शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
3
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
4
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
5
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
6
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
7
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
8
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
9
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
12
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
13
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
14
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
15
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
16
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
17
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
18
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

नितीशकुमारांचा राजीनामा म्हणजे नौटंकी - उद्धव ठाकरे

By admin | Updated: May 20, 2014 09:28 IST

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिलेला राजीनामा म्हणजे नौटंकी असल्याची बोचरी टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २० - लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिलेला राजीनामा म्हणजे नौटंकी असल्याची बोचरी टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात दारुण पराभव होऊनही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खुर्ची सोडायला तयार नाहीत असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. 
लोकसभेचा निकाल लागल्यापासून बिहारमध्ये राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. तर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसच्या गोटातूनच केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी सामना या मुखपत्राच्या अग्रलेखातून विरोधकांवर निशाणा साधला आहे. मोदींना पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळताच नितीशकुमारांनी एनडीएला सोडचिठ्ठी दिली. धर्मनिरपेक्षतेचा फालतू बाऊ केल्याने नितीशकुमारांना बिहारमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. नितीशकुमार एनडीएत राहिले असते तर आज त्यांना लोकसभेत यशही मिळाले असते व त्यांचे दिल्लीतील राजकीय वजनही वाढले असते असेही त्यांनी स्पष्ट केले. 
नितीशकुमारांचा दाखला देत उद्धव ठाकरेंनी काँग्रेसवरही टीका केली आहे. महाराष्ट्र, आसाम अशा बहुसंख्य भागात काँग्रेसचा दारुण पराभव झाला. महाराष्ट्रातील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा द्यायला हवा. पण काँग्रेस नेते खुर्ची सोडणार असा चिमटाही त्यांनी काढला आहे. 
आपसाठी नीतीमत्ता म्हणजे चणा - शेंगदाण्याचे दुकान
आम आदमी पक्षासाठी जनादेश म्हणजे पोरखेळ असून नीतीमत्ता म्हणजे त्यांना चणे-शेंगदाण्याचे दुकान वाटते. म्हणूनच आधी नैतिकतेच्या मुद्यावर दिल्लीची सत्ता सोडणारा आम आदमी पक्ष लोकसभेनंतर पुन्हा एकदा दिल्लीत सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करतो अशी टीका ठाकरेंनी केली आहे.