शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या हेतूवर नव्हे क्षमतेवर शंका! -भाई जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 01:19 IST

भाजपा-शिवसेनेचे सरकार सत्तेवर आल्यावर नागरिकांमध्ये नवलाई होती. मात्र, वर्षभरात ती दूर झाली. प्रशासनात ते आक्रमक ठरतील, असे वाटत होते. मात्र, आज साडेतीन वर्षांचा कालावधी लोटूनही फडणवीस सरकराला छाप पाडण्यास अपयश आले

भाजपा-शिवसेनेचे सरकार सत्तेवर आल्यावर नागरिकांमध्ये नवलाई होती. मात्र, वर्षभरात ती दूर झाली. प्रशासनात ते आक्रमक ठरतील, असे वाटत होते. मात्र, आज साडेतीन वर्षांचा कालावधी लोटूनही फडणवीस सरकराला छाप पाडण्यास अपयश आले आहे. तरुण-अभ्यासू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेतूबद्दल नव्हे, तर आता क्षमतेवर शंका असल्याचा थेट आरोप कामगार नेते आमदार भाई जगताप यांनी केला. ‘लोकमत व्यासपीठ’ या उपक्रमांतर्गत भाई जगताप बोलत होते. मुंबई ते दिल्लीपर्यंतच्या परिस्थितीवर या वेळी त्यांनी मतप्रदर्शन केले. मुंबईसह राज्यातील कामगारांच्या प्रश्नांवरही त्यांनी आक्रमक शैलीत सडेतोड भाष्य केले.जगताप पुढे म्हणाले की, युती सरकारात चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार आणि स्वत: मुख्यमंत्री वगळता, एकाही मंत्र्यांला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. सरकारची कामगिरी खरे तर निराशाजनक आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला आहे. पंकजा मुंडे यांना स्वत:ची ओळखही निर्माण करता आलेली नाही. शिवसेनेची अवस्था तर भाजपापेक्षाही बिकट आहे. शिवसेनेतील एकाही मंत्र्यांनी उल्लेखनीय काम करता आलेले नाही.गुजरातमधील निकालाबाबत ते म्हणाले, राष्ट्रवादीमुळे काँग्रेसला गुजरात निवडणुकीत ८ जागा गमवाव्या लागल्या, ही वस्तुस्थिती आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद मोदी यांना अनेक सभा घ्यावा लागल्या, तरीदेखील गुजरात निवडणुकांत भाजपाची दमछाक झाली. गुजरातच्या जनतेने दिलेला हा सूचक संदेश आहे. मोदींसारखे मार्केटिंग करणे आम्हाला जमले नाही. तथापि, आजच्या तरुणाईला रिझल्ट हवा, तो देण्यास केंद्रात मोदी-राज्यात फडणवीस सरकार अपयशी ठरत आहे.राज्यात जनआक्रोश, हल्लाबोल असे आंदोलन करत, काँग्रेस-राष्ट्रवादीने जनतेच्या रोषाला वाट करून दिली. राज्यात साडेतीन वर्षांच्या काळात जातीयवादी राजकारण सुरू आहे. एसटी महामंडळातील कामगार संप हे योग्य उदाहरण. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संपाबाबत योग्य वेळी हस्तक्षेप करणे आवश्यक असताना, त्यांनी हात झटकत पक्षीय राजकारण केले. आता राज्याच्या भल्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीला एकत्र येऊन लढावे लागेल.शब्दांकन -महेश चेमटेफडणवीस‘वचनभंगी’ मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस हे वचनभंगी मुख्यमंत्री आहेत. आम्ही नागपूरमध्ये उमेदवार दिला नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवून मुंबईत उमेदवार दिला. विधान परिषदेत राष्ट्रवादीनेदेखील धोका दिला. मात्र, शरद पवारांनी माझ्यासाठी स्वत: सर्व राष्ट्रवादीच्या संबंधितांना फोन केले होते. कामगारांच्या चळवळी देशभर नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, राज्यात भाजपाचे हे मनसुबे आम्ही उधळून लावले, असेही भाई जगताप म्हणाले.एसटी संपविण्याचा घाट!राज्यातील दुर्गम भागात एसटीशिवाय पर्याय नाही. केवळ शिवशाही चालवून महामंडळ ‘अपडेट’ करता येणार नाही. धोरणात्मक निर्णय गरजेचे आहेत. महामंडळाची स्थिती सुधारण्यासाठी ते सरकारमध्ये विलीन करणे हा एकमेव पर्याय आहे. भाजपा-सेना यांच्यातील वादात एसटीच्या लाखभर कर्मचाºयांचा बळी जात आहे.टप्पे वाहतूक हा एसटीचाच अधिकार आहे. मात्र, राज्यात सर्रास आगारात घुसून खासगी टप्पे वाहतूकदारांकडून प्रवासी पळविले जातात. त्यामुळे सरकार योग्य निर्णय का घेत नाही, हे न उलगडलेले कोडे आहे. युती सरकार एसटी महामंडळ संपविण्याचा घाट घालत असल्याचा आरोप जगताप यांनी केला.आयुक्तांनी हिंमत दाखवावीमुंबईत तरंगते हॉटेल सुरू करण्याआधी गच्चीवरील हॉटेलमधील जिवांशी खेळ थांबवा. सुविधा देताना सुरक्षेची काळजी घ्या. कमला मिल आग प्रकरणी आयुक्त अजय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. आयुक्त पदावरील अधिकाºयांनी माझ्यावर दबाव होता, हे म्हणणे चुकीचे आहे. हिंमत दाखवून आयुक्तांनी दबाव आणणाºयाचे बिनदिक्कत नाव घ्यावे, असे आवाहनही भाई जगताप यांनी केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस