शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सेना - भाजपाच्या वादातून कुणीही सत्ता सोडणार नाही - शरद पवार

By admin | Updated: July 2, 2016 18:37 IST

जवळपास निम्म्या राज्यात पाऊस नाही,त्यामुळे धरणातील पाणीसाठय़ावर देखील परिणाम झालेला आहे मात्र याबाबत राज्यकर्त्यांना गांर्भीर्य नाही अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली

ऑनलाइन लोकमत - 
बार्शी, of. 02 -  हवामान खात्याच्या अंदाजानूसार पाऊस पडणार म्हटल्याचे दिवस गेले आहेत, जवळपास निम्म्या राज्यात पाऊस नाही,त्यामुळे धरणातील पाणीसाठय़ावर देखील परिणाम झालेला आहे, अशीच स्थिती राहीली तर काळजी करावी लागेल मात्र याबाबत राज्यकर्त्यांना गांर्भीर्य नाही अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
 
शरद पवार हे बार्शीतील सुविधा हॉस्पिटलच्या शुभारंभानिमीत्त बार्शी दौ-यावर आले होते, यादरम्यान ते भोजनासाठी आमदार दिलीप सोपल यांच्या निवासस्थानी आले असता पत्रकारांशी बोलत होते. मुंबईतील डॉ. आंबेडकर भवनाच्या वादासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले की, या ट्रस्टचे प्रमुख असलेले रत्नाकर गायकवाड हे राज्याचे मुख्य सचिव होते. त्यांना कायदे, नियम, प्रशासन या सर्व बाबींची माहिती आहे, तरी देखील प्रकाश आंबेडकरासह सर्वजण तक्रारी करीत आहेत ,त्यामुळे त्यांच्या तक्रारीत तथ्य आहे असे वाटते, हा प्रश्न लोकांच्या भावनेशी निगडीत आहे,त्यामुळे सरकारने तातडीने या प्रकरणात लक्ष घालून वस्तुस्थिती जाणून घेऊन याबाबतचा निर्णय घ्यावा असा सल्ला पवार यांनी दिला.
 
पाऊस नसल्यामुळे काळजी करण्याचे दिवस आहेत. राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर ,पुणे, अहमदनगर, धुळे, नाशिक, नंदुरबार आदी ठिकाणी पाऊस नाही, काही ठिकाणी शेतक-यांनी पेरण्या केलेल्या आहेत असंही शरद पवार बोलले आहेत.
 
भाजपा-शिवसेना युतीमध्ये सुरु असलेल्या शोले वादासंदर्भात प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले सेना-भाजपाच्या  या वादातून काहीही होणार  नाही. कुणीही सत्ता सोडणार नाही,कारण गुळाच्या ढेपेला मुंगळे हे चिटकलेले असतात तशी स्थिती आहे. ते एकमेकाविरोधात बोलतील, चर्चा करतील वाद करतील,भांडतील मात्र गळ्यात गळे घालून सत्ता उपभोगतील असा चिमटा पवारांनी काढला. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युती होणार का ? असे विचारले असतो याबाबत सांगता येणार नाही, अद्याप तशी बैठक झालेली नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेत एकत्र येणे अवघड असते, प्रत्येकाचा स्थानिक इन्ट्रेस्ट असतो, आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो आहोत, मात्र एकत्र येणार नाही  असे नाही असेही ते म्हणाले.
 
अनेक खाजगी कारखान्यांनी कॉर्पोरेट लोनच्या नावाखाली शेतक-यांच्या शेअर्स व जमीनीवर कर्ज घेतल्याचे उघड झाले त्यावर बोला असे म्हणतातच याबाबत मला काही माहित नाही, मात्र असे झाले असेल तर ती फसवणूक आहे, याबाबत कायदेशीर कारवाईच करावीच लागेल. छत्रपती अनं पेशवे याबत विचारले असते तो प्रश्न आता संपलेला आह़े तसेच मी कधीही सहज बोलत नसतो तर विचार करुन बोलतो असेही शरद पवार म्हणाले. यावेळी आमदार दिलीप सोपल, आमदार बबनदादा शिंदे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजन पाटील, माजी आमदार दिपक सांळुंखे पाटील, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल ,नगराध्यक्ष दगडू मांगडे,नागेश अक्कलकोटे, आर्यन सोपल, युवराज काटे आदी उपस्थित होत़े