शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
7
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
8
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
9
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
10
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
11
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
12
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
13
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
14
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
15
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
16
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
17
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
18
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
19
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
20
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले

नितीशकुमारांचा राजीनामा म्हणजे नौटंकी - उद्धव ठाकरे

By admin | Updated: May 20, 2014 09:28 IST

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिलेला राजीनामा म्हणजे नौटंकी असल्याची बोचरी टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २० - लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिलेला राजीनामा म्हणजे नौटंकी असल्याची बोचरी टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात दारुण पराभव होऊनही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खुर्ची सोडायला तयार नाहीत असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. 
लोकसभेचा निकाल लागल्यापासून बिहारमध्ये राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. तर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसच्या गोटातूनच केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी सामना या मुखपत्राच्या अग्रलेखातून विरोधकांवर निशाणा साधला आहे. मोदींना पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळताच नितीशकुमारांनी एनडीएला सोडचिठ्ठी दिली. धर्मनिरपेक्षतेचा फालतू बाऊ केल्याने नितीशकुमारांना बिहारमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. नितीशकुमार एनडीएत राहिले असते तर आज त्यांना लोकसभेत यशही मिळाले असते व त्यांचे दिल्लीतील राजकीय वजनही वाढले असते असेही त्यांनी स्पष्ट केले. 
नितीशकुमारांचा दाखला देत उद्धव ठाकरेंनी काँग्रेसवरही टीका केली आहे. महाराष्ट्र, आसाम अशा बहुसंख्य भागात काँग्रेसचा दारुण पराभव झाला. महाराष्ट्रातील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा द्यायला हवा. पण काँग्रेस नेते खुर्ची सोडणार असा चिमटाही त्यांनी काढला आहे. 
आपसाठी नीतीमत्ता म्हणजे चणा - शेंगदाण्याचे दुकान
आम आदमी पक्षासाठी जनादेश म्हणजे पोरखेळ असून नीतीमत्ता म्हणजे त्यांना चणे-शेंगदाण्याचे दुकान वाटते. म्हणूनच आधी नैतिकतेच्या मुद्यावर दिल्लीची सत्ता सोडणारा आम आदमी पक्ष लोकसभेनंतर पुन्हा एकदा दिल्लीत सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करतो अशी टीका ठाकरेंनी केली आहे.