शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘नोंदणी व मुद्रांक’ला नोटाबंदीचा फटका

By admin | Updated: March 13, 2017 03:54 IST

राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला बांधकाम व्यवसायातील मंदी आणि नोटा बंदीचा मोठा फटका बसला आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वांत कमी महसूल गोळा झाला आहे.

पुणे : राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला बांधकाम व्यवसायातील मंदी आणि नोटा बंदीचा मोठा फटका बसला आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वांत कमी महसूल गोळा झाला आहे. राज्य शासनाने सन २०१६-१७ साठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला २३ हजार ५४८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले असून फेबु्रवारीअखेर केवळ १७ हजार ७०२ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. दस्तनोंदणी व महसूलात दर वर्षी सरासरी दहा टक्क्यांची वाढ अपेक्षित असते. शासनाकडून प्रत्येक विभागाला वर्षांच्या सुरुवातीला महसूल वसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिले जाते. २०१४-१५ मध्ये राज्यात मार्चअखेरपर्यंत तब्बल २२ लाख ९७ हजार ९२९ दस्तनोंदणी होऊन शासनाला १९ हजार ९५९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. २०१५-१६ मध्ये २३ लाख ८ हजार ८०९ दस्तनोंदणीमधून २१ हजार ७६७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. परंतु, सन २०१६-१७ च्या सुरुवातीपासूनच बांधकाम क्षेत्रावर मंदीचे सावट दिसायला सुरुवात झाली होती. यामुळे एप्रिल २०१६ मध्ये केवळ १ लाख ७८ हजार ४०८ दस्त नोंदणी झाली व १ हजार ४७७ कोटींचा महसूल मिळाला. त्यानंतर मे, जून, जुलै आणि आॅगस्ट मध्ये नोंदणीमध्ये काही प्रमाणात वाढ झाली. परंतु, त्यानंतर पुन्हा सप्टेंबर, आॅक्टोबरमध्ये दस्तनोंदणीचे प्रमाण कमी झाले. त्यात ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यवहारातील हजार-पाचशे रुपयांच्या नोटा बंदी करण्याचा निर्णय घेतला. याचा मोठा फटका बसला. नोव्हेंबरमध्ये दस्त नोंदणीत पन्नास टक्क्यांहून अधिक घट झाली. नोव्हेंबर २०१६ मध्ये राज्यात केवळ १ लाख २० हजार दस्तनोंदणी होऊन १ हजार २९७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. त्यानंतर दस्तनोंदणीमध्ये फारशी वाढ झाली नाही. यामुळेच फेबु्रवारी २०१७ अखेर पर्यंत राज्यात केळव १८ लाख ९१ हजार ३८३ दस्तनोंदणीमधून शासनाला १७ हजार ७०२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मार्चअखेर पर्यंत यामध्ये आणखी एक ते दीड हजार कोटींची वाढ झाली तरी मागली दोन वर्षांच्या तलुनेत यंदा जमा होणार महसूल कमीच असणार आहे.राज्यात सर्वांधिक महसूल गोळा करणा-या विभागामध्ये उत्पादन शुल्क विभागानंतर नोंदणी व मुद्राक शुल्क विभागाचा दुसरा क्रमांक लागतो. स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री, मुद्रांक शुल्क भरणा, गहाणखत, इसार पावती, भाडे करारनामा, विवाह नोंदणी अशा विविध प्रकारच्या कामांसाठी मुद्रांक शुल्क घेतले जाते. राज्यात होणा-या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर दर वर्षी नव्याने रेडीरेकनचे (वार्षिक मूल्य दर तक्ता) निश्चित करून, त्या अधारे दस्तनोंदणीचे दर निश्चित केले जातात. गेल्या काही वर्षांत रेडी रेकनरच्या दरामध्ये सातत्याने वाढ झाल्याने महसूलामध्ये देखील वाढच होत गेली. मात्र, बांधकाम व्यावसायातील मंदी व नोटा बंदीने या विभागाला मोठा फटका बसला आहे.(प्रतिनिधी)