शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

भविष्यातील भाषेत शब्द नव्हे प्रतिमा राहणार

By admin | Updated: April 3, 2017 22:00 IST

इतिहासकाळापासून सातत्याने विविध भाषांचे आकलन करून मानवी मेंदू थकला आहे. मात्र प्रतिमांच्या माध्यमातून समजून घेण्याची मानवी मेंदूची क्षमता वाढली

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 3 - इतिहासकाळापासून सातत्याने विविध भाषांचे आकलन करून मानवी मेंदू थकला आहे. मात्र प्रतिमांच्या माध्यमातून समजून घेण्याची मानवी मेंदूची क्षमता वाढली आहे. भविष्यातील भाषा शब्दांपेक्षा प्रतिमांची राहील. अगदी दुसºया ग्रहांवरदेखील ती भाषा समजू शकेल, असे मत ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ.गणेश देवी यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे डॉ. वि. भि. उपाख्य भाउसाहेब कोलते मराठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
 तंत्रज्ञानाचा वापर वाढीस लागला आहे. मानवी मेंदूतदेखील अनेक परिवर्तन होत आहेत. त्यामुळे भाषांमध्येदेखील प्रचंड बदल होईल व पुढील ३० वर्षांत ९० टक्के भाषा संपुष्टात येतील. भविष्यातील भाषा ही ‘डिजिटल’ गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात येईल, असे प्रतिपादन डॉ.देवी यांनी केले.
एका भाषेतून दुसºया भाषेत प्रवेश करणे ही भारताची संस्कृती आहे. त्यामुळे भारत हा बहुभाषिक देश आहे. भाषा ही संस्कृतीचे आदान-प्रदान करणारे माध्यम आहे. मात्र, आजही अनेक देशांना भाषेचे हवे तसे महत्त्व पटलेले नाही. त्यामुळे अनेक देशांतील भाषा नष्ट होतील, असेदेखील ते म्हणाले.
 
मराठी जिवंत राहणारच
मराठी भाषेचे महत्त्व कमी होत आहे, अशी ओरड होते. मात्र मराठी भाषेत आजही विविध शब्दांची भर पडत आहे. ही भाषा जगातील पहिल्या १८ भाषांमध्ये येते तर बहुभाषिक देशांमध्ये ती पहिल्या चारमध्ये आहे. त्यामुळे इतर भाषा इतिहासजमा झाल्या तरी मराठी मात्र जिवंत राहणारच, असा दावा डॉ.देवी यांनी यावेळी केला. भाषांबाबतचा दुराभिमान बाजूला ठेवून एकमेकांना जोडण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. नवी सांस्कृतिक चळवळच देशात निर्माण व्हायला हवी, असे ते म्हणाले.