शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

नोटाबंदी देशातील सर्वात मोठा घोटाळा

By admin | Updated: December 30, 2016 21:03 IST

नोटाबंदीच्या निर्णयाला ५० दिवस पूर्ण झाले. तरीही परिस्थिती सुधारलेली नसल्याचं वक्तव्य काँग्रेसचे राज्यसभा सदस्य के. एन. पुनिया यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 30 - नोटाबंदीच्या निर्णयाला ५० दिवस पूर्ण झाले. तरीही परिस्थिती सुधारलेली नसल्याचं वक्तव्य काँग्रेसचे राज्यसभा सदस्य के. एन. पुनिया यांनी केला आहे.  बँका आणि एटीएमसमोरील लोकांच्या रांगा कायम असून, व्यापार ठप्प झाला आहे. या निर्णयाने देशातील कोणताही काळा पैसा बाहेर निघालेला नाही. उलट हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेसचे राज्यसभा सदस्य के. एन. पुनिया यांनी केला. ते शुक्रवारी रविभवन येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते. पुनिया पुढे म्हणाले, नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला त्याच दिवशी कोलकाता येथील एका बँकेतील भाजपाच्या खात्यात ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांमध्ये तीन कोटी रुपये जमा झाले. तसेच मागील १ मार्च २०१६ ते ८ नोव्हेंबर २०१६ दरम्यान भाजपा आणि आरएसएसने देशभरातील आपल्या खात्यांमध्ये किती रक्कम जमा केली, याची वारंवार माहिती मागूनसुद्धा ती दिली गेलेली नाही. नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी भाजपा व आरएसएसने देशभरात कोट्यवधीच्या संपत्तीची खरेदी केली आहे. भाजपाला नोटाबंदीच्या निर्णयाची पूर्वकल्पना होती. त्यामुळेच त्यांनी निर्णयापूर्वी काळ्या पैशातून संपत्ती खरेदी करून तो पैसा पांढरा केला आहे, असाही पुनिया यांनी गंभीर आरोप केला.त्यामुळे सरकारने बँक खात्यातील पैसे काढण्यावर घातलेले निर्बंध हटवून प्रत्येकाच्या खात्यातील जमा रकमेवर १८ टक्के व्याज देण्यात यावे, तसेच बीपीएल कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यावर प्रत्येकी २५ हजार रुपये जमा करण्यात यावेत. तसेच लहान दुकानदार आणि उद्योगांना प्राप्तिकर आणि विक्री करात ५० टक्के सूट देण्यात यावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. शिवाय नोटाबंदीमुळे सध्या देशातील लोकांना होत असलेला त्रास जोपर्यंत दूर होत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा या निर्णयाविरुद्घ संघर्ष सुरूच राहणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.