शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सेना - भाजपाच्या वादातून कुणीही सत्ता सोडणार नाही - शरद पवार

By admin | Updated: July 2, 2016 18:37 IST

जवळपास निम्म्या राज्यात पाऊस नाही,त्यामुळे धरणातील पाणीसाठय़ावर देखील परिणाम झालेला आहे मात्र याबाबत राज्यकर्त्यांना गांर्भीर्य नाही अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली

ऑनलाइन लोकमत - 
बार्शी, of. 02 -  हवामान खात्याच्या अंदाजानूसार पाऊस पडणार म्हटल्याचे दिवस गेले आहेत, जवळपास निम्म्या राज्यात पाऊस नाही,त्यामुळे धरणातील पाणीसाठय़ावर देखील परिणाम झालेला आहे, अशीच स्थिती राहीली तर काळजी करावी लागेल मात्र याबाबत राज्यकर्त्यांना गांर्भीर्य नाही अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
 
शरद पवार हे बार्शीतील सुविधा हॉस्पिटलच्या शुभारंभानिमीत्त बार्शी दौ-यावर आले होते, यादरम्यान ते भोजनासाठी आमदार दिलीप सोपल यांच्या निवासस्थानी आले असता पत्रकारांशी बोलत होते. मुंबईतील डॉ. आंबेडकर भवनाच्या वादासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले की, या ट्रस्टचे प्रमुख असलेले रत्नाकर गायकवाड हे राज्याचे मुख्य सचिव होते. त्यांना कायदे, नियम, प्रशासन या सर्व बाबींची माहिती आहे, तरी देखील प्रकाश आंबेडकरासह सर्वजण तक्रारी करीत आहेत ,त्यामुळे त्यांच्या तक्रारीत तथ्य आहे असे वाटते, हा प्रश्न लोकांच्या भावनेशी निगडीत आहे,त्यामुळे सरकारने तातडीने या प्रकरणात लक्ष घालून वस्तुस्थिती जाणून घेऊन याबाबतचा निर्णय घ्यावा असा सल्ला पवार यांनी दिला.
 
पाऊस नसल्यामुळे काळजी करण्याचे दिवस आहेत. राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर ,पुणे, अहमदनगर, धुळे, नाशिक, नंदुरबार आदी ठिकाणी पाऊस नाही, काही ठिकाणी शेतक-यांनी पेरण्या केलेल्या आहेत असंही शरद पवार बोलले आहेत.
 
भाजपा-शिवसेना युतीमध्ये सुरु असलेल्या शोले वादासंदर्भात प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले सेना-भाजपाच्या  या वादातून काहीही होणार  नाही. कुणीही सत्ता सोडणार नाही,कारण गुळाच्या ढेपेला मुंगळे हे चिटकलेले असतात तशी स्थिती आहे. ते एकमेकाविरोधात बोलतील, चर्चा करतील वाद करतील,भांडतील मात्र गळ्यात गळे घालून सत्ता उपभोगतील असा चिमटा पवारांनी काढला. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युती होणार का ? असे विचारले असतो याबाबत सांगता येणार नाही, अद्याप तशी बैठक झालेली नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेत एकत्र येणे अवघड असते, प्रत्येकाचा स्थानिक इन्ट्रेस्ट असतो, आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो आहोत, मात्र एकत्र येणार नाही  असे नाही असेही ते म्हणाले.
 
अनेक खाजगी कारखान्यांनी कॉर्पोरेट लोनच्या नावाखाली शेतक-यांच्या शेअर्स व जमीनीवर कर्ज घेतल्याचे उघड झाले त्यावर बोला असे म्हणतातच याबाबत मला काही माहित नाही, मात्र असे झाले असेल तर ती फसवणूक आहे, याबाबत कायदेशीर कारवाईच करावीच लागेल. छत्रपती अनं पेशवे याबत विचारले असते तो प्रश्न आता संपलेला आह़े तसेच मी कधीही सहज बोलत नसतो तर विचार करुन बोलतो असेही शरद पवार म्हणाले. यावेळी आमदार दिलीप सोपल, आमदार बबनदादा शिंदे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजन पाटील, माजी आमदार दिपक सांळुंखे पाटील, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल ,नगराध्यक्ष दगडू मांगडे,नागेश अक्कलकोटे, आर्यन सोपल, युवराज काटे आदी उपस्थित होत़े