शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदी - मच्छीमारांवर आली उपासमारीची पाळी

By admin | Updated: November 16, 2016 20:03 IST

केंद्र सरकारने गेल्या ८ नोव्हेंबरच्या रात्री घेतलेल्या ५०० आणि १००० नोटा बंदीच्या निर्णयाचा मोठा फटका राज्यातील मच्छीमारांना बसला आहे.मुंबईसह,रायगड,पालघर,ठाणे,रत्नागिरी आणि सिधूदुर्ग

मनोहर कुंभेजकर

मुंबई, दि. १६ - केंद्र सरकारने गेल्या ८ नोव्हेंबरच्या रात्री घेतलेल्या ५०० आणि १००० नोटा बंदीच्या निर्णयाचा मोठा फटका राज्यातील मच्छीमारांना बसला आहे.मुंबईसह,रायगड,पालघर,ठाणे,रत्नागिरी आणि सिधूदुर्ग येथील मासेमारी व्यवहार ठप्प झाला आहे. मच्छीमारी खर्च प्रामुख्याने रोखीवरच असल्यामुळे मच्छीमारांचा दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.राज्यातील समारे ५० टक्के मच्छीमार नौका समुद्रकिनारी शाकारल्याचे राज्यातील चित्र असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांनी दिली.मच्छीमारांचा रोजचा व्यवहार हा प्रामुख्याने जिल्हा बँका आणि सहकारी बँकेच्या माध्यामतून होता.मात्र केंद्र सरकारने आर्थिक व्यवहारास बंदी घातल्यामुळे मच्छीमार सहकारी संस्थांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.सहकारी चळवळच मोडीत निघण्याची भिती त्यांनी व्यक्त केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना जशी कर्ज माफीची सवलत दिली आहे तशी सवलत देशातील मच्छीमारांना देण्याची मागणी त्यांनी केली आहे.मुंबईतील ससून डॉक,भाऊचा धक्का,छत्रपती शिवाजी मार्केट,दादर मार्केट,मालाड(प)येथील साईनाथ मार्केट येथे रोज ताजी मासळी येते,मात्र नोटा बंदीमुळे येथील होलसेल मासळी व्यवहार ठप्प झाला असून नाशिवंत मासळी सडून जात असल्याची माहिती संधे यांनी दिली.रोज मासेमारीसाठी जायचे की घर खर्चासाठी बँकेत पैशासाठी रांगा मच्छीमारांना लावायच्या या चिंतेत मच्छीमार सापडला असल्याची माहिती संघाचे मुंबई अध्यक्ष विजय वैती आणि रायगड अध्यक्ष शेषनाथ कोळी यांनी दिली. खोल मासेमारीसाठी किमान ५ ते ८ दिवसांसाठी लागणारे डीझेंल,बर्फ,लागणारा कच्चा माल आणि खलाश्यांचा पगार असा मच्छीमारांना खर्च सुमारे दीड ते दोन लाख रुपये येतो.राज्याला ७२० किमीचा सागरी किनारा लाभला असून राज्यात ३२८ मच्छीमार गावे असून ३२५ मच्छीमार बंदरे आहेत.तर राज्यात सुमारे ११६६७ यांत्रिक व ८००० बिगर यांत्रिकी बोटी आहेत.मासेमारीच्या निर्यातीतून देशाला वर्षाला सुमारे १२००० कोटी परकीय चलन मिळते.या नोटा बंदीचा मासेमारीच्या निर्यातीला देखिल मोठा फटका बसला असल्याची आकडेवारी संधे यांनी दिली.