शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

नोटाबंदी देशातील सर्वात मोठा घोटाळा

By admin | Updated: December 30, 2016 21:03 IST

नोटाबंदीच्या निर्णयाला ५० दिवस पूर्ण झाले. तरीही परिस्थिती सुधारलेली नसल्याचं वक्तव्य काँग्रेसचे राज्यसभा सदस्य के. एन. पुनिया यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 30 - नोटाबंदीच्या निर्णयाला ५० दिवस पूर्ण झाले. तरीही परिस्थिती सुधारलेली नसल्याचं वक्तव्य काँग्रेसचे राज्यसभा सदस्य के. एन. पुनिया यांनी केला आहे.  बँका आणि एटीएमसमोरील लोकांच्या रांगा कायम असून, व्यापार ठप्प झाला आहे. या निर्णयाने देशातील कोणताही काळा पैसा बाहेर निघालेला नाही. उलट हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेसचे राज्यसभा सदस्य के. एन. पुनिया यांनी केला. ते शुक्रवारी रविभवन येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते. पुनिया पुढे म्हणाले, नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला त्याच दिवशी कोलकाता येथील एका बँकेतील भाजपाच्या खात्यात ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांमध्ये तीन कोटी रुपये जमा झाले. तसेच मागील १ मार्च २०१६ ते ८ नोव्हेंबर २०१६ दरम्यान भाजपा आणि आरएसएसने देशभरातील आपल्या खात्यांमध्ये किती रक्कम जमा केली, याची वारंवार माहिती मागूनसुद्धा ती दिली गेलेली नाही. नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी भाजपा व आरएसएसने देशभरात कोट्यवधीच्या संपत्तीची खरेदी केली आहे. भाजपाला नोटाबंदीच्या निर्णयाची पूर्वकल्पना होती. त्यामुळेच त्यांनी निर्णयापूर्वी काळ्या पैशातून संपत्ती खरेदी करून तो पैसा पांढरा केला आहे, असाही पुनिया यांनी गंभीर आरोप केला.त्यामुळे सरकारने बँक खात्यातील पैसे काढण्यावर घातलेले निर्बंध हटवून प्रत्येकाच्या खात्यातील जमा रकमेवर १८ टक्के व्याज देण्यात यावे, तसेच बीपीएल कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यावर प्रत्येकी २५ हजार रुपये जमा करण्यात यावेत. तसेच लहान दुकानदार आणि उद्योगांना प्राप्तिकर आणि विक्री करात ५० टक्के सूट देण्यात यावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. शिवाय नोटाबंदीमुळे सध्या देशातील लोकांना होत असलेला त्रास जोपर्यंत दूर होत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा या निर्णयाविरुद्घ संघर्ष सुरूच राहणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.