शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
4
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
5
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
6
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
7
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
8
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
9
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
10
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
11
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
12
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
13
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
14
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
15
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
16
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
18
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
19
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
20
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

एकही मंत्री राजीनामा देणार नाही - मुख्यमंत्री

By admin | Updated: July 18, 2016 05:22 IST

‘झीरो टॉलरन्स फॉर करप्शन’ या तत्त्वानेच आपले सरकार चालले आहे.

मुंबई : ‘झीरो टॉलरन्स फॉर करप्शन’ या तत्त्वानेच आपले सरकार चालले आहे. केवळ विरोधक आरोप करतात म्हणून कोणीही मंत्री राजीनामा देणार नाही. उलट प्रत्येक आरोपाचे ठाम उत्तर दिले जाईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांची पाठराखण केली. पत्रपरिषदेत मुख्यमंत्री म्हणाले, की मंत्री कुठे चुकले असतील तर विरोधकांनी दाखवून द्यावे. आम्ही चर्चेला तयार आहोत. त्यानी १५ वर्षांत काय काय केले ते लपून राहिलेले नाही. अर्थात त्यांनी काही केले म्हणून तसे करण्याचे लायसन्स आम्हाला मिळालेले नाही. शून्य भ्रष्टाचार हेच आमच्या कारभाराचे सूत्र असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. निर्णय शेतकरी हिताचाचबाजार समित्यांच्या बाहेर फळे, भाजीपाल्याच्या विक्रीस परवानगी देण्याच्या शेतकरी हिताच्या निर्णयावर शासन ठाम असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, की बहुतेक व्यापाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. इतरांशी चर्चा करण्यात येईल. सरकार व्यापाऱ्यांच्या नाही तर मक्तेदारीच्या विरोधात आहे. तूरडाळीच्या भावाबाबत ते म्हणाले, की किंमत नियंत्रण कायदा संमतीसाठी राज्याने केंद्राकडे पाठविला आहे. त्याला तत्काळ मान्यता देण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी अलिकडच्या दिल्ली भेटीत आपल्याला दिले आहे. विषय नसलेला सैराट विरोधी पक्षकुठलेही मुद्दे; विषय नसलेला विरोधी पक्ष आपण यापूर्वी पाहिलेला नव्हता. विरोधक दुर्देवाने अजून सैराटमध्येच अडकले आहेत. सैराटपलिकडेदेखील जग आहे, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना काढला.नगरमधील तणावाबद्दल चर्चा करूनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन क्रुरपणे हत्या करण्यात आली. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक आहे. पण या घटनेवरून जिल्ह्यात जातीय तणावाचे प्रसंग उद्भवू नयेत यासाठी सर्व राजकीय पक्षांचे नेते आणि विविध संघटनांच्या नेत्यांशी आपण चर्चा करू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)