शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कृषी, वन अधिकाऱ्यांना ‘नो एन्ट्री’

By admin | Updated: April 28, 2015 01:29 IST

आदिवासी विकास खात्यात विविध विभागांतून प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठविण्याची पद्धत रूढ झाली आहे.

यवतमाळ : आदिवासी विकास खात्यात विविध विभागांतून प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठविण्याची पद्धत रूढ झाली आहे. मात्र शासनाने आता या खात्यात कृषी आणि वनखात्याच्या अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर पाठविण्यास मनाई केली आहे.यासंबंधी आदिवासी विकास विभागाचे उपसचिव भि.य. मंता यांच्या स्वाक्षरीने १६ एप्रिल रोजी आदेश जारी करण्यात आला आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात प्रकल्प अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय वनसेवेतील अधिकारी उपलब्ध न झाल्यास महसूल, विकास, आदिवासी विकास, कृषी, वने या खात्यातील अधिकारी प्रतिनियुक्तीवर पाठविण्याची तरतूद होती. १५ जानेवारी २००३ रोजी त्यासंबंधी आदेश जारी केले होते. परंतु आता १६ एप्रिलच्या नव्या आदेशानुसार तो रद्द करण्यात आला आहे. शासनाने राज्यातील २९ आदिवासी विकास प्रकल्पांपैकी ११ प्रकल्प संवेदनशील म्हणून घोषित केले असून, या प्रकल्पांमध्ये यापुढे कृषी आणि वन खात्यातील अधिकाऱ्यांना नेमण्यास मनाई करण्यात आली आहे. गेल्या १० वर्षांपासून आदिवासी विकास प्रकल्प खात्यात आर्थिक धुमाकूळ सुरू आहे. प्रतिनियुक्तीवर आलेल्या डझनावर अधिकाऱ्यांनी आदिवासी विकासाच्या योजनांमधील मलाई लाटली आहे. कित्येक ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे नोंदविले गेले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी पांढरकवडा, अकोला, धारणी येथे गुन्हे नोंदविले. बाहेरून येणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे आदिवासी विकास खात्याची होणारी बदनामी आणि लूट लक्षात घेता, शासनाने या खात्याला सर्वाधिक बदनाम करणाऱ्या वने आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना ‘नो एन्ट्री’ केली आहे. गेल्या काही वर्षांत वनपरिक्षेत्र अधिकारी, सहायक वनसंरक्षक यांनी प्रकल्प अधिकारी म्हणून, तर भारतीय वनसेवेच्या अधिकाऱ्यांनी अपर आयुक्त म्हणून नियुक्त्या मिळविल्या होत्या. आजही नाशिकच्या अपर आयुक्तांचे पद कृषी खात्याच्या अधिकाऱ्याकडे आहे. तर नागपूरच्या अपर आयुक्तांचे पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असून, जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे अतिरिक्त प्रभार दिला गेला आहे. अमरावती अपर आयुक्तांतर्गत पांढरकवडा, किनवट, धारणी, कळमनुरी या आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्याच्या ४ जागा गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत.(जिल्हा प्रतिनिधी)च्या रिक्त जागांवर नियुक्ती मिळविण्यासाठी वन खात्याच्या अनेक अधिकाऱ्यांनी मोर्चेबांधणी चालविली होती. त्यासाठी मुंबईपर्यंत फिल्डींग लावली गेली. मात्र शासनाच्या १६ एप्रिलच्या आदेशाने या अधिकाऱ्यांचा आदिवासी विकास खात्यात जाऊन मलाई लाटण्याचा मनसुबा उधळला गेला.