शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

‘राज्याचे सिंचन क्षेत्र २ वर्षांत ४० टक्क्यांवर’, नितीन गडकरी यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 04:45 IST

राज्यातील २६ सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे दोन वर्षांत महाराष्ट्राचे सिंचन क्षेत्र २२ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर पोहोचेल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी व्यक्त केला.

मुंबई : राज्यातील २६ सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे दोन वर्षांत महाराष्ट्राचे सिंचन क्षेत्र २२ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर पोहोचेल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी व्यक्त केला.फिक्कीच्या ‘प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र-२०१७’ या कार्यक्रमात पायाभूत सोईसुविधांची सद्यस्थिती आणि त्यांचा राज्याच्या विकासावर होणारा परिणाम, या विषयावर गडकरी यांनी भाष्य केले. पायाभूत सोईसुविधांच्या बाबतीत येत्या दोन वर्षांत महाराष्ट्राचा चेहरामोहराच बदललेला असेल. महाराष्ट्रातील रस्त्यांचे जाळे तिपटीने वाढल्याचे सांगून गडकरी म्हणाले की, केंद्र सरकारच्या सागरमाला, देशांतर्गत जलवाहतूक, महामार्गांचे चौपदरीकरण, बंदरविकास आदी उपक्रमांमुळे राज्याच्या आर्थिक विकासाची गती वाढेल. मुंबईतून क्रुझ सेवेला सुरुवात झाली आहे. येत्या पाच वर्षांत सुमारे ९५० क्रुझ मुंबईच्या किना-यावर येतील. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पायाभूत सेवासुविधांची गती वाढेल, असे गडकरी म्हणाले.तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, फिक्कीच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्रात उद्योग वाढीसाठी चांगल्या सोईसुविधा व कुशल मनुष्यबळ आहे. गेल्या तीन वर्षांपासून संपूर्ण देशामध्ये उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. तसेच तीन वर्षांपासून ‘इज आॅफ डुइंग बिझनेस’ राबवीत आहोत. महाराष्ट्राच्या उद्योग भरारीची जागतिक बँक आणि नीति आयोगानेही दखल घेत, कौतुक केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.