शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

मुंबईत नवीन बांधकाम नाहीच!

By admin | Updated: May 5, 2017 04:29 IST

शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी वारंवार मुदतवाढ देऊनही मुंबई महापालिका घनकचरा व्यवस्थापनानुसार

मुंबई : शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी वारंवार मुदतवाढ देऊनही मुंबई महापालिका घनकचरा व्यवस्थापनानुसार शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास अपयशी ठरल्याने फेब्रुवारी २०१६मध्ये उच्च न्यायालयाने मुंबई शहरात नवे बांधकाम करण्यास स्थगिती दिली. या याचिकेवर पुनर्विचार करावा, यासाठी महाराष्ट्र चेंबर आॅफ हाउसिंग इंडस्ट्रीने (एमसीएचआय) फेरविचार याचिका दाखल केली. मात्र, महापालिकेने अद्याप दिलेल्या आदेशाचे पालन केले नसल्याचे म्हणत, उच्च न्यायालयाने स्थगितीच्या आदेशात सुधारणा करण्यास नकार दिला. अद्यापही सुमारे ५,८०० मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट बेकायदेशीर लावण्यात येत आहे. डम्पिंग ग्राउंडसाठी मुलुंड येथील ऐरोली ब्रीजजवळ व तळोजा येथे जागा निश्चित करण्यात आली आहे. या प्रस्तावित जागा वादग्रस्त आहेत. त्यामुळे भविष्यात हे वाद लवकर सुटतील आणि महापालिका घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमानुसार कचऱ्याची विल्हेवाट लावेल, असे खुद्द पालिका आयुक्त अजय मेहता यांनी केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट होत नाही. त्यामुळे नव्या बांधकामांना स्थगिती देण्यासंदर्भात दिलेल्या आदेशात सुधारणा करू शकत नसल्याचे न्या. अभय ओक व न्या. सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठाने म्हटले.याचिकेनुसार, आदेशात म्हटल्याप्रमाणे बांधकामाचा कचरा देवनार किंवा अन्य कोणत्याही डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येत नाही. तसेच घनकचरा व्यवस्थापनाचे नियम बांधकाम व्यवसायाला लागू होत नाहीत. त्यामुळे ज्या आधारावर हा आदेश देण्यात आला आहे, तो आधारच चुकीचा आहे. त्याशिवाय उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे विकासकांचे नुकसान झाले आहे. या आदेशामुळे मुंबईत झोपडपट्ट्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच झोपडपट्टीधारकांना वेगवेगळ्या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांत घर घेण्याचे स्वप्न भंगेल. घनकचरा व्यवस्थापन नियमांचे पालन करण्यास महापालिका सपशेल अपयशी ठरली आहे. वास्तविकता ही मुदत १२ वर्षांपूर्वीच संपली आहे. शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडे केवळ एकच डम्पिंग ग्राउंड उपलब्ध आहे. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडची क्षमता ३ हजार मेट्रिक टन आहे. तर शहरात सुमारे ८६०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. याचिकाकर्त्यांनी आदेशात सुधारणा करावी, अशी केस तयार केली नसल्याने आम्ही आमच्या आदेशात सुधारणा करू शकत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने एमसीएचआयची याचिका फेटाळली. (प्रतिनिधी) रेडिरेकनरचा दर बोलकाखंडपीठाने याचिकाकर्त्यांचा एक-एक मुद्दा खोडत म्हटले की, नव्या बांधकामांना परवानगी दिली तर कचरा वाढेल, हे उच्च न्यायालयाचे  म्हणणे अयोग्य आहे, असे महापालिका किंवा याचिकाकर्त्यांनी म्हटलेले नाही. त्यांनी याबाबत मौन बाळगले आहे. घनकचरा व्यवस्थापनाचे नियम पाळण्याबाबत महापालिका किंवा विकासक स्वत:हून पुढे येऊन काहीही सांगत नाहीत. झोपडपट्टीधारकांना शहरात दोन लाखांत घर मिळेल, असा मजेदार युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला आहे. शहरातल्या कोणत्या भागात दोन लाखांत घरे मिळणार आहेत? याबाबत आम्ही काही बोलावे, असे वाटत नाही. रेडिरेकनरचा दरच बोलेल.