शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ना लाडू, ना फटाके! आमच्या दिवाळीला चुलीवरची भाकरी आणि धपाटे!

By admin | Updated: October 30, 2016 18:08 IST

दरवर्षी ऊस हंगामापूर्वी किंवा नंतर येणारा दिवाळीचा सण यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच आला असल्याने ९० टक्के तोडणी कामगार त्यांची दिवाळी गावाकडेच साजरी करणार आहेत.

आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. 30 -  दरवर्षी ऊस हंगामापूर्वी किंवा नंतर येणारा दिवाळीचा सण यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच आला असल्याने ९० टक्के तोडणी कामगार त्यांची दिवाळी गावाकडेच साजरी करणार आहेत. त्यामुळे काही कारखाने वगळता जिल्ह्यातील सर्वच कारखाने यंदा १५ नोव्हेंबरनंतर गाळपाचा प्रत्यक्षात प्रारंभ करणार आहेत.
पोटाची खळगी भरण्यासाठी गावापासून शेकडो मैल सर्वकाही सोडून सहा ते आठ महिन्यांसाठी ऊसतोड कामगार आता जिल्ह्यात ऊसतोड करण्यासाठी दाखल होऊ लागला आहे. सर्वाधिक कष्टाचं काम करूनही अत्यल्प पैशावर राबणारा ऊसतोडणी कामगार यांत्रिक युगातही कारखान्यासाठी महत्त्वाचा घटक बनला आहे. चोवीस तास काम करताना सर्व सुख-दु:ख विसरून हा कामगार काम करत असतो. 
या काळात येणारे अनेक सण साजरे करता येत नाहीत. दिवाळीचा सण आपल्या घरी नातेवाइकांमध्ये साजरा करावा, अशी तोडकºयांची इच्छा असली तरी अनेकदा दस-यानंतर लगेचच अनेक कारखाने गाळपाचा प्रारंभ करत असल्यामुळे हा कामगार आत्तापर्यंत उसाच्या फडातच दिवाळी साजरा करत आला. 
पहाटेच्या वेळी गाव वेशीवर किंवा शेत शिवारात आकाशात वाजणारे फटाके पाहत आमची मुलंही फटाक्यासाठी हट्ट करतात. मात्र, या मुलांचा हट्ट आम्हाला पुरवता येत नाही. दुसºयाच्या शेतात फटाके वाजताना चुकून आग लागली तर हे नुकसान भरून देणं आम्हाला कधीच शक्य नसतं, अशी भावना तोडकरी बोलून दाखवतात. 
खरंतर हा कष्टकरी अनेक गोष्टीपासून वंचित आहे. काम करणा-या प्रत्येक कामगाराला दिवाळीला बोनस मिळतो; मात्र आजपर्यंत कोणत्याही कारखान्याकडून या तोडणी कामगाराला बोनस मिळाला नाही. ऊसतोड करणाºया पती-पत्नीला मिळून २२० रुपये टनाप्रमाणे हजेरी मिळत आहे. प्रत्येक कामगाराला त्याच्या कामाप्रमाणे दर मिळावा, यासाठी सहायक कामगार आयुक्त महत्त्वाची भूमिका घेतात. किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन मिळावे, यासाठी लक्ष देतात, मग ऊस तोडकामगारांबाबत त्याला मिळणाºया वेतनाचा कोणी प्रश्न उपस्थित का करत नाही? हा मुख्य प्रश्न आहे.
यंदाचा गाळप हंगाम शासनाच्या धोरणाप्रमाणे ५ नोव्हेंबरपासून सुरूकरावा, असे जाहीर असले तरी  हंगामात उसाचे घटलेले क्षेत्र यामुळे हंगाम केवळ ८० ते १०० दिवसच चालणार असल्याने १५ नोव्हेंबरनंतरच हंगामास सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)