शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

रस्त्यावर गर्दीच्या ठिकाणी मंडप नको

By admin | Updated: March 14, 2015 05:48 IST

नागरिकांना मोकळे व चांगले रस्ते उपलब्ध करू देणे, ही महापालिकेची जबाबदारी असून, शांततेत जगणे हाही नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे़

मुंबई : नागरिकांना मोकळे व चांगले रस्ते उपलब्ध करू देणे, ही महापालिकेची जबाबदारी असून, शांततेत जगणे हाही नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे़ त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी उत्सवांसाठी मंडप उभारण्याची परवानगी पालिकेने मंडळांना देऊ नये़ विनापरवाना लाऊड स्पीकर लावणाऱ्या मंडळांवर तसेच रात्रीच्या वेळेस फटाके फोडणाऱ्यांवरही कारवाई करा, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी पोलिसांना दिले़ठाणे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ़ महेश बेडेकर यांनी संदर्भात जनहित याचिका केली आहे़ त्यात सादर झालेल्या दोन स्वतंत्र अर्जांवर न्या़ अभय ओक व न्या़ अनिल मेनन यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले़ हे आदेश देताना मंडपांसाठी परवानगी देण्याकरिता पालिकेने धोरण निश्चित करावे, असे बजावले़ हे धोरण करताना अधिक रहदारी व वाहतूक असलेल्या ठिकाणी, हॉस्पिटल, कॉलेज, रेल्वे स्थानक व बस स्टॅण्डजवळ मंडप उभारण्याची परवानगी देऊ नका, असेही न्यायालयाने पालिकेला बजावले आहे़न्यायालयाने ४६ पानी आदेशात विनापरवाना लाऊड स्पीकर लावणारी मंडळे व नागरिक यांच्यावरही कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत़ शांतता क्षेत्रासह इतर ठिकाणी विनापरवाना लाऊड स्पीकर लागला असल्यास त्याची तक्रार नोंदवण्यासाठी एक यंत्रणा स्थापना करा़ या यंत्रणेकडे नागरिक टोल फ्री  नंबर, एसएमएस व ई-मेलद्वारे तक्रार करू शकतील़ या तक्रारीची नोंद ठेवा व किती तक्रारींवर कारवाई केली याचा तपशील जिल्हा कार्यालय व महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत़तक्रार निवारण यंत्रणा सुरू होईपर्यंत १०० नंबरवर अधिक आवाजाची तक्रार करण्याची व्यवस्था करा़ याद्वारे येणाऱ्या तक्रारीवर स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने तत्काळ कारवाई करावी़ प्रत्यक्षात घटनास्थळी जाऊन लाऊड स्पीकर बंद करावा व पुढे जाऊन लाऊड स्पीकर वापरण्याचा परवानाही रद्द करावा़ तसेच म्हणजे शांतता क्षेत्रात रात्रीच्या वेळेस फटाके फोडणाऱ्यांवरही कारवाई करा, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे़दहीहंडी, गणपती व नवरात्रौत्सव सुरू होण्याआधी याचे महापालिकेने याचे धोरण निश्चित करून त्याची माहिती नागरिकांना द्यावी़ एखाद्या मंडळाने गेल्यावर्षी आवाजाचे नियम पाळले नसल्यास त्या मंडळाला लाऊड स्पीकरची परवानगीच देऊ नका, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे़ प्रशासनाने हे धोरण निश्चित करून त्याची माहिती येत्या ६ जूनला न्यायालयात सादर करावी, असे आदेशही खंडपीठाने दिले आहेत़ (प्रतिनिधी)