शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

ना बाप बडा, ना भैया...

By admin | Updated: June 30, 2016 01:25 IST

औरंगाबाद : शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील केशव पाईप कंपनीच्या आवारात घडलेल्या रमेश रामेश्वर मिसाळ (२६) या कामगाराच्या आत्महत्येला काल धक्कादायक कलाटणी मिळाली.

औरंगाबाद : शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील केशव पाईप कंपनीच्या आवारात घडलेल्या रमेश रामेश्वर मिसाळ (२६) या कामगाराच्या आत्महत्येला काल धक्कादायक कलाटणी मिळाली. ही आत्महत्या नसून खून असल्याचे चिकलठाणा पोलिसांच्या तपासात उघडकीस आले. ‘ना बाप बडा, ना भैया, सबसे बडा रुपय्या’ या गाण्याप्रमाणे मालमत्तेसाठी सख्खा लहान भाऊ गणेश मिसाळ (२२, रा. नारेगाव), बहीण जयश्री सोनटक्के व भावजी ओंकार सोनटक्के (रा. जालना) यांनीच रमेशचा खून केल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली.खून करून नंतर आत्महत्येचा बनाव करणाऱ्या गणेश मिसाळ आणि ओंकार सोनटक्केया दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. बहीण जयश्री फरार झाली असून, तिचा शोध घेण्यात येत असल्याचे चिकलठाण्याचे निरीक्षक चतुर्भुज काकडे यांनी सांगितले.घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मयत रमेश मिसाळ हा शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील केशव पाईप या कंपनीत काम करीत होता. २५ मार्च रोजी त्याचा विवाह झाला होता. कंपनीच्या आवारातच असलेल्या क्वार्टरमध्ये रमेश आणि त्याची पत्नी विजया हे नवदाम्पत्य वास्तव्यास होते. त्याच्याच कंपनीत बहीण जयश्रीही काम करते आणि तीही रमेशच्या शेजारीच असलेल्या क्वार्टरमध्ये राहते. घरात सापडले होते फासावर लटकलेले प्रेत१६ जून रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जयश्रीने आवाज देऊन भावजय विजयाला बोलविले आणि ‘आपण शौचाला जाऊन येऊ’ असे सांगितले. मग दोघी शौचाला गेल्या. विजयाला घेऊन जवळपास दीड तास जयश्रीने तितकाच वेळ ‘टाईमपास’ केला. साडेअकरा वाजेच्या सुमारास दोघी परत आल्या. विजयाने खोलीचा दरवाजा उघडताच आतमध्ये पती रमेशचे फासाला लटकलेले प्रेत तिच्या नजरेस पडताच तिला धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस तेथे पोहोचले. फासावर लटकलेल्या रमेशचे पाय जमिनीला टेकलेले होते. त्यामुळे तेथेच पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मात्र, त्यावेळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली. पत्नीलाही आला होता संशयआपला पती आत्महत्या करूच शकत नाही, हा खून आहे आणि त्यात घरच्यांचाच हात आहे, असा संशय रमेशची पत्नी विजयालाही त्याच वेळी आला होता. कारण जेव्हा भावजयी जयश्रीने तिला रात्री शौचासाठी नेले. त्यावेळी तिला घरातून पतीच्या ओरडण्याचा आवाज आला. विजयाने जयश्रीला ‘मला त्यांच्या ओरडण्याचा आवाज आला’ असे म्हटलेही होते; परंतु नाही तुला भास झाला, असे म्हणत तिने वेळ मारून नेली होती. त्यानंतर घरी येताच पतीचे प्रेत विजयाला नजरेस पडले. त्यामुळे विजयानेही हा खून असल्याची तक्रार करून याच्या चौकशीची मागणी केली होती. सहायक निरीक्षक चतुर्भुज काकडे यांनी मग तपासाची चके्र फिरविली. सर्व बाजूंनी तपास केला तेव्हा रमेशचा बहीण जयश्री व लहान भाऊ गणेशसोबत नारेगावातील वडिलांच्या घराच्या वाटणीवरून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली. नेमक्या घटनेच्या वेळीच जयश्रीचे विजयाला घरातून बाहेर घेऊन जाणे, दीड तास फिरविणे, या गोष्टी पोलिसांना खटकल्या. अखेर गणेशला आणि जयश्रीचा पती ओंकारला काल ताब्यात घेऊन ‘खाक्या’ दाखविताच त्यांनी तोंड उघडले. आपणच खून केल्याची त्यांनी स्पष्ट कबुली दिली.