शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

नितीशकुमारांचा राजीनामा म्हणजे नौटंकी - उद्धव ठाकरे

By admin | Updated: May 20, 2014 09:28 IST

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिलेला राजीनामा म्हणजे नौटंकी असल्याची बोचरी टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २० - लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिलेला राजीनामा म्हणजे नौटंकी असल्याची बोचरी टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात दारुण पराभव होऊनही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खुर्ची सोडायला तयार नाहीत असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. 
लोकसभेचा निकाल लागल्यापासून बिहारमध्ये राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. तर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसच्या गोटातूनच केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी सामना या मुखपत्राच्या अग्रलेखातून विरोधकांवर निशाणा साधला आहे. मोदींना पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळताच नितीशकुमारांनी एनडीएला सोडचिठ्ठी दिली. धर्मनिरपेक्षतेचा फालतू बाऊ केल्याने नितीशकुमारांना बिहारमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. नितीशकुमार एनडीएत राहिले असते तर आज त्यांना लोकसभेत यशही मिळाले असते व त्यांचे दिल्लीतील राजकीय वजनही वाढले असते असेही त्यांनी स्पष्ट केले. 
नितीशकुमारांचा दाखला देत उद्धव ठाकरेंनी काँग्रेसवरही टीका केली आहे. महाराष्ट्र, आसाम अशा बहुसंख्य भागात काँग्रेसचा दारुण पराभव झाला. महाराष्ट्रातील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा द्यायला हवा. पण काँग्रेस नेते खुर्ची सोडणार असा चिमटाही त्यांनी काढला आहे. 
आपसाठी नीतीमत्ता म्हणजे चणा - शेंगदाण्याचे दुकान
आम आदमी पक्षासाठी जनादेश म्हणजे पोरखेळ असून नीतीमत्ता म्हणजे त्यांना चणे-शेंगदाण्याचे दुकान वाटते. म्हणूनच आधी नैतिकतेच्या मुद्यावर दिल्लीची सत्ता सोडणारा आम आदमी पक्ष लोकसभेनंतर पुन्हा एकदा दिल्लीत सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करतो अशी टीका ठाकरेंनी केली आहे.