शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
4
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
5
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
6
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
7
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
8
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
9
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
10
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
11
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
12
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
13
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
14
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
15
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
16
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
17
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
18
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
19
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
20
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

भाजपात आलेल्या वाल्यांचा वाल्मिकी करू - नितीन गडकरी

By admin | Updated: April 26, 2017 20:32 IST

भारतीय जनता पक्षाचा विस्तार करण्यासाठी विरोधक पक्षात आले पाहिजेत. त्यांना आम्ही गुणदोषांसह स्वीकारतो

 ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 26 -  भारतीय जनता पक्षाचा विस्तार करण्यासाठी विरोधक पक्षात आले पाहिजेत. त्यांना आम्ही गुणदोषांसह स्वीकारतो. अगदी गुन्हेगार असलातरी पक्षाच्या परीस स्पर्श झाल्यानंतर वाल्याचा वाल्मिकी करण्याचा आम्हाला विश्वास आहे, असे विधान केंद्रीय रस्ते व विकासमंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. 
भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठकीचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात बुधवारी झाले. या वेळी ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे अध्यक्षस्थानी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट , शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय राजमंत्री हंसराज अहिर, केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे, महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे, सहप्रभारी राकेश सिंग, व्ही़ सतीश,  माजी मंत्री एकनाथ खडसे, शहाराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आदी उपस्थित होते.
 
गुन्हेगारांना पक्षात प्रवेश देण्याचे समर्थन करताना गडकरी यांनी नागपूर येथील एका कार्यकत्र्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले, ""एकेकाळी कुप्रसिध्द असलेला हा कार्यकर्ता पक्षात आल्यानंतर चांगला झाला. त्यामुळे आम्ही गुणदोषांसह नवीन कार्यकत्र्याना स्वीकारतो. परंतु, गेल्या 40 वर्षाच्या राजकारणात कधीही गुन्हेगारांची बाजू घेतलेली नाही. आता जुन्या कार्यकत्र्याची जबाबदारी वाढलेली आहे. त्यांनी नवीन कार्यकत्र्याचा मोठय़ा मनाने स्वीकार केला पाहिजे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्या पक्षात आल्याशिवाय आपला पक्ष वाढणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे. विरोधकांना बरोबर घेऊन आपल्यासारखे बनविले पाहिजे.""
 
विजयाचा अहंकार, उन्माद नको !
भाजपाला नगरपालिका, महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळाला. त्याचा उन्माद येऊ न देता, त्याचा नम्रपणो स्वीकार केला पाहिजे. आत्मविश्वास बाळगा, पण अहंकार पाळू नका. जनतेने आपल्यावर विश्वास ठेवला आहे. त्याचे उत्तरदायित्त्व ठेऊन संकल्प करा. देशातील व राज्यातील दलित, अदिवासी, शेतकरी व दिव्यांग यांच्या कल्याणासाठी काम करा. अर्थिक व सामाजिक विषमता दूर झाले पाहिजे, यासाठी कार्यकत्र्यानी काम करावे, असा सल्ला गडकरी यांनी कार्यकत्र्याना दिला. 
 
 त्याशिवाय शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत 
राज्यात 36 हजार कोटींची सिंचनाचे प्रकल्प सुरू आहेत. 50 टक्के शेती क्षेत्र सिंचनाखाली आल्याशिवाय शेतक-यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत. गेल्या 3क् वर्षात सत्ता असूनही विरोधकांना सिंचन क्षेत्र वाढविता आले नाही. शेतक-यांऐवजी त्यांनी परिवाराचा विचार केला. परंतु, राज्यात भाजपा सत्तेत आल्यानंतर कृषी विकास दर 12.5 टक्केर्पयत वाढला आहे. येत्या दोन वर्षात हा विकास दर 20 टक्के करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे गडकरी यांनी सांगितले.