शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
4
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
5
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
6
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
9
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
10
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
11
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
12
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
13
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
14
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
18
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
19
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
20
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो

‘राज्याचे सिंचन क्षेत्र २ वर्षांत ४० टक्क्यांवर’, नितीन गडकरी यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 04:45 IST

राज्यातील २६ सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे दोन वर्षांत महाराष्ट्राचे सिंचन क्षेत्र २२ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर पोहोचेल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी व्यक्त केला.

मुंबई : राज्यातील २६ सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे दोन वर्षांत महाराष्ट्राचे सिंचन क्षेत्र २२ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर पोहोचेल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी व्यक्त केला.फिक्कीच्या ‘प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र-२०१७’ या कार्यक्रमात पायाभूत सोईसुविधांची सद्यस्थिती आणि त्यांचा राज्याच्या विकासावर होणारा परिणाम, या विषयावर गडकरी यांनी भाष्य केले. पायाभूत सोईसुविधांच्या बाबतीत येत्या दोन वर्षांत महाराष्ट्राचा चेहरामोहराच बदललेला असेल. महाराष्ट्रातील रस्त्यांचे जाळे तिपटीने वाढल्याचे सांगून गडकरी म्हणाले की, केंद्र सरकारच्या सागरमाला, देशांतर्गत जलवाहतूक, महामार्गांचे चौपदरीकरण, बंदरविकास आदी उपक्रमांमुळे राज्याच्या आर्थिक विकासाची गती वाढेल. मुंबईतून क्रुझ सेवेला सुरुवात झाली आहे. येत्या पाच वर्षांत सुमारे ९५० क्रुझ मुंबईच्या किना-यावर येतील. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पायाभूत सेवासुविधांची गती वाढेल, असे गडकरी म्हणाले.तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, फिक्कीच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्रात उद्योग वाढीसाठी चांगल्या सोईसुविधा व कुशल मनुष्यबळ आहे. गेल्या तीन वर्षांपासून संपूर्ण देशामध्ये उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. तसेच तीन वर्षांपासून ‘इज आॅफ डुइंग बिझनेस’ राबवीत आहोत. महाराष्ट्राच्या उद्योग भरारीची जागतिक बँक आणि नीति आयोगानेही दखल घेत, कौतुक केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.