शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

रस्त्यावर गर्दीच्या ठिकाणी मंडप नको

By admin | Updated: March 14, 2015 05:48 IST

नागरिकांना मोकळे व चांगले रस्ते उपलब्ध करू देणे, ही महापालिकेची जबाबदारी असून, शांततेत जगणे हाही नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे़

मुंबई : नागरिकांना मोकळे व चांगले रस्ते उपलब्ध करू देणे, ही महापालिकेची जबाबदारी असून, शांततेत जगणे हाही नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे़ त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी उत्सवांसाठी मंडप उभारण्याची परवानगी पालिकेने मंडळांना देऊ नये़ विनापरवाना लाऊड स्पीकर लावणाऱ्या मंडळांवर तसेच रात्रीच्या वेळेस फटाके फोडणाऱ्यांवरही कारवाई करा, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी पोलिसांना दिले़ठाणे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ़ महेश बेडेकर यांनी संदर्भात जनहित याचिका केली आहे़ त्यात सादर झालेल्या दोन स्वतंत्र अर्जांवर न्या़ अभय ओक व न्या़ अनिल मेनन यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले़ हे आदेश देताना मंडपांसाठी परवानगी देण्याकरिता पालिकेने धोरण निश्चित करावे, असे बजावले़ हे धोरण करताना अधिक रहदारी व वाहतूक असलेल्या ठिकाणी, हॉस्पिटल, कॉलेज, रेल्वे स्थानक व बस स्टॅण्डजवळ मंडप उभारण्याची परवानगी देऊ नका, असेही न्यायालयाने पालिकेला बजावले आहे़न्यायालयाने ४६ पानी आदेशात विनापरवाना लाऊड स्पीकर लावणारी मंडळे व नागरिक यांच्यावरही कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत़ शांतता क्षेत्रासह इतर ठिकाणी विनापरवाना लाऊड स्पीकर लागला असल्यास त्याची तक्रार नोंदवण्यासाठी एक यंत्रणा स्थापना करा़ या यंत्रणेकडे नागरिक टोल फ्री  नंबर, एसएमएस व ई-मेलद्वारे तक्रार करू शकतील़ या तक्रारीची नोंद ठेवा व किती तक्रारींवर कारवाई केली याचा तपशील जिल्हा कार्यालय व महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत़तक्रार निवारण यंत्रणा सुरू होईपर्यंत १०० नंबरवर अधिक आवाजाची तक्रार करण्याची व्यवस्था करा़ याद्वारे येणाऱ्या तक्रारीवर स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने तत्काळ कारवाई करावी़ प्रत्यक्षात घटनास्थळी जाऊन लाऊड स्पीकर बंद करावा व पुढे जाऊन लाऊड स्पीकर वापरण्याचा परवानाही रद्द करावा़ तसेच म्हणजे शांतता क्षेत्रात रात्रीच्या वेळेस फटाके फोडणाऱ्यांवरही कारवाई करा, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे़दहीहंडी, गणपती व नवरात्रौत्सव सुरू होण्याआधी याचे महापालिकेने याचे धोरण निश्चित करून त्याची माहिती नागरिकांना द्यावी़ एखाद्या मंडळाने गेल्यावर्षी आवाजाचे नियम पाळले नसल्यास त्या मंडळाला लाऊड स्पीकरची परवानगीच देऊ नका, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे़ प्रशासनाने हे धोरण निश्चित करून त्याची माहिती येत्या ६ जूनला न्यायालयात सादर करावी, असे आदेशही खंडपीठाने दिले आहेत़ (प्रतिनिधी)