शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

एकही मंत्री राजीनामा देणार नाही - मुख्यमंत्री

By admin | Updated: July 18, 2016 05:22 IST

‘झीरो टॉलरन्स फॉर करप्शन’ या तत्त्वानेच आपले सरकार चालले आहे.

मुंबई : ‘झीरो टॉलरन्स फॉर करप्शन’ या तत्त्वानेच आपले सरकार चालले आहे. केवळ विरोधक आरोप करतात म्हणून कोणीही मंत्री राजीनामा देणार नाही. उलट प्रत्येक आरोपाचे ठाम उत्तर दिले जाईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांची पाठराखण केली. पत्रपरिषदेत मुख्यमंत्री म्हणाले, की मंत्री कुठे चुकले असतील तर विरोधकांनी दाखवून द्यावे. आम्ही चर्चेला तयार आहोत. त्यानी १५ वर्षांत काय काय केले ते लपून राहिलेले नाही. अर्थात त्यांनी काही केले म्हणून तसे करण्याचे लायसन्स आम्हाला मिळालेले नाही. शून्य भ्रष्टाचार हेच आमच्या कारभाराचे सूत्र असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. निर्णय शेतकरी हिताचाचबाजार समित्यांच्या बाहेर फळे, भाजीपाल्याच्या विक्रीस परवानगी देण्याच्या शेतकरी हिताच्या निर्णयावर शासन ठाम असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, की बहुतेक व्यापाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. इतरांशी चर्चा करण्यात येईल. सरकार व्यापाऱ्यांच्या नाही तर मक्तेदारीच्या विरोधात आहे. तूरडाळीच्या भावाबाबत ते म्हणाले, की किंमत नियंत्रण कायदा संमतीसाठी राज्याने केंद्राकडे पाठविला आहे. त्याला तत्काळ मान्यता देण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी अलिकडच्या दिल्ली भेटीत आपल्याला दिले आहे. विषय नसलेला सैराट विरोधी पक्षकुठलेही मुद्दे; विषय नसलेला विरोधी पक्ष आपण यापूर्वी पाहिलेला नव्हता. विरोधक दुर्देवाने अजून सैराटमध्येच अडकले आहेत. सैराटपलिकडेदेखील जग आहे, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना काढला.नगरमधील तणावाबद्दल चर्चा करूनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन क्रुरपणे हत्या करण्यात आली. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक आहे. पण या घटनेवरून जिल्ह्यात जातीय तणावाचे प्रसंग उद्भवू नयेत यासाठी सर्व राजकीय पक्षांचे नेते आणि विविध संघटनांच्या नेत्यांशी आपण चर्चा करू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)