शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

कंत्राटदारावर कारवाई नाही

By admin | Updated: July 11, 2017 00:57 IST

पुनर्वसित माळीण प्रकल्पातील घरांना पहिल्याच पावसात तडे गेले, रस्त्यांना भेगा पडल्या,चेंबर व मातीचे भराव खचले

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुनर्वसित माळीण प्रकल्पातील घरांना पहिल्याच पावसात तडे गेले, रस्त्यांना भेगा पडल्या,चेंबर व मातीचे भराव खचले,मात्र, जिल्हा प्रशासनाने संबंधित कंत्राटदार किंवा प्रकल्प सल्लागारांना यात दोषी धरले नाही.या उलट प्रशासनाकडून कंत्राटदाराची पाठराखण करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.परंतु,पावसामुळे निर्माण झालेल्या या स्थितीनंतर रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे.पुनर्वसित माळीण प्रकल्पाची पहाणी करण्यासाठी पावसाळा संपेपर्यंत विशेष निरीक्षण पथकाची स्थापना करण्यात आली आहे.तसेच सचिव दर्जाच्या एका वरिष्ठ प्रशासकीय अधिका-यांमार्फत कामाची पाहणी करून त्यावरील उपाययोजनेचा अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या. परंतु, संबंधित अहवाल अद्याप प्रशासनाकडे प्राप्त झालेला नाही.पावसाळ्या जास्त असल्याने ही घटना घडली असण्याची शक्यता जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी यापूर्वीच स्पष्ट केली आहे. मात्र,त्यास कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदार किंवा प्रकल्प सल्लागारांना सधी नोटीसही दिलेली नाही.परंतु, दोन वर्षाच्या करारानुसार कंत्राटदाराकडून दुरुस्तीची कामे करून घेण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आले.घरे भूकंपरोधक आहेत. जमिनीखाली सुमारे दीड ते दोन मीटर खोल खड्डे खोदून मातीत घरांचे वजन पेलण्याची क्षमता आहे का? हे तपासण्यात आले. त्यानंतर हा प्रकल्प उभारण्यात आला.परंतु, त्यामुळे बांधकामांना कोणताही धोका निर्माण झालेला नाही.घरांच्या बांधकामांना धोका नसला, तरी घरांभोवती करण्यात आलेली इतर कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याचे आढळून आले आहे. पाऊस जास्त झाल्यास काय परिणाम होतील, याचा अंदाज कंत्राटदारांस न आल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली.त्यामुळे या स्थितीला कोणालाही जबाबदार धरले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.