शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

यापुढे दहावीत एकही विद्यार्थी होणार नाही नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2016 19:50 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च मध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील नापास शेरा या पुढील काळात गुणपत्रिकेवर वापरला जाणार नाही.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 30 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च मध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील नापास शेरा या पुढील काळात गुणपत्रिकेवर वापरला जाणार नाही. राज्याच्या शिक्षण विभागाने या संदर्भात निर्णय घेतला असून राज्य मंडळाकडून  निर्णयाची अंमलबजावणी जुलै-आॅगस्ट 2016 च्या परीक्षेपासून तात्काळ केली जाणार आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये, या उद्देशाने राज्य मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांची जुलै-आॅगस्ट महिन्यातच पुरवणी परीक्षा घेतली जात आहे. विद्यार्थी दहावीत अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना पुढील शैक्षणिक प्रगतीचे मार्ग उपलब्ध होत नव्हते. परिणामी विद्यार्थ्याच्या मानसिक व शारीरिक स्वास्थावर विपरीत परिणाम होत होते. तसेच बरेच विद्यार्थी विघातक कामांकडे वळत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यातच विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर केवळ पास किंवा नापास असे दोनच शेरे दिले जात होते. तसेच एक किंवा दोन विषयात नापास होणारे विद्यार्थी एटीकेटी सुविधेचा लाभ घेवून काही अटींवर अकरावीसाठी पात्र असतील असाही उल्लेख गुणपत्रिकेवर केला जात नव्हता. मात्र, जुलै-आॅगस्ट 2016 च्या पुरवणी परीक्षेच्या गुणपत्रिकेवर व फेब्रुवारी/मार्च 2017 पासून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर नापास शेरा वापरला जाणार नाही, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे म्हणाले, फेब्रुवारी/ मार्च 2017 पासून परीक्षेस प्रविष्ठ होणारे विद्यार्थी एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण झाल्यास गुणपत्रिकेवर नापास असा शेरा न देता ‘एटीकेटीसह अकरावी प्रवेशास पात्र’ असा शेरा दिला जाईल.  तीन किंवा त्या पेक्षा जास्त विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘पुरवणी परीक्षेस पात्र’असा शेरा तर सर्व विषयात उत्तीर्ण असल्यास उत्तीर्ण असाच शेरा राहिल. जुलै- आॅगस्ट 2016 च्या पुरवणी परीक्षेपासून तीन किंवा त्या पेक्षा जास्त विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘ केवळ कौशल्य विकास अभ्यासक्रमाच्या प्रवेशास पात्र’असा शेरा देण्यात येईल.
 
आॅनलाईन गुणपत्रिकेवर अकरावीत प्रवेश 
पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुळ गुणपत्रिका मिळण्यास उशीर होतो. मात्र, हा विलंब टाळण्यासाठी राज्य मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आॅनलाईन निकालाच्या प्रिट आऊटवरून विद्यार्थ्यांना तात्पूर्ता प्रवेश दिला जाईल. निकालाच्या प्रिंट आऊटवर विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेण्यात येईल.मात्र,एका महिन्याच्या आत मुळ गुणपत्रिका महाविद्यालयाकडे जमा करावी लागेल. प्रिंट आऊट व मुळगुणपत्रिकेत तफावत असल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द करावा,असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.