शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

एकही शिक्षक अतिरिक्त होणार नाही

By admin | Updated: December 2, 2014 23:17 IST

विनोद तावडे : माध्यमिक अध्यापक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला आश्वासन

टेेंभ्ये : सध्या राज्यामध्ये सुरु असणाऱ्या सन २०१३-१४च्या संचमान्यतेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एकही शिक्षक अतिरिक्त होणार नसल्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्र्यांनी माध्यमिक अध्यापक संघाच्या शिष्टमंडळाला दिले. ते रत्नागिरी दौऱ्यावर असताना रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. राज्यातील सर्व अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षणसेवकांच्या प्रश्नाबाबत विचारले असता शिक्षणसेवकांची सेवा समाप्त केली जाणार नाही. त्यांना सेवा संरक्षण देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शिक्षणमंत्री विनोद तावडे नुकतेच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष भारत घुले, सचिव अशोक आलमान, सदाशिव चावरे, सी. एस. पाटील, आत्माराम मेस्त्री, एम. आर. पाटील व अन्य सदस्यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी संघटनेच्यावतीने त्यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये काही प्रमुख मागण्या शिक्षण मंत्र्यांसमोर ठेवण्यात आल्या. त्यामध्ये कोकण विभागासाठी उपसंचालक कार्यालय स्वतंत्र करावे, कोकणासाठी पटसंख्येचे वेगळे निकष तयार करण्यात यावेत, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत त्यांचा पगार मूळ आस्थापनेतून काढण्यात यावा, विनाअट निवडश्रेणी देण्यात यावी, शिक्षक संख्येचा निकष पूर्वीप्रमाणेच वापरला जावा, राज्य पुरस्कारप्राप्त सन २००७ पासून सर्वच शिक्षकांना १ लाख रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे, शिक्षणसेवकांना सेवा संरक्षण मिळावे, अनुदानास पात्र शाळांमधील पूर्वीच्या कर्मचाऱ्यांबाबतीत आरक्षणाच्या अटी शिथील कराव्यात, नव्याने अनुदान मंजूर झालेल्या शाळांचे पुनर्मुल्यांकन करु नये, या मागण्यांचा समावेश आहे. याबाबत सविस्तर चर्चा केली. (वार्ताहर)शाळा बंद होणार नाहीत?विद्यार्थीसंख्येच्या नवीन निकषांमुळे अनेक शाळा बंद होण्याची परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली आहे. याबाबत राज्य शासन गांभीर्याने विचार करीत आहे. शाळा बंद होणार नाहीत, यादृष्टीने आवश्यक ते सर्व प्रयत्न राज्य शासन करणार आहे. राज्यातील शाळा बंद करण्याच्या विरोधात शासन असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले. यामुळे खरोखरच शाळा बंद होणार नाहीत का? याबाबत विविध स्तरावर चर्चा होत आहे.