शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

राज्यातल्या हायवेंवर 'नो दारुबंदी'

By admin | Updated: March 24, 2017 16:15 IST

राज्य सरकारने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर असलेल्या परमिट रुम आणि सर्व बारचे परवाने पुन्हा देण्याचा आदेश अधिका-यांना दिला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - राज्य सरकारने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर असलेल्या परमिट रुम आणि सर्व बारचे परवाने पुन्हा देण्याचा आदेश अधिका-यांना दिला आहे. अॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांचा सल्ला घेतल्यानंतर हे परवाने पुन्हा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा फक्त रिटेलमध्ये दारु विक्री करणा-यांसाठीच लागू असल्याचं मुकूल रोहतगी यांनी सांगितलं आहे. 
 
राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग या ठिकाणी होत असलेल्या दारुविक्रीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले, असा निष्कर्ष काढत सर्वोच्च न्यायालयाने राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख मार्गांपासून 500 मीटर अंतर परिसरात कोणत्याही प्रकारे दारु विक्री करण्यास बंदी घातली होती. देशभरातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर असणारी दारुची दुकाने 1 एप्रिलपर्यंत हटवण्याचा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 
 
मुकूल रोहतगी यांचं मत जाणून घेतल्यानंतर एकूण 13 हजार परमिट रुम आणि बारचे परवाने परत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं एका वरिष्ठ अधिका-याने सांगितलं आहे. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीला बसणारा 2 हजार 300 कोटींचा फटका वाचला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्व जिल्हाधिकारी आणि अबकारी अधीक्षकांना यासंबंधी आदेश दिले आहे.
 
केरळ सरकारनेही याप्रकरणी अॅटर्नी जनरल याचं मत मागवलं असून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फक्त दारुविक्री दुकानांना लागू आहे की, बारही बंद करायचे आहेत हे स्पष्ट करण्यात सांगितलं आहे. मुकूल रोहतगी यांनी आपल्या तीन पानांच्या सल्ल्यामध्ये स्पष्ट केलं आहे की, 'रिटेलमध्ये दारुविक्री करणा-या दुकानांसाठी हा निर्णय असल्याचं स्पष्ट आहे. आपल्या परिसरात दारु पुरवणा-या रेस्टॉरंट आणि हॉटेल्सना हा निर्णय लागू नाही. महामार्गाला लागून असलेल्या दुकानांमधून दारु सहज उपलब्ध होत असल्याने त्यांच्यावर बंदी आणावी असा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामागील हेतू आहे'. 
 
एका उच्च अधिका-याने सांगितलं आहे की, 'अॅटर्नी जनरल यांच्या सल्ल्यानंतर परमिट रुम आणि बारला परवाने देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. नोटाबंदीमुळे आधीच राज्याला तीन हजार कोटींचं नुकसान सहन करावं लागलं आहे, आणि या निर्णयामुळे अजून 2 हजार 300 कोटींचं नुकसान झालं असतं. अॅटर्नी जनरल यांचा सल्ल्याने आम्हाला वाचवलं आहे'.