी तुम्हाला काय मदत करणार,’ असे उत्तर मिळाले. काही शेतकऱ्यांनी थेट कारखान्यावर जाऊनच याबाबत चौकशी केली असता. कारखान्याचे कार्यालय बंद होते. त्याठिकाणी कोणताही जबाबदार अधिकारी शेतकऱ्यांना भेटला नाही. झालेल्या फसवणुकीमुळे शेतकऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. घरखर्च, दवाखाना यासाठी खासगी सावकारांकडून १० टक्के व्याजाने शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागत आहे. तर, बँकेचे नवे-जुने करण्यासाठीही पैसे नाहीत. त्यामुळे पुढील हंगामाच्या खर्चासाठीही भांडवल राहिले नसल्याने शेतकऱ्यांवर उपजीविकेसाठी बारामती एमआयडीसीमध्ये मजुरी करण्याची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)>माझ्या मुलीचे लग्न ठरले होते. ऊस लवकर गेला, तर उसाच्या पैशातून मुलीचे लग्न करता येईल. या आशेवर माझा ऊस दिला. ऊस देतेवेळी कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी १५ दिवसांच्या आत उसाचे बिल मिळेल, असे सांगितले होते. एप्रिल महिन्यामध्ये मुलीचे लग्न जवळ आल्याने मी बिल मागण्यासाठी कारखान्यावर गेलो असता, कोणताही अधिकारी भेटला नाही. बिलही मिळाले नाही. लग्नासाठी खासगी सावकाराकडून १० टक्के व्याजाने पैसे घ्यावे लागले. - प्रकाश दामू आटोळे, शेतकरी>गावातील जवळपास सगळ्याच शेतकऱ्यांनी ऊस दिला. १५ दिवसांमध्ये उसाचे बिल मिळेल, असे कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. माझ्या आईच्या गंभीर आजारावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यासाठी उसाचे बिल लवकर मिळेल, या आशेवर मी कारखान्याला ऊस दिला. परंतु अद्याप बिल मिळाले नाही. सध्या खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन आईवर उपचार करावे लागत आहेत. - विठ्ठल बाळासाहेब बेंगारे (शेतकरी)