शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

कडक उन्हाळ्यातही पाण्याचे नो टेन्शन

By admin | Updated: May 16, 2017 21:21 IST

कडाक्याच्या उन्हाळ्याने मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळवले आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 16 - कडाक्याच्या उन्हाळ्याने मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. तरीही मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांमध्ये 98 दिवसांचा जलसाठा आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात पाण्याचे टेन्शन मिटले आहे. दोन वर्षांपूर्वी अपु-या पावसाने मुंबईत पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. वर्षभर पाणीकपातीचा सामना मुंबईकरांना करावा लागला होता. परंतू गेल्यावर्षी तलाव परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे पाण्याचे टेन्शन निवळले. मधल्या काळात मध्य वैतरणा जलवाहिनीनेही मुंबईचा जलसाठा वाढवला. त्यामुळे मुंबईला दररोज 3750 दशलश लीटर पाणीपुरवठा केला जात आहे.गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढली असून मुंबईकरांच्या घामाच्या धारा वाहत आहेत. मात्र भर पाण्यासाठी वणवण करावी लागत नाही, याचा मुंबईकरांना दिलासा आहे. सद्यस्थितीत तलावांमध्ये तीन लाख 67 हजार 991 दशलश लीटर जलसाठा आहे. तीन महिने मुंबईची तहान भागेल, एवढा हा जलसाठा असल्याने जुलैपर्यंत पाणीची चिंता नाही.असा आहे जलसाठा (आकडेवारी दशलश लीटरमध्ये)वर्ष जलसाठा2017 - तीन लाख 67 हजार 991 2016- दोन लाख 41 हजार 366 2015- दोन लाख 96 हजार 460मुंबईला दररोज 3750 दशलश लीटर्स पाणीपुरवठा होतो. मुंबईत पाण्याची मागणी दररोज 4200 दशलश लीटर्स एवढी आहे.दररोज 25 ते 30 टक्के म्हणजे सुमारे नऊशे लीटर्स पाणी गळती व चोरीमध्ये वाया जात आहे.