शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

नोटाबंदी - मच्छीमारांवर आली उपासमारीची पाळी

By admin | Updated: November 16, 2016 20:03 IST

केंद्र सरकारने गेल्या ८ नोव्हेंबरच्या रात्री घेतलेल्या ५०० आणि १००० नोटा बंदीच्या निर्णयाचा मोठा फटका राज्यातील मच्छीमारांना बसला आहे.मुंबईसह,रायगड,पालघर,ठाणे,रत्नागिरी आणि सिधूदुर्ग

मनोहर कुंभेजकर

मुंबई, दि. १६ - केंद्र सरकारने गेल्या ८ नोव्हेंबरच्या रात्री घेतलेल्या ५०० आणि १००० नोटा बंदीच्या निर्णयाचा मोठा फटका राज्यातील मच्छीमारांना बसला आहे.मुंबईसह,रायगड,पालघर,ठाणे,रत्नागिरी आणि सिधूदुर्ग येथील मासेमारी व्यवहार ठप्प झाला आहे. मच्छीमारी खर्च प्रामुख्याने रोखीवरच असल्यामुळे मच्छीमारांचा दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.राज्यातील समारे ५० टक्के मच्छीमार नौका समुद्रकिनारी शाकारल्याचे राज्यातील चित्र असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांनी दिली.मच्छीमारांचा रोजचा व्यवहार हा प्रामुख्याने जिल्हा बँका आणि सहकारी बँकेच्या माध्यामतून होता.मात्र केंद्र सरकारने आर्थिक व्यवहारास बंदी घातल्यामुळे मच्छीमार सहकारी संस्थांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.सहकारी चळवळच मोडीत निघण्याची भिती त्यांनी व्यक्त केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना जशी कर्ज माफीची सवलत दिली आहे तशी सवलत देशातील मच्छीमारांना देण्याची मागणी त्यांनी केली आहे.मुंबईतील ससून डॉक,भाऊचा धक्का,छत्रपती शिवाजी मार्केट,दादर मार्केट,मालाड(प)येथील साईनाथ मार्केट येथे रोज ताजी मासळी येते,मात्र नोटा बंदीमुळे येथील होलसेल मासळी व्यवहार ठप्प झाला असून नाशिवंत मासळी सडून जात असल्याची माहिती संधे यांनी दिली.रोज मासेमारीसाठी जायचे की घर खर्चासाठी बँकेत पैशासाठी रांगा मच्छीमारांना लावायच्या या चिंतेत मच्छीमार सापडला असल्याची माहिती संघाचे मुंबई अध्यक्ष विजय वैती आणि रायगड अध्यक्ष शेषनाथ कोळी यांनी दिली. खोल मासेमारीसाठी किमान ५ ते ८ दिवसांसाठी लागणारे डीझेंल,बर्फ,लागणारा कच्चा माल आणि खलाश्यांचा पगार असा मच्छीमारांना खर्च सुमारे दीड ते दोन लाख रुपये येतो.राज्याला ७२० किमीचा सागरी किनारा लाभला असून राज्यात ३२८ मच्छीमार गावे असून ३२५ मच्छीमार बंदरे आहेत.तर राज्यात सुमारे ११६६७ यांत्रिक व ८००० बिगर यांत्रिकी बोटी आहेत.मासेमारीच्या निर्यातीतून देशाला वर्षाला सुमारे १२००० कोटी परकीय चलन मिळते.या नोटा बंदीचा मासेमारीच्या निर्यातीला देखिल मोठा फटका बसला असल्याची आकडेवारी संधे यांनी दिली.