शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कायदा तोडण्याची परवानगी कोणताच धर्म देत नाही!

By admin | Updated: August 11, 2016 04:57 IST

ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन विशेषत: धार्मिक सणांच्या काळात केले जाते. मोठमोठ्याने आवाज करूनच सण साजरा करावा, असे कोणत्याही धर्मात म्हटलेले नाही

मुंबई : ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन विशेषत: धार्मिक सणांच्या काळात केले जाते. मोठमोठ्याने आवाज करूनच सण साजरा करावा, असे कोणत्याही धर्मात म्हटलेले नाही. कायदा तोडण्याची परवानगी कोणाताच धर्म देत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले. राजकीय सभेतही मोठमोठ्याने ध्वनिक्षेपक लावून ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी प्रशासनाने जरी उपाययोजना केल्या त्यांना ‘राजकारणी साहेबां’कडून पाठिंबा मिळत नाही, अशी चपराकही न्यायालयाने राजकर्त्यांना लगावली.

राज्यात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन केले जात नसल्याने राज्य सरकारला त्याचे पालन करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिका ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते महेश बेडेकर, नवी मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते संतोष पाचलग आणि आवाज फाउंडेशनने उच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. या सर्व याचिकांवर आदेश देण्यास बुधवारपासून सुरुवात झाली. उच्च न्यायालयाने आदेश देताना राज्यकर्त्यांना व सरकारला चांगलेच फटकारले. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. या राज्यात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी, तत्त्वज्ञांनी जन्म घेतला.

त्यात ही भूमी देशाचे संविधान तयार करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आहे. मात्र दुर्दैवाने याच राज्यात नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी व नियमांचे पालन करण्यासाठी उच्च न्यायालयाला आदेश द्यावा लागतो. उच्च न्यायालयाला आपला अमूल्य वेळ वाया घालवावा लागतो. राज्य सरकार स्वत:चे कर्तव्य बजावत नसून स्वत:च्या जबाबदाऱ्यांकडे पूर्णपणे दूर्लक्ष करत आहे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले.

शुक्रवारीही उच्च न्यायालय अंतिम आदेश देणार आहे. उत्सवांचे दिवस जवळ आल्याने उच्च न्यायालयाने राज्यातील पोलिसांना ध्वनीमापक यंत्रे देण्यात आली की नाही, याची विचारणा सरकारी वकिलांकडे केली. आतापर्यंत पोलिसांना ध्वनीमापक यंत्रे मिळाली नसली तर आम्ही सरकारविरुद्ध अवमान नोटीस काढू, अशी तंबीही उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिली. (प्रतिनिधी)