शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

भुयारी रिंग रोड नको; बीआरटीएस पाहिजे!

By admin | Updated: December 17, 2014 03:18 IST

मुंबईच्या वाहतूक प्रणालीला विकसित करण्यासाठी केंद्राने भुयारी रिंग रोड उभारण्याबाबत पावले उचलली असतानाच वाहतूक तज्ज्ञांनी मात्र यावर टीका केली आहे.

मुंबई : मुंबईच्या वाहतूक प्रणालीला विकसित करण्यासाठी केंद्राने भुयारी रिंग रोड उभारण्याबाबत पावले उचलली असतानाच वाहतूक तज्ज्ञांनी मात्र यावर टीका केली आहे. मुंबईची वाहतूक प्रणाली विकसित करायची असेल आणि सर्वसामान्यांसाठी त्याचा फायदा होणे गरजेचे असेल, तर मुंबईत बस रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम (बीआरटीएस) उभारण्यात यावी, असा सूर त्यांनी लावला आहे.वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ब्रिज इंजिनीअर्सच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमादरम्यान केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत भुयारी रिंग रोडचे जाळे उभारण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने पावले टाकण्यास सुरुवात केल्याचे सांगितले. वाहतूक तज्ज्ञ सुधीर बदामी यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईच्या लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता केवळ तीन टक्के लोकांनाच अशा प्रकल्पांचा फायदा होईल. मुंबईची लोकसंख्या सव्वा कोटी आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरासाठी भुयारी रिंग रोडसारखे प्रकल्प फायदेशीर ठरत नाहीत, तर ७५ लाख लोकांना वाहून नेणारे रेल्वेसारखे प्रकल्प फायदेशीर ठरतात. शहरी वाहतुकीला पर्याय आहेत. हे पर्याय म्हणजे बीआरटीएस, सार्वजनिक वाहतूक प्रणाली होय. असे प्रकल्प उभारण्यावर सरकारने भर दिला पाहिजे. शिवाय मोटारगाड्यांचा वापर कमी करून लोकांनी सार्वजनिक वाहतूक प्रणालीवर भर दिला तर साहजिकच भुयारी रिंग रोडसारखे प्रकल्प उभारण्याची गरज भासणार नाही आणि पर्यावरणाची हानीदेखील होणार नाही.दरम्यान, सार्वजनिक वाहतूक प्रणालीसाठी केवळ वाहतूक तज्ज्ञांनी आवाज उठवून चालणार नाही, तर येथील प्रवाशांनी आवाज उठवायला पाहिजे, असेही बदामी यांनी आवर्जून नमूद केले. (प्रतिनिधी)