शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

'रईस' शाहरूखला पाहण्यासाठी उडाली झुंबड, एकाचा मृत्यू

By admin | Updated: January 24, 2017 14:06 IST

'रईस' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईहून दिल्लीपर्यंत ट्रेनमधून प्रवास करणा-या शाहरूखला पाहण्यासाठी वडोदरा स्थानकावर झुुंबड उडाली व त्यातच एकाचा मृत्यू झाला.

मुंबई : 'रईस' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईहून दिल्लीपर्यंत ट्रेनमधून प्रवास करणा-या शाहरूखला पाहण्यासाठी वडोदरा स्थानकावर झुुंबड उडाली व त्यातच एकाचा मृत्यू झाला. 

चित्रपट प्रमोशसाठी मुंबई ते दिल्ली प्रवास आॅगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेसने करणार असल्याचे ट्विट शाहरूखने केले, त्यामुळे आपल्या लाडक्या कलाकाराला पाहण्यासाठी स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मुंबईतही त्याचे चाहते मोठ्या प्रमाणावर पोहोचले होते. वडोदरा रेल्वे स्थानकातही चाहत्यांची झुंबड उडाली होती, त्यामध्ये समाजवादी पार्टीचे  माजी नगरसेवक फरीद खानही उपस्थित होते. 

गाडी वडोदरा स्थानकात पोहोचताच शाहरूखची एक झलक पाहण्यासाठी चाहते उतावीळ झाले आणि त्यांनी रेल्वे अडवण्याचा प्रयत्न केला. या सर्वांमुळे स्थानकात एकच गोंधळ माजला. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीमारही केला, त्यामुळे एकच धावपळ उडाली आणि चेंगराचेंगरीही झाली. या गर्दीत फरीद खान यांनाही धक्काबुक्की होऊन ते जमिनीवर कोसळले. गर्दीतून वाट काढणे अशक्य झाल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. तसेच या चेंगराचेंगरीत पोलिसांसह अन्य ४ जण जखमी झाले आहेत.   

चाहत्यांची निराशा 

 शाहरुख राजधानीने जाणार असल्याने एसी टू टीअर श्रेणीचे दोन डबे त्याच्यासाठी आणि सह कलाकार तसेच काही पत्रकारांसाठी आरक्षित केले होते. शाहरुखची व्यवस्था ‘ए-५’डब्यात होती. ही गाडी सुटते त्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर सजावटही केली होती. आपल्या लाडक्या अभिनेत्याला प्रत्यक्षात बघता येईल आणि त्याच्यासोबत एक फोटो काढता येईल यासाठी स्थानकाबाहेरुन आणि स्थानकात चाहत्यांनी जिथे मिळेल तेथे जागा पकडली होती. बराच वेळ सुरु असलेल्या गोंधळात शाहरुख खान संध्याकाळी ५.४७ च्या सुमारास प्लॅटफॉर्मवर आला. मात्र कुणालाही कळायचा आत पोलीस आणि अंगरक्षकांच्या गराड्यात त्याने आपल्या आरक्षित डब्यात प्रवेश केला आणि त्याच्या चाहत्यांची घोर निराशा झाली.  

 

शाहरुखमुळे राजधानीचा खोळंबा?

दरम्यान वक्तशीरपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसचा 'रईस'च्या प्रमोशनमुळे चांगलाच खोळंबा झाला. मुंबई ते दिल्ली प्रवासासाठी शाहरूख आॅगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेसने जाणार होता. त्यामुळे मुंबई सेंट्रल स्थानकावर प्रवाशांची आणि चाहत्यांची मोठी गर्दी उसळली होती. पण शाहरुखला स्थानकात पोहोचण्यासच उशीर झाल्यामुळे नेहमीच्या ५ वाजून ४० मिनिटांच्या वेळेऐवजी ही गाडी ५ वाजून ४८ मिनिटांनी सुटली. शाहरुख राजधानीने जाणार असल्याने एसी टू टीअर श्रेणीचे दोन डबे त्याच्यासाठी आणि सह कलाकार तसेच काही पत्रकारांसाठी आरक्षित केले होते. शाहरुखची व्यवस्था ‘ए-५’डब्यात होती.