शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सेना - भाजपाच्या वादातून कुणीही सत्ता सोडणार नाही - शरद पवार

By admin | Updated: July 2, 2016 18:37 IST

जवळपास निम्म्या राज्यात पाऊस नाही,त्यामुळे धरणातील पाणीसाठय़ावर देखील परिणाम झालेला आहे मात्र याबाबत राज्यकर्त्यांना गांर्भीर्य नाही अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली

ऑनलाइन लोकमत - 
बार्शी, of. 02 -  हवामान खात्याच्या अंदाजानूसार पाऊस पडणार म्हटल्याचे दिवस गेले आहेत, जवळपास निम्म्या राज्यात पाऊस नाही,त्यामुळे धरणातील पाणीसाठय़ावर देखील परिणाम झालेला आहे, अशीच स्थिती राहीली तर काळजी करावी लागेल मात्र याबाबत राज्यकर्त्यांना गांर्भीर्य नाही अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
 
शरद पवार हे बार्शीतील सुविधा हॉस्पिटलच्या शुभारंभानिमीत्त बार्शी दौ-यावर आले होते, यादरम्यान ते भोजनासाठी आमदार दिलीप सोपल यांच्या निवासस्थानी आले असता पत्रकारांशी बोलत होते. मुंबईतील डॉ. आंबेडकर भवनाच्या वादासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले की, या ट्रस्टचे प्रमुख असलेले रत्नाकर गायकवाड हे राज्याचे मुख्य सचिव होते. त्यांना कायदे, नियम, प्रशासन या सर्व बाबींची माहिती आहे, तरी देखील प्रकाश आंबेडकरासह सर्वजण तक्रारी करीत आहेत ,त्यामुळे त्यांच्या तक्रारीत तथ्य आहे असे वाटते, हा प्रश्न लोकांच्या भावनेशी निगडीत आहे,त्यामुळे सरकारने तातडीने या प्रकरणात लक्ष घालून वस्तुस्थिती जाणून घेऊन याबाबतचा निर्णय घ्यावा असा सल्ला पवार यांनी दिला.
 
पाऊस नसल्यामुळे काळजी करण्याचे दिवस आहेत. राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर ,पुणे, अहमदनगर, धुळे, नाशिक, नंदुरबार आदी ठिकाणी पाऊस नाही, काही ठिकाणी शेतक-यांनी पेरण्या केलेल्या आहेत असंही शरद पवार बोलले आहेत.
 
भाजपा-शिवसेना युतीमध्ये सुरु असलेल्या शोले वादासंदर्भात प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले सेना-भाजपाच्या  या वादातून काहीही होणार  नाही. कुणीही सत्ता सोडणार नाही,कारण गुळाच्या ढेपेला मुंगळे हे चिटकलेले असतात तशी स्थिती आहे. ते एकमेकाविरोधात बोलतील, चर्चा करतील वाद करतील,भांडतील मात्र गळ्यात गळे घालून सत्ता उपभोगतील असा चिमटा पवारांनी काढला. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युती होणार का ? असे विचारले असतो याबाबत सांगता येणार नाही, अद्याप तशी बैठक झालेली नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेत एकत्र येणे अवघड असते, प्रत्येकाचा स्थानिक इन्ट्रेस्ट असतो, आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो आहोत, मात्र एकत्र येणार नाही  असे नाही असेही ते म्हणाले.
 
अनेक खाजगी कारखान्यांनी कॉर्पोरेट लोनच्या नावाखाली शेतक-यांच्या शेअर्स व जमीनीवर कर्ज घेतल्याचे उघड झाले त्यावर बोला असे म्हणतातच याबाबत मला काही माहित नाही, मात्र असे झाले असेल तर ती फसवणूक आहे, याबाबत कायदेशीर कारवाईच करावीच लागेल. छत्रपती अनं पेशवे याबत विचारले असते तो प्रश्न आता संपलेला आह़े तसेच मी कधीही सहज बोलत नसतो तर विचार करुन बोलतो असेही शरद पवार म्हणाले. यावेळी आमदार दिलीप सोपल, आमदार बबनदादा शिंदे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजन पाटील, माजी आमदार दिपक सांळुंखे पाटील, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल ,नगराध्यक्ष दगडू मांगडे,नागेश अक्कलकोटे, आर्यन सोपल, युवराज काटे आदी उपस्थित होत़े