शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

नोटाबंदी - मच्छीमारांवर आली उपासमारीची पाळी

By admin | Updated: November 16, 2016 20:03 IST

केंद्र सरकारने गेल्या ८ नोव्हेंबरच्या रात्री घेतलेल्या ५०० आणि १००० नोटा बंदीच्या निर्णयाचा मोठा फटका राज्यातील मच्छीमारांना बसला आहे.मुंबईसह,रायगड,पालघर,ठाणे,रत्नागिरी आणि सिधूदुर्ग

मनोहर कुंभेजकर

मुंबई, दि. १६ - केंद्र सरकारने गेल्या ८ नोव्हेंबरच्या रात्री घेतलेल्या ५०० आणि १००० नोटा बंदीच्या निर्णयाचा मोठा फटका राज्यातील मच्छीमारांना बसला आहे.मुंबईसह,रायगड,पालघर,ठाणे,रत्नागिरी आणि सिधूदुर्ग येथील मासेमारी व्यवहार ठप्प झाला आहे. मच्छीमारी खर्च प्रामुख्याने रोखीवरच असल्यामुळे मच्छीमारांचा दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.राज्यातील समारे ५० टक्के मच्छीमार नौका समुद्रकिनारी शाकारल्याचे राज्यातील चित्र असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांनी दिली.मच्छीमारांचा रोजचा व्यवहार हा प्रामुख्याने जिल्हा बँका आणि सहकारी बँकेच्या माध्यामतून होता.मात्र केंद्र सरकारने आर्थिक व्यवहारास बंदी घातल्यामुळे मच्छीमार सहकारी संस्थांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.सहकारी चळवळच मोडीत निघण्याची भिती त्यांनी व्यक्त केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना जशी कर्ज माफीची सवलत दिली आहे तशी सवलत देशातील मच्छीमारांना देण्याची मागणी त्यांनी केली आहे.मुंबईतील ससून डॉक,भाऊचा धक्का,छत्रपती शिवाजी मार्केट,दादर मार्केट,मालाड(प)येथील साईनाथ मार्केट येथे रोज ताजी मासळी येते,मात्र नोटा बंदीमुळे येथील होलसेल मासळी व्यवहार ठप्प झाला असून नाशिवंत मासळी सडून जात असल्याची माहिती संधे यांनी दिली.रोज मासेमारीसाठी जायचे की घर खर्चासाठी बँकेत पैशासाठी रांगा मच्छीमारांना लावायच्या या चिंतेत मच्छीमार सापडला असल्याची माहिती संघाचे मुंबई अध्यक्ष विजय वैती आणि रायगड अध्यक्ष शेषनाथ कोळी यांनी दिली. खोल मासेमारीसाठी किमान ५ ते ८ दिवसांसाठी लागणारे डीझेंल,बर्फ,लागणारा कच्चा माल आणि खलाश्यांचा पगार असा मच्छीमारांना खर्च सुमारे दीड ते दोन लाख रुपये येतो.राज्याला ७२० किमीचा सागरी किनारा लाभला असून राज्यात ३२८ मच्छीमार गावे असून ३२५ मच्छीमार बंदरे आहेत.तर राज्यात सुमारे ११६६७ यांत्रिक व ८००० बिगर यांत्रिकी बोटी आहेत.मासेमारीच्या निर्यातीतून देशाला वर्षाला सुमारे १२००० कोटी परकीय चलन मिळते.या नोटा बंदीचा मासेमारीच्या निर्यातीला देखिल मोठा फटका बसला असल्याची आकडेवारी संधे यांनी दिली.