शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
2
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
3
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
4
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
5
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
6
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
7
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
8
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
9
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
10
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
11
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
12
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
13
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
14
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
15
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
16
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
17
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
18
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
19
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
20
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

पाण्यावर कोणाचीही मक्तेदारी नाही

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

पाणी राज्य सरकारचे आहे. त्यामुळे पाण्यावर कोणाचीही मक्तेदारी चालू शकणार नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने मराठवाड्याला पाणी न सोडण्याच्या भूमिकेवर अडून बसलेल्या

मुंबई : पाणी राज्य सरकारचे आहे. त्यामुळे पाण्यावर कोणाचीही मक्तेदारी चालू शकणार नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने मराठवाड्याला पाणी न सोडण्याच्या भूमिकेवर अडून बसलेल्या नाशिक-नगरकरांना सुनावले.मराठवाड्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने गोदावरी- मराठवाडा पाटबंधारे विकास प्राधिकरणाने (जीएमआयडीसी) जायकवाडी धरणात १२. ६४ टीमएसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. जीएमआयडीसीच्या या निर्णयाला नाशिक-नगरमधील संजीवनी सहकारी साखर कारखाना, डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील साखर कारखान व अन्य काही संस्थांनी आणि स्थानिकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. तर मराठवाड्यातील काही संस्थांनी व स्थानिकांनी सरकारच्या समर्थनार्थ अनेक याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. शनिवारच्या सुनावणीवेळी नाशिक-नगरच्या साखर कारखान्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. ‘महाराष्ट्राचे पाणी आंध ्रप्रदेशला जाऊ नये, यासाठी जायकवाडी धरण बांधण्यात आले. या धरणाच्या पाठच्या बाजूला साठत असलेले पाणी येथील गावकरी उपसतात. त्यामुळे धरणात पाणी पोहचतच नाही. त्याचा भुर्दंड नाशिक-नगरकरांना भोगावा लागतो. दर वेळी मराठवाड्यासाठी नाशिक-नगरकरांच्या हिस्स्याचे पाणी द्यावे लागते. नाशिक- नगरमधील धरणे येथील स्थानिकांसाठी आहेत. त्यामुळे आधी नाशिक - नगरकरांच्या गरजा भागवण्यात याव्यात. ही धरणे आमची आहेत,’ असा युक्तिवाद नाशिक - नगरकरांच्या वकिलांनी खंडपीठापुढे केला.त्यावर उच्च न्यायालयाने साखर कारखान्यांनी याचिका का दाखल केल्या? असा प्रश्न करत साखर कारखान्यांच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. ‘कारखान्याचे सदस्य शेतकरी आहेत. आम्ही आमच्या सदस्यांचे हित पाहतो. या हिताआड काही येत असेल तर आम्हाला याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे,’ असाही युक्तिवाद कारखान्यांतर्फे करण्यात आले. (प्रतिनिधी) शनिवारी नाशिक- नगरकरांचा युक्तिवाद संपला आहे. सरकारला अद्याप भूमिका मांडायची संधी मिळालेली नाही. १६ एप्रिल रोजी राज्य सरकार आपली बाजू खंडपीठापुढे मांडेल. त्यामुळे याच दिवशी सर्व पक्ष कार आणि प्रतिवाद्यांची बाजू मांडून पूर्ण होईल व याच दिवशी निकाल राखून ठेवण्यात येईल, असे संकेत उच्च न्यायालयाने दिले आहेत.