शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

कायदा तोडण्याची परवानगी कोणताच धर्म देत नाही!

By admin | Updated: August 11, 2016 04:57 IST

ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन विशेषत: धार्मिक सणांच्या काळात केले जाते. मोठमोठ्याने आवाज करूनच सण साजरा करावा, असे कोणत्याही धर्मात म्हटलेले नाही

मुंबई : ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन विशेषत: धार्मिक सणांच्या काळात केले जाते. मोठमोठ्याने आवाज करूनच सण साजरा करावा, असे कोणत्याही धर्मात म्हटलेले नाही. कायदा तोडण्याची परवानगी कोणाताच धर्म देत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले. राजकीय सभेतही मोठमोठ्याने ध्वनिक्षेपक लावून ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी प्रशासनाने जरी उपाययोजना केल्या त्यांना ‘राजकारणी साहेबां’कडून पाठिंबा मिळत नाही, अशी चपराकही न्यायालयाने राजकर्त्यांना लगावली.

राज्यात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन केले जात नसल्याने राज्य सरकारला त्याचे पालन करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिका ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते महेश बेडेकर, नवी मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते संतोष पाचलग आणि आवाज फाउंडेशनने उच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. या सर्व याचिकांवर आदेश देण्यास बुधवारपासून सुरुवात झाली. उच्च न्यायालयाने आदेश देताना राज्यकर्त्यांना व सरकारला चांगलेच फटकारले. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. या राज्यात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी, तत्त्वज्ञांनी जन्म घेतला.

त्यात ही भूमी देशाचे संविधान तयार करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आहे. मात्र दुर्दैवाने याच राज्यात नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी व नियमांचे पालन करण्यासाठी उच्च न्यायालयाला आदेश द्यावा लागतो. उच्च न्यायालयाला आपला अमूल्य वेळ वाया घालवावा लागतो. राज्य सरकार स्वत:चे कर्तव्य बजावत नसून स्वत:च्या जबाबदाऱ्यांकडे पूर्णपणे दूर्लक्ष करत आहे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले.

शुक्रवारीही उच्च न्यायालय अंतिम आदेश देणार आहे. उत्सवांचे दिवस जवळ आल्याने उच्च न्यायालयाने राज्यातील पोलिसांना ध्वनीमापक यंत्रे देण्यात आली की नाही, याची विचारणा सरकारी वकिलांकडे केली. आतापर्यंत पोलिसांना ध्वनीमापक यंत्रे मिळाली नसली तर आम्ही सरकारविरुद्ध अवमान नोटीस काढू, अशी तंबीही उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिली. (प्रतिनिधी)