शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

शिवसेनेचं वागणं कोणालाच पसंत नाही

By admin | Updated: March 5, 2015 01:26 IST

पक्ष फुटण्याच्या भीतीने शिवसेना सत्तेत आली की सत्तेत सहभागी होण्याची त्यांची काही अन्य गणिते आहेत या प्रश्नाचे उत्तर शिवसेनाच देऊ शकेल.

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे : देवेंद्र फडणवीस - उद्धव ठाकरेच मतभेद मिटवतील मुंबई : शिवसेना फोडून सरकार स्थिर करण्याचा प्रयत्न भाजपाने कधीच केला नाही. त्यामुळे पक्ष फुटण्याच्या भीतीने शिवसेना सत्तेत आली की सत्तेत सहभागी होण्याची त्यांची काही अन्य गणिते आहेत या प्रश्नाचे उत्तर शिवसेनाच देऊ शकेल. आता सतत टीका करीत राहण्याचे शिवसेनेचं वागणं जनतेलाही पसंत नाही हे त्यांनी ध्यानात घ्यावे, असा सूचक इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार होते व मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा शिवसेना मोठा भाऊ तर भाजपा लहान भाऊ होता. त्यावेळी आम्ही जसे वागलो तसे आता शिवसेनेने वागले पाहिजे, असा सल्लाही दानवे यांनी दिला. ते म्हणाले, पूर्वीच्या युती सरकारमध्यहेही रुसवेफुगवे होते. पण त्यावेळी बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन यांचे नेतृत्व होते.ते दोघे नेते कुणाला वाद घालायची संधी देत नव्हते. आमच्यातील सध्याचे मतभेद समन्वय समितीत मिटले नाहीत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ते मिटवणे अपेक्षित आहे. (विशेष प्रतिनिधी) सन्मानपूर्वक जागावाटप हवे : राज्यातील मुंबईसह सर्व महापालिकांच्या निवडणुका भाजपा व शिवसेनेने बरोबर लढाव्यात ही आमची भूमिका आहे. मात्र त्याकरिता सन्मानपूर्वक जागावाटप झाले पाहिजे अन्यथा दोन्ही पक्ष आपापल्या स्तरावर निर्णय घेऊ शकतात, असे ते म्हणाले. गडकरी यांचे मार्गदर्शन घेतोपक्ष संघटनेत काम करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन घेते. या तिघांनी चर्चा करूनच आपली प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला, असेही दानवे यांनी सांगितले. दुनिया उम्मीद पे जिती हैंमहामंडळाच्या नियुक्त्या न झाल्याने आमदारांमध्ये नाराजी असल्याकडे दानवे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी त्याचा इन्कार केला. जोपर्यंत कुठले महामंडळ भाजपाकडे राहणार व कुठले शिवसेनेकडे ते ठरत नाही तोपर्यंत नियुक्त्या होणार नाहीत हे आमदारांना माहित आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार हे नेहमीच अनेक मुख्यमंत्री वरचेवर सांगत आले आहेत. दुनिया उम्मीद पे जिती है, अशी टिप्पणी दानवे यांनी केली.