शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

एकही मंत्री भ्रष्ट नाही !

By admin | Updated: July 23, 2016 07:06 IST

विरोधकांना सल्ला देत आपल्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री भ्रष्टाचारी नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ठामपणे सांगितले.

मुंबई : एकच आरोप करा, पण जोरदार करा. उगाच हवेत वार करू नका, असा विरोधकांना सल्ला देत आपल्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री भ्रष्टाचारी नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ठामपणे सांगितले. तर कलंकित मंत्र्यांबाबत समाधानकारक उत्तर न देता सरकारने पळ काढला, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी केला. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह विरोधकांनी आरोप केलेल्या सर्व मंत्र्यांची पाठराखण मुख्यमंत्र्यांनी केली. पंकजा मुंडे, गिरीश महाजन, दिवाकर रावते, जयकुमार रावल, संभाजी पाटील निलंगेकर, रवींद्र वायकर आणि रवींद्र चव्हाण आदी मंत्र्यांवर विरोधकांनी विविध आरोप ठेवले होते. खडसे यांना दाऊदच्या पत्नीचे कॉल्स आल्याच्या आरोपातून लोकायुक्तांनीच निर्दोष मुक्तता केली आहे. एसीबीने कोर्टात गजानन पाटीलविरुद्ध दाखल केलेल्या अरोपपत्रात कुठेही खडसेंचे नाव नाही. तसेच, दाऊदच्या पत्नीने त्यांच्या नंबरवर कॉल्स केलेच नव्हते, हेही आता स्पष्ट झाले आहे. शिवाय, खडसेंवर या बाबत आरोप करणाऱ्या मनीष भंगाळेला पुरावेही देता आलेले नाहीत. आता तो त्याचे मेल हॅक झाल्याचे सांगत आहे. या प्रकरणी चौकशी करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. ‘असे होते तर मग खडसेंनी राजीनामा का दिला?’, अशी विचारणा विरोधी पक्ष सदस्यांनी जागेवर बसूनच केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, पुण्याच्या जमीन प्रकरणी चौकशीसाठी न्या.झोटिंग समिती नेमली असून ती तीन महिन्यांत अहवाल देईल. मी स्वत: त्यावेळी खडसेंशी चर्चा केली होती. मी मंत्रीपदावर असलो तर निर्दोष सुटलो तरी चौकशीत दबाव टाकल्याचा आरोप होईल त्यापेक्षा चौकशी पूर्ण होईपर्यंत राजीनामा देतो, असे खडसे यांनीच आपल्याला मला सांगितले. त्यानुसार त्यांनी राजीनामा दिला, असे मुख्यमंत्री म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)>हाथी चले बाजार तो...विरोधी पक्षांनी आमच्यावर आरोप केले. हाथी चले बाजार तो कुत्ते भोंकते हजार, अशी एक म्हण आहे. आता या म्हणीचे दोन अर्थ होतात असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कोणाला कुत्ते म्हटल्याचा आरोप होऊ शकतो तर दुसरा अर्थ असाही आहे की आरोपांचे मनावर घ्यायचे नसते. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेने घायाळ झालेल्या विरोधकांनी त्यांचे भाषण संपताच गदारोळ केला. या गदारोळात उर्वरित कामकाज गुंडाळण्यात आले.