शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

माझे कुणीच ऐकेना!

By admin | Updated: July 2, 2016 04:50 IST

जास्तीची खरेदी निविदेद्वारे करावी, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश असताना सामाजिक न्याय विभागात मात्र विनानिविदा कोट्यवधी रुपयांची खरेदी बिनदिक्कत सुरू

माझे कुणीच ऐकेना!यदु जोशी ल्ल मुंबई तीन लाख रुपयांपेक्षा जास्तीची खरेदी निविदेद्वारे करावी, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश असताना सामाजिक न्याय विभागात मात्र विनानिविदा कोट्यवधी रुपयांची खरेदी बिनदिक्कत सुरू आहे. विशेष म्हणजे, दर करारावर (आरसी) खरेदी करू नये अशी माझी भूमिका असतानाही खालचे अधिकारी मंत्रालयाशी संपर्क न करता परस्पर खरेदी करतात, असे उत्तर सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले.सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या वसतिगृहांमध्ये अन्नधान्य व इतर वस्तूंचा पुरवठा करण्याचे हे प्रकरण आहे. आघाडी सरकारच्या काळात २०११-१२मध्ये दर करार (आरसी) निश्चित करण्यात आला होता. त्यात कोणत्या वस्तूचा पुरवठा कोणत्या दराने करायचा, हे नमूद केलेले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याच दर करारावर पुरवठा केला जात आहे. हे काम महाराष्ट्र स्टेट कंझ्युमर फेडरेशनला देण्यात येते. फेडरेशन पुरवठादार निश्चित करते. हे पुरवठादार वस्तूंची खरेदी करून त्यांचा पुरवठा वसतिगृहांना करतात. कोणतीही निविदा न काढता हे काम केले जात आहे. आघाडी सरकारमध्ये दर करारावर होत असलेली खरेदी भाजपा सरकारनेही कायम ठेवली आहे. या काळात जवळपास ५० कोटी रुपयांची खरेदी दर करारावर झाल्याचे समोर आले आहे. आधीच्या सरकारमधीलच काही कंत्राटदार या सरकारमध्येही लाभार्थी ठरत आहेत. खरेदी निविदेद्वारे होऊ नये यासाठी विभागातीलच काही अधिकाऱ्यांचे कंत्राटदारांशी संगनमत असल्याचे बोलले जाते. इतर विभागांमध्ये निविदेद्वारे खरेदी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाते आणि सामाजिक न्याय विभागाला मात्र संपूर्ण मोकळीक दिली जाते, या बद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्यास आयुक्तांना सांगितले आहे. २० टक्के पुरवठ्याचे काम अनुसूचित जातीच्या संस्थांना मिळावे यासाठी काहींनी न्यायालयात धाव घेतली आहे. निविदा पद्धतीने खरेदीची पद्धत लवकरच अवलंबिली जाईल. - राजकुमार बडोले, सामाजिक न्याय मंत्री>एवढे दर परवडतातच कसे?आरसीद्वारे निश्चित करण्यात आलेले दर बघितले तर पुरवठादारांना ते परवडतात कसे, असा प्रश्न निर्माण होतो. उदाहरणार्थ - तूरडाळ ८५ रुपये किलो, ज्वारी २२ रु. किलो, बाजरी २० रु. किलो, चणाडाळ ६५ रु., मूगडाळ ७५ रु., वनस्पती तूप ५० रु., शेंगदाणा ८५ रु. किलो या दरात पुरवठा केला जात आहे. आजच्या बाजारभावाशी ते अत्यंत विसंगत आहे. अल्प दर आणि सोबतच वाहतूक खर्च, कंझ्युमर फेडरेशनचे (अधिकृत व अनधिकृत कमिशन) हे सगळे गृहीत धरले तर काहीतरी गौडबंगाल असल्याचाच वास येतो. जाणकारांच्या मते शंभर टक्के पुरवठा होतो की नाही, याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे.